शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सातारा जिल्ह्यात २१७ टँकरने पाणीपुरवठा, ३ लाख नागरिकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:11 IST

सातारा जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती अधिक वाढली असून सध्या १८० गावे आणि ७६० वाड्यांसाठी २१७ टँकर सुरू आहेत. जवळपास ३ लाख नागरिक आणि १ लाख ४१ हजार पशुधनाला या टँकरचाच आधार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माणमधील ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात २१७ टँकरने पाणीपुरवठा, ३ लाख नागरिकांना आधार माणमधील सर्वाधिक ७४ गावे अन् ५५८ वाड्यांना झळ

सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती अधिक वाढली असून सध्या १८० गावे आणि ७६० वाड्यांसाठी २१७ टँकर सुरू आहेत. जवळपास ३ लाख नागरिक आणि १ लाख ४१ हजार पशुधनाला या टँकरचाच आधार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माणमधील ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी पूर्व भाग मात्र, कोरडाच राहिला. सुरुवातीच्या काळात मान्सूनचा पाऊस झाला. पण, आॅगस्टनंतर पूर्व दुष्काळी भागात अपवादानेच पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच माण तालुक्यातील अनेक गावात टंचाईची स्थिती निर्माण झाली. तर नोव्हेंबर महिन्यापासून काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. जानेवारी महिन्यानंतर तर टंचाई स्थिती अधिक गडद होत गेली.माण तालुक्यातील सध्या ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना १०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १ लाख ३६ हजार २७६ नागरिक आणि ६१ हजार ६५७ पशुधन अवलंबून आहे. या तालुक्यासाठी टँकर खेपा २१९ मंजूर असल्या तरी रविवारी १८९ झाल्या. खटाव तालुक्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून ३९ गावे आणि १३५ वाड्यांसाठी ३५ टँकर सुरू आहेत.

तालुक्यातील ६७ हजार ४५ नागरिक आणि ३५ हजार ३०३ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तालुक्यात १ टँकर वाढला आहे. कोरेगाव तालुक्यातही टंचाईची स्थिती असून २८ गावांना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ४४ हजार ७३३ नागरिक व १९ हजार ८०६ पशुधन टँकरवर तहान भागवत आहे.फलटण तालुक्यातही टंचाई निर्माण होणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या तालुक्यातील २० गावे व ५५ वाड्यांतील ३४ हजार ३४५ ग्रामस्थ आणि १२ हजार ५८० पशुधनला टँकरचा आधार आहे. तालुक्यात २५ टँकरची चाके दुष्काळग्रस्तांसाठी धावत आहेत.

वाई तालुक्यात ८ गावे व ४ वाड्यांसाठी ६ टँकर सुरू आहेत. खंडाळा आणि पाटण तालुक्यात प्रत्येकी २ टँकर सुरू आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील ३ गावे आणि एका वाडीसाठी ३ टँकर सुरू आहेत. तसेच सातारा तालुक्यात १ व कऱ्हाड तालुक्यातील ३ गावांना टँकरचा आधार आहे.१११ विहिरींचे अधिग्रहण; खेपांची टक्केवारी ८६टंचाईच्या गावातील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी २१७ टँकर सुरू असून त्यामधील ९ शासकीय आहेत तर तब्बल २०८ हे खासगी आहेत. या टँकरना दररोज ४७५ खेपा मंजूर असल्यातरी रविवारी फक्त ४३४ झाल्या होत्या. खेपांची टक्केवारी ही ८६ टक्के इतकी आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात १११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर