शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

सातारा जिल्ह्यात २१७ टँकरने पाणीपुरवठा, ३ लाख नागरिकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 14:11 IST

सातारा जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती अधिक वाढली असून सध्या १८० गावे आणि ७६० वाड्यांसाठी २१७ टँकर सुरू आहेत. जवळपास ३ लाख नागरिक आणि १ लाख ४१ हजार पशुधनाला या टँकरचाच आधार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माणमधील ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात २१७ टँकरने पाणीपुरवठा, ३ लाख नागरिकांना आधार माणमधील सर्वाधिक ७४ गावे अन् ५५८ वाड्यांना झळ

सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती अधिक वाढली असून सध्या १८० गावे आणि ७६० वाड्यांसाठी २१७ टँकर सुरू आहेत. जवळपास ३ लाख नागरिक आणि १ लाख ४१ हजार पशुधनाला या टँकरचाच आधार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक माणमधील ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी पूर्व भाग मात्र, कोरडाच राहिला. सुरुवातीच्या काळात मान्सूनचा पाऊस झाला. पण, आॅगस्टनंतर पूर्व दुष्काळी भागात अपवादानेच पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच माण तालुक्यातील अनेक गावात टंचाईची स्थिती निर्माण झाली. तर नोव्हेंबर महिन्यापासून काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. जानेवारी महिन्यानंतर तर टंचाई स्थिती अधिक गडद होत गेली.माण तालुक्यातील सध्या ७४ गावे आणि ५५८ वाड्यांना १०७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १ लाख ३६ हजार २७६ नागरिक आणि ६१ हजार ६५७ पशुधन अवलंबून आहे. या तालुक्यासाठी टँकर खेपा २१९ मंजूर असल्या तरी रविवारी १८९ झाल्या. खटाव तालुक्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून ३९ गावे आणि १३५ वाड्यांसाठी ३५ टँकर सुरू आहेत.

तालुक्यातील ६७ हजार ४५ नागरिक आणि ३५ हजार ३०३ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तालुक्यात १ टँकर वाढला आहे. कोरेगाव तालुक्यातही टंचाईची स्थिती असून २८ गावांना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ४४ हजार ७३३ नागरिक व १९ हजार ८०६ पशुधन टँकरवर तहान भागवत आहे.फलटण तालुक्यातही टंचाई निर्माण होणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या तालुक्यातील २० गावे व ५५ वाड्यांतील ३४ हजार ३४५ ग्रामस्थ आणि १२ हजार ५८० पशुधनला टँकरचा आधार आहे. तालुक्यात २५ टँकरची चाके दुष्काळग्रस्तांसाठी धावत आहेत.

वाई तालुक्यात ८ गावे व ४ वाड्यांसाठी ६ टँकर सुरू आहेत. खंडाळा आणि पाटण तालुक्यात प्रत्येकी २ टँकर सुरू आहे. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील ३ गावे आणि एका वाडीसाठी ३ टँकर सुरू आहेत. तसेच सातारा तालुक्यात १ व कऱ्हाड तालुक्यातील ३ गावांना टँकरचा आधार आहे.१११ विहिरींचे अधिग्रहण; खेपांची टक्केवारी ८६टंचाईच्या गावातील लोकांना पाणी पुरवठा करण्यासाठी २१७ टँकर सुरू असून त्यामधील ९ शासकीय आहेत तर तब्बल २०८ हे खासगी आहेत. या टँकरना दररोज ४७५ खेपा मंजूर असल्यातरी रविवारी फक्त ४३४ झाल्या होत्या. खेपांची टक्केवारी ही ८६ टक्के इतकी आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात १११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर