शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

धुराडी पेटल्याने साखरवाडी गजबजली...! : ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:45 IST

नसीर शिकलगार । फलटण : थकीत देण्यामुळे बंद पडलेला आणि तोट्यात गेलेला साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर ...

ठळक मुद्दे ‘फलटण न्यू’चा दत्त इंडिया शुगरने घेतला ताबा

नसीर शिकलगार ।फलटण : थकीत देण्यामुळे बंद पडलेला आणि तोट्यात गेलेला साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. कारखाना बंद पडला होता. तो यंदा दत्त इंडिया शुगर प्रा. लि.ने ताब्यात घेऊन चालू केल्याने साखरवाडी परिसर गजबजला आहे. तालुक्यातील दिवाळखोरीत निघणारी मोठी संस्था वाचून ऊस उत्पादकांचे थकीत पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक व कामगारांना दिलासा मिळाला आहे.

फलटण तालुक्यात साखरवाडीमध्ये सन १९३२ च्या दरम्यान सुरू झालेला न्यू फलटण शुगर साखर कारखाना चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे कोट्यवधींची कर्जे डोक्यावर घेऊन बंद पडला. गतवर्षीच्या हंगामात गाळप होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोट्यवधींची देणी आणि सुमारे ५४५ कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. कॉसमॉस को-आॅप. बँकेने थकबाकीची मागणी केल्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजी न्यू फलटण कारखाना हस्तांतराबाबत कार्यवाही सुरू झाली.

कॉसमॉसने दोन-तीन वर्षांपूर्वी २५ कोटी रुपये कारखान्याला दिले होते. त्यापैकी १२ कोटी येणे असल्याचे तसेच स्टेट बँक, आयडीबीआय व अन्य बँकांची मोठी देणी असल्याने एनसीएलटी तोडग्यासाठी प्रयत्नशील होते. त्यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ४९ कोटी आणि कामगारांचे १५-१६ महिन्यांचे पगार व अन्य येणी प्राधान्याने मिळाली पाहिजेत, यासाठी आग्रह धरला.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इसेन्शियल कम्युडीटी कायद्यातील तरतुदीनुसार उच्च न्यायालयात शेतकरी/कामगारांची थकीत येणी मिळण्यासाठी दावा दाखल केला. यावर एनसीएलटीने फलटण न्यू शुगर कारखान दत्त इंडिया शुगर प्रा. लि.ला हस्तांतरित केला. तसेच त्यांना ऊसबिलाची मागणी करण्यासाठी अर्ज भरून दिलेल्या ऊसउत्पादकांचे पैसे देण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे (एनसीएलटी) च्या माध्यमातून श्री दत्त इंडिया प्रा. लि., मुंबई यांनी न्यू फलटण शुगरची जबाबदारी स्वीकारली असून, शेतकरी व कामगारांची देणी देण्यासह यावर्षीच्या गळीत हंगामात कारखाना सुरू करण्याची तयारी त्यांनी केली होती. सूत्रे हाती येताच अवघ्या १५ दिवसांत गाळपास प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, कामगारांना अ‍ॅडव्हान्स पगार देण्यात आला आहे.

दत्त इंडियाने पहिल्या टप्प्यात १४ कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याने कंगाल होत चाललेल्या ऊस उत्पादकाला दोन वर्षांनी पैसे मिळाले आहेत. तो अडचणीतून बाहेर येऊ लागला आहे. तसेच साखरवाडीतील साखर कारखाना सुरू झाल्याने परिसरात वर्दळही वाढू लागली असून, वर्षभर हाताला काम आणि पगार नसलेला कामगारवर्गही उत्साहात काम करू लागला आहे. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

साखरवाडी, ता. फलटण येथील साखर कारखाना दत्त इंडिया शुगर प्रा. लि. कंपनीने चालविण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात उसाचे गाळप सुरू झाले आहे.

दत्त इंडियाने आतापर्यंत एनसीएलटीच्या आदेशाप्रमाणे १४ कोटी रुपये मागील काही ऊस उत्पादकांची देणी दिली आहेत. ज्याप्रमाणे आदेश येईल, त्याप्रमाणे पेमेंट करू, या हंगामात इतर कारखाने जो दर देतील, त्या प्रमाणात दर देण्याचा प्रयत्न करू. आत्तापर्यंत १३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, हळूहळू उसाचे प्रमाण वाढल्यावर गाळपही वाढेल.- मृत्युंजय शिंदे उपाध्यक्ष,दत्त इंडिया शुगर, साखरवाडीआम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचे आणि कामगारांचे थकीत बिल मिळावे म्हणून मोठा लढा उभारला आहे. न्यायालयातही दाद मागितली आहे. आता दत्त इंडियाने बंद पडलेला हा कारखाना सुरू केला असला तरी ऊस उत्पादक आणि कामगारांची सर्व देणी लवकर द्यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- नितीन यादवफलटण तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखाने