शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
3
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
4
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
5
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
6
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
7
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
8
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
9
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
10
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
11
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
12
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
13
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
14
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
15
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
16
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
17
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
18
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
19
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
20
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)

माणमधील छावण्यांना अनुदानाचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:41 IST

सचिन मंगरुळे। लोकमत न्यूज नेटवर्क म्हसवड : माण तालुक्यातील अनेक चारा छावण्यांचे दोन महिन्यांपासूनचे शासन अनुदान रखडले आहे. पैसेच ...

सचिन मंगरुळे।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : माण तालुक्यातील अनेक चारा छावण्यांचे दोन महिन्यांपासूनचे शासन अनुदान रखडले आहे. पैसेच नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविताना छावणी चालक रडकुंडीला आले आहेत. अनुदान त्वरित न मिळाल्यास नाईलाजास्तव छावण्या बंद कराव्या लागतील, असा इशारा छावणी चालकांनी दिला आहे.दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तीन महिन्यांपासून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे छावण्यात जनावरांची संख्या वाढतच आहे. माण तालुक्यात सध्या ८७ चारा छावण्या चालवल्या जात आहेत. मे महिन्यापासूनची बिले अद्याप मिळालेली नाहीत.दुष्काळामुळे पाणी, चारा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उद्भवला आहे. पशुधन वाचविण्यासाठी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक चालकांनी स्वत:कडील पैसे खर्च करीत जनावरे सांभाळली आहेत. काहींनी उधारीने पैसे आणून प्रशासनाच्या नियमांची पूर्तता करीत छावण्या सुरू केल्या.चालकाकडे पैसे शिल्लक नसल्याने चाऱ्याचे पैसे द्यायचे कोठून? असा प्रश्न पडला.राज्य सरकारने चारा छावणी सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यातील जाचक अटीमुळे बिले थकविली असल्याचे सांगितले जाते. जनावरांची दैनंदिन उपस्थिती आॅनलाईन पद्धतीने न घेतल्याने बिले निघत नसल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने परजिल्ह्यातून चारा आणावा लागतो, यासाठी मोठा खर्च होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने लवकरात लवकर चारा छावण्यांची बिले द्यावी, अशी मागणी होत आहे.असा होतो छावण्यांमध्ये खर्चप्रत्येक छावणीला रोजचा खर्च पन्नास ते साठ हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत होतो. पाचशे जनावरांच्या छावणीला महिन्याला पंधरा लाख, दहा हजारांच्या जनावरांच्या छावणीला ३० लाख तर दीड हजार जनावरांच्या छावणीला ४५ लाख रुपये महिन्याला खर्च होतो. हा खर्च भागविण्यासाठी छावणीचालकांना कसरत करावी लागते. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी दररोज हजारो रुपयांचा खर्च होतो.जनावरे विकावी लागतीलगेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात पाऊस झालेला नाही. जुलै महिना संपत आला तरी पावसांचा थेंब नाही. शेतकऱ्यांकडे चारा उरलेला नाही. त्यामुळे चारा छावण्या बंद झाल्या तर जनावरे कवडीमोल दराने विकावी लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.