शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

माणमधील छावण्यांना अनुदानाचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:41 IST

सचिन मंगरुळे। लोकमत न्यूज नेटवर्क म्हसवड : माण तालुक्यातील अनेक चारा छावण्यांचे दोन महिन्यांपासूनचे शासन अनुदान रखडले आहे. पैसेच ...

सचिन मंगरुळे।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : माण तालुक्यातील अनेक चारा छावण्यांचे दोन महिन्यांपासूनचे शासन अनुदान रखडले आहे. पैसेच नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविताना छावणी चालक रडकुंडीला आले आहेत. अनुदान त्वरित न मिळाल्यास नाईलाजास्तव छावण्या बंद कराव्या लागतील, असा इशारा छावणी चालकांनी दिला आहे.दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी शासनाने तीन महिन्यांपासून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जुलै महिना अर्धा संपला तरी पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे छावण्यात जनावरांची संख्या वाढतच आहे. माण तालुक्यात सध्या ८७ चारा छावण्या चालवल्या जात आहेत. मे महिन्यापासूनची बिले अद्याप मिळालेली नाहीत.दुष्काळामुळे पाणी, चारा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उद्भवला आहे. पशुधन वाचविण्यासाठी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक चालकांनी स्वत:कडील पैसे खर्च करीत जनावरे सांभाळली आहेत. काहींनी उधारीने पैसे आणून प्रशासनाच्या नियमांची पूर्तता करीत छावण्या सुरू केल्या.चालकाकडे पैसे शिल्लक नसल्याने चाऱ्याचे पैसे द्यायचे कोठून? असा प्रश्न पडला.राज्य सरकारने चारा छावणी सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यातील जाचक अटीमुळे बिले थकविली असल्याचे सांगितले जाते. जनावरांची दैनंदिन उपस्थिती आॅनलाईन पद्धतीने न घेतल्याने बिले निघत नसल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने परजिल्ह्यातून चारा आणावा लागतो, यासाठी मोठा खर्च होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने लवकरात लवकर चारा छावण्यांची बिले द्यावी, अशी मागणी होत आहे.असा होतो छावण्यांमध्ये खर्चप्रत्येक छावणीला रोजचा खर्च पन्नास ते साठ हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत होतो. पाचशे जनावरांच्या छावणीला महिन्याला पंधरा लाख, दहा हजारांच्या जनावरांच्या छावणीला ३० लाख तर दीड हजार जनावरांच्या छावणीला ४५ लाख रुपये महिन्याला खर्च होतो. हा खर्च भागविण्यासाठी छावणीचालकांना कसरत करावी लागते. सध्या पिण्याच्या पाण्यासाठी दररोज हजारो रुपयांचा खर्च होतो.जनावरे विकावी लागतीलगेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात पाऊस झालेला नाही. जुलै महिना संपत आला तरी पावसांचा थेंब नाही. शेतकऱ्यांकडे चारा उरलेला नाही. त्यामुळे चारा छावण्या बंद झाल्या तर जनावरे कवडीमोल दराने विकावी लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.