शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
3
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
4
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
5
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
6
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
7
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
8
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
9
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
10
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
11
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
12
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
13
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
14
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
15
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
16
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
17
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
18
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
19
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
20
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

एका विद्यार्थिनीसाठी कुटुंब सोडून अध्ययन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:32 PM

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कात्रेवाडी, जुंगटी, तांबी, पिसाडी या गावांची नावं फारशी ऐकिवात नाहीत. जंगली ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कात्रेवाडी, जुंगटी, तांबी, पिसाडी या गावांची नावं फारशी ऐकिवात नाहीत. जंगली श्वापदाने हल्ला केला तरच त्याच्या बातमीत या व अशा दुर्गम-डोंगरी भागातील गावांची नावं वाचायला मिळतात. एरवी या गावांची बातमी होण्याची सूतरामही शक्यता नाही. ही गावं आहेतच तशी! अशा कात्रेवाडीत जिल्हा परिषदेच्या शाळेवर एका शिक्षकाची नेमणूक आहे, पाचवीत शिकणाऱ्या एकमेव विद्यार्थिनीला शिकविण्यासाठी!साताºयाच्या पश्चिमेकडील डोंगर रांगेत, कासपासून वजराई धबधब्याकडे गाडी वळते. जुंगटीपर्यंत चारचाकी जाते. तेथून थोडं पुढे, काही अंतरापर्यंत जंगलातील मळलेल्या पायवाटेने मोटारसायकल नेता येते. एका झाडाखाली मोटारसायकल उभी करून कात्रेवाडीच्या दिशेने डोंगर उताराने त्यांचा पायी प्रवास सुरूहोतो.कात्रेवाडी म्हणजे साधारण १०-१५ घरांची वस्ती. सध्या वस्तीवर सहा-सात कुटुंब राहत. एकूण माणसांची संख्या अवघी २०! गावात जिल्हा परिषदेने बांधलेली शाळा आहे. तेवढीच काय ती पक्की इमारत, बाकी सगळी घरं कच्चीच, कुडाची. या शाळेत पाचवी इयत्तेत शिक्षण घेत असलेली वर्षा दिलीप मगराजे ही या वर्गातील आणि शाळेतीलही एकमेव विद्यार्थिनी! तिच्यासाठी एका शिक्षकाची नेमणूक आहे. शाळा उघडणे, वर्गखोलीची झाडलोट, शालेय पोषण आहार तयार करणे आदी कामे शिक्षकालाच करावी लागतात. त्यामुळे या शाळेसाठी शिपाईही तेच आणि गुरुजीही तेच आहेत.हा शिक्षक फलटण तालुक्यातून बदलून येथे आला. गवे, अस्वले, धुकं या गोष्टी त्यांनी पुस्तकांतून वाचल्या-ऐकल्या. गहू हे एकमेव पीक स्थानिक शेतकरी घेतात. गव्यांच्या उपद्रवाने फारसे पीक हाती लागत नाही. दत्तराम साळुंखे यांच्या घरी गुरुजींचा मुक्कामी असतात. सोमवारी कात्रेवाडीला जाताना गुरुजीसोबत पालेभाज्या घेऊन जातात. ‘इथले लोक इतक्या अडचणीत जीवन जगत आहेत. त्यांच्या त्रासापुढे आपली गैरसोय काहीच नाही,’ असे गुरुजी देतात.कुटुंबाबरोबर संपर्कासाठी टेकडीची चढाईकाही वर्षांपूर्वी या वस्तीवर वीज पोहोचली. पावसाळ्यात वादळीवारा किंवा यांत्रिक बिघाडाने वीज गेली तर आठवडा अंधारात काढावा लागतो, अशी येथील स्थिती आहे. मोबाईलला रेंज मिळवायसाठी वस्तीच्या उशाशी असलेली टेकडी चढून जावे लागते. पत्नीसह गुरुजींची दोन मुले गावी फलटणला असतात. घरात कोणाला दुखले-खुपले, अडीअडचणीच्या वेळी कुटुंबाशी संपर्क करायचा झाल्यास गुरुजी मोबाईल घेऊन टेकडीवर येण्याची वाट पाहावी लागते. जोपर्यंत गुरुजी ठरवत नाहीत, तोवर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांना संपर्क करण्याचा काहीच मार्ग नाही!मुराळी कायम हवाच!दुर्गम भागात शाळा असल्याने दळण-वळणाच्या साधनांची वानवा. त्यामुळे कात्रेवाडीत, एकाच्या घरी शिक्षक मुक्कामी राहतात. शनिवारी शाळा सुटल्यानंतर गावी जायचे, सोमवारी सकाळी पुन्हा शाळेवर यायचे, हा शिक्षकांचा क्रम. कात्रेवाडीत जाता-येताना, वाट तुडवताना श्वापदांच्या भीतीने त्यांना कायम सोबतीला स्थानिक कोणाला तरी घ्यावे लागते. शनिवारीच गुरुजी केव्हा येणार याचे नियोजन ठरते. ठरलेल्या वेळेत नियोजित ठिकाणी ग्रामस्थ मुराळी म्हणून शिक्षकाची वाट पाहत उभे असतात.