शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: ढेबेबाडी विभागामधील अनेक गावांतील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 11:09 IST

अनेक मुली या शासनाच्या अहिल्यादेवी होळकर योजनेच्या सुविधांपासून आजही वंचित

सणबूर : ढेबेवाडी विभागातील डोंगराळ भागातील गावोगावी आणि वाड्या-वस्त्यांवर प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे; मात्र अजूनही माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे जाळे विणले गेलेले दिसत नाही. शिक्षणासाठी वाहतूक साधनांचा अभाव व अपुऱ्या शिक्षणाच्या सुविधांमुळे या विभागातील अनेक गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागत आहे.उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा दररोज पाच-दहा किलोमीटर अंतर पार करून त्यांना शिक्षणासाठी जावे लागत आहे. ढेबेवाडी विभागातील दुर्गम डोंगराळ भागात स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक वर्षे मूलभूत सुविधांची कमतरता कायम राहिली. भौगोलिक अडचणींमुळे अनेक वर्षे तेथील जनतेच्या नशिबी वनवास आला. आता कुठे डोंगरवासीयांच्या गावी विकासाचे झुंजुमुंजू होऊ लागले आहे. रस्त्याबरोबरच विविध सुविधाही पोहोचू लागल्या; मात्र शिक्षणाच्या परिपूर्ण सुविधा पोहोचायला अजून किती पिढ्या जातात हे सांगणे तूर्तास कठीण आहे.

प्राथमिक शिक्षणाची सुविधा गावोगावी वाडी-वस्त्यांवर पोहोचल्या असल्या तरी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाची सोय अजूनही नाहीच डोंगराळ भागात गावे आणि वाड्यावर त्या विखरून आहेत. शिवाय माध्यमिक विद्यालयाची सोय नसल्याने अनेक विद्यार्थ्यांसमोर पायपीट करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.विभागातील कसणी, वरचे घोटील, निगडे, मोडकवाडी, निवी, मत्रेवाडी, पाळशी, पानेरी, सातर वर्पेवाडी, पानेरी, माईंगडेवाडी आदी गावातील विद्यार्थ्यांना दररोज पायपीट करून माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी यावे लागते तसेच सपाटीच्या काही गावांतील विद्यार्थ्यांचीही स्थिती त्यापेक्षा काही वेगळी नाही बऱ्याच गावात एसटी, वाहनांची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना चालतच प्रवास करावा लागतोय. काहींच्या नशिबी एक-दोन किलोमीटर तर काहींच्या नशिबी दहा ते पंधरा किलोमीटरची पायपीट कायमच आहे. काही गावांच्या शाळांकडे जाण्याचा मार्ग ओढ्याने नद्यातून जात असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही कठीण होत आहे.

मोफत पास, मात्र एसटीच नाही..

राज्य शासनाच्या वतीने शिक्षण विभागासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकी अहिल्यादेवी होळकर योजनेद्वारे प्राथमिक शिक्षणातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी एसटीची मोफत प्रवास सुविधा केलेली आहे. या सुविधांच्या फायदा अजून ग्रामीण भागातील मुलींकडून मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे; मात्र पाटण तालुक्यातील अजूनही काही दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर मुलींना याचा फायदा घेता आलेला नाही.ढेबेबाडी विभागातील अनेक दुर्गम गावातील ग्रामस्थ व विद्यार्थिनी अजूनही एसटीचे तोंडही पाहिलेले नाही. त्यामुळे या विभागातील अनेक मुली या शासनाच्या अहिल्यादेवी होळकर योजनेच्या सुविधांपासून आजही वंचित आहेत. त्यांच्या नशिबी आजही शिक्षणासाठी पायपीट कायम आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी