शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा ‘लेट फी’चा प्रश्नही निकालात

By admin | Updated: February 3, 2015 23:22 IST

दोन दिवसात फॉर्म भरण्याची कार्यवाही : महाविद्यालय व्यवस्थापनाने तोंड उखडले, विद्यार्थ्यांसाठी विद्यापिठाचाही पुढाकार

कऱ्हाड : येथील शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तेराशे विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना ‘लेट फी’ भरावी लागणार का, हा प्रश्न मंगळवारी अखेर निकालात निघाला. विद्यार्थ्यांना विद्यापिठ नियमाप्रमाणे मुदत देण्यात येणार असुन त्या मुदतीत फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरावे लागणार नसल्याचा निर्वाळा महाविद्यालय व्यवस्थापनाकडून देण्यात आला.कऱ्हाडच्या शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रथम सत्राची परीक्षा डिसेंबर २०१४ मध्ये पार पडली. परीक्षा पुर्ण झाल्यानंतर ४५ दिवसात निकाल जाहिर होणे विद्यार्थ्यांना अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. याबाबत महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी संपर्क साधला असता विद्यापिठाने निकाल राखून ठेवल्याचा व त्याबाबत विद्यापिठाशी संपर्क साधण्याचा सल्ला महाविद्यालय व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी विद्यापिठाशी संपर्क साधला असता तुमच्या महाविद्यालयातील प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे विद्यापिठाकडून सांगण्यात आले. या परीस्थितीमुळे विद्यार्थी कोंडीत सापडले. इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांचा निकाल १६ जानेवारीला जाहिर झाला असताना त्यानंतर दहा ते बारा दिवस होऊनही आपला निकाल जाहिर न झाल्याने विद्यार्थ्यांत चिंतेचे वातावरण होते. तेराशे विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला ‘लोकमत’ने वाचा फोडली. या प्रकाराबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्वच शाखांचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहिर करण्यात आला. मात्र, निकाल जाहिर झाला असला तरी विद्यार्थ्यांच्या पेपर पुनर्तपासणी व दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना ‘लेट फी’ भरावी लागणार का, हे प्रश्न अनुत्तरीत होते. गत दोन दिवसांपासुन ‘लोकमत’कडून याचा पाठपुरावा केला जात होता. अखेर मंगळवारी याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनाने तोंड उघडले. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापिठ नियमाप्रमाणे २७ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच आवश्यकता वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर पुनर्तपासणीचा फॉर्म भरण्यासाठीची मुदत ७ फेब्रुवारीपर्यंत असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले. मुदतीत फॉर्म भरणाऱ्यांकडून विलंब शुल्क घेतले जाणार नसल्याचे सांगीतले जात असले तरी ही सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून त्यांचे प्रश्न तडीस नेणार असल्याची प्रतिक्रिया मंगेश सुरूसे याने दिली. (प्रतिनिधी)