शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वनसंपदा जगविण्यासाठी धडपड, सोनजाई डोंगरावरील झाडांचे पर्यावरणप्रेमींकडून संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 17:09 IST

पांडुरंग भिलारे वाई : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवू लागले आहे. एका बाजूला वणवे ...

पांडुरंग भिलारेवाई : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवू लागले आहे. एका बाजूला वणवे लावून डोंगर काळेकुट्ट करणारी अपप्रवृत्ती, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी खारीचा वाटा उचलणारे पर्यावरणप्रेमी आढळत आहेत. सोनजाई डोंगरात दररोज सकाळी फिरायला जाणारे झाडांना पाणी घालत आहेत.पर्यावरणाचे चक्र संतुलित चालण्यासाठी वृक्ष, पशुपक्षी, कीटक, सूक्ष्मजीव यांचे अस्तित्व महत्त्वाचे असते. प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचे भीषण दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाईजवळील सोनजाईच्या डोंगरात मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, दाम्पत्य यांनी वृक्षारोपण, संरक्षण व नियमित पाणी देण्याचा विडा उचलला आहे. याचबरोबर सोनजाईदेवी रस्ता परिसरात पक्षांसाठी पाण्याच्या कुंड्या ही लावण्यात आल्या आहेत.पावसाळ्यात या परिसरात वाई रोटरी क्लबतर्फे ७० रोपे लावली असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक बागडे यांनी दिली. वाई येथील व्यावसायिक संदीप घोरपडे, महेश पिसाळ, विमा विकास अधिकारी चंद्रशेखर घोणे यांनी सहकार्य करून जातिवंत रोपे लावून झाडांना संरक्षण केले आहे. यांच्यासह नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, अजित क्षीरसागर, अनिता क्षीरसागर, धनंजय घोडके हे नियमित वृक्षांना व पक्षांसाठी कुंड्या मध्ये पाणी घालण्याचे विधायक काम करत असतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर