शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

औंध : औंध येथील केदारेश्वरनजीकचा लोकवस्तीतील बंधारा निर्लेखित करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे ...

औंध : औंध येथील केदारेश्वरनजीकचा लोकवस्तीतील बंधारा निर्लेखित करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले.

औंध (ता. खटाव) येथील सिमेंट बंधाऱ्यात दूषित पाणी राहणार नाही, याबाबत कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांनी चार दिवसांत कार्यवाही करावी व बंधारा अतितत्काळ निर्लेखित करण्यासाठी सोमवारी प्रस्ताव सादर करावा, असे लेखी पत्र प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी दिल्यानंतर उपोषणकर्ते सागर जगदाळे यांनी सहाव्यादिवशी उपोषण मागे घेतले.

प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित ठिगळे, डॉ. विलास साळुंखे, ग्रामविकास अधिकारी चाँदशा काझी, मंडल अधिकारी गजानन कुलकर्णी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन बंधारा परिसराची पाहणी केली आणि सागर जगदाळे यांच्याबरोबर चर्चा केली. यामध्ये कृषी विभागाने आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्यविषयक अहवाल तसेच स्थळ फोटो घेऊन बंधारा निर्लेखित करण्यासाठी तत्काळ वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करावा. तसेच बंधाऱ्यातील दूषित पाणी भौगोलिक परिस्थितीमुळे उपाययोजना करता येत नाहीत. बंधारा नागरी वस्तीत असल्याने लोकांच्या आरोग्याच्या हितासाठी बंधारा निर्लेखित करावा, असा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करावा, असे प्रशासनाच्यावतीने लेखी स्वरुपात पत्र दिले. यावर सागर जगदाळे यांचे समाधान झाल्याने उपविभागीय अधिकारी कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन त्यांनी उपोषण सोडले.

यावेळी सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, दत्तात्रय जगदाळे, राजेंद्र माने, वसंत पवार, तानाजी इंगळे, गणेश चव्हाण, संदीप इंगळे, कृषी सहायक उत्तमराव तिकुटे, मोहन मदने, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

कोट..

औंध येथील केदारेश्वरनजीकच्या बंधाऱ्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते. प्रशासनाला निवेदन देऊनही काही फरक पडला नसल्याने लोकशाहीच्या मार्गाने उपोषण केले व सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे.

- सागर जगदाळे, उपोषणकर्ते, औंध

(चौकट)

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची मध्यस्थी

माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी प्रशासनाशी फोनवरून चर्चा करून बंधाऱ्याविषयी गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासन आणि उपोषणकर्ते सागर जगदाळे यांची सकारात्मक चर्चा झाली.

०६औंध

फोटो : - प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्याहस्ते सरबत घेऊन सागर जगदाळे यांनी उपोषण सोडले. (छाया - रशिद शेख)