शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

डोंगरी मावळ्यांच्या ‘पावसाळी लढाई’ला बळ

By admin | Updated: June 16, 2015 01:21 IST

कांदाटी खोऱ्यात उपक्रम : संपर्क तुटण्यापूर्वीच पोहोचली औषधे; मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज संघटनेचे साह्य--वन-जन जोडो अभियान...

राजीव मुळ्ये ल्ल सातारा  -पावसाळ्यात किमान दोन-अडीच महिने ज्यांचा जगाशी संपर्क तुटतो, त्या डोंगरी मावळ्यांच्या एकाकी लढाईला यावर्षी ‘वन-जन जोडो’ अभियानाचे भक्कम पाठबळ लाभले. कांदाटी खोऱ्यातील प्रमुख पाच आणि एकूण तेरा गावांमध्ये पावसाळ्यात पुरेल एवढा औषधसाठा पाऊस सुरू होण्यापूर्वीच पोहोच झाला. महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनच्या सातारा युनिटने कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली. खडतर आणि कष्टप्रद जीवन असणाऱ्या दुर्गम कांदाटी खोऱ्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्थानिकांचा जीवनसंघर्ष सुरू असतो. डोंगरात वाहनेच चालत नसल्यामुळे अवजड वस्तूही खांद्यावरूनच उचलून न्याव्या लागतात. अपार कष्ट केल्यामुळे या मंडळींना प्रामुख्याने सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. मणक्यांचे विविध आजार होऊन मान, पाठ, कमरेच्या वेदना सुरू होतात. पावसाळ्यात हे आजार अधिक प्रमाणात डोके वर काढतात.नेमक्या याच वेळी या डोंगरी माणसांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो. म्हाळुंगे, मोरणी, अरव, वलवण, शिंदी या प्रमुख पाच गावांसह १३ गावे एकाकी पडतात. शिवसागर जलाशयातील लाँचसेवा पूर्णत: बंद असते. बससेवा खेडपासून (कोकण) शिंदीपर्यंत आहे. तीही पावसाळ्यात बेभरवशाची असते. अतिपाऊस, दरड कोसळणे या कारणांनी बसही अनेकदा येत नाही. अशा वेळी आजार झाल्यास रुग्णाचे अतोनात हाल होतात. जीवरक्षक प्रणाली आसपास कुठेच उपलब्ध नाही.वन्यजीव विभाग आणि ‘ड्रोंगो’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे या भागात सप्टेंबर २०१४ पासून ‘वन-जन जोडो’ अभियान सुरू आहे. या मोहिमेद्वारे स्थानिकांना केवळ पर्यायी उत्पन्नस्रोत आणि पायाभूत सुविधा पुरविणे एवढेच उद्दिष्ट न मानता एकंदर कल्याण डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर यावर्षी पावसाळ्यापूर्वीच ग्रामस्थांना औषधे घरपोच करण्यात आली. थंडीताप आणि सर्वसाधारण आजारांबरोबरच सांधे, मणके आणि पाठीच्या आजारांवरील औषधे या भागात अधिक प्रमाणात देण्यात आली आहेत. अ‍ॅलोपथी आणि आयुर्वेदिक औषधेही या मोहिमेत देण्यात आली. ग्रामस्थांना औषधांची व्यक्तिगत पाकिटे देण्यात आली असून, कोणते औषध कोणत्या आजारावर, कसे, किती आणि कधी घ्यायचे, याबाबत सूचना प्रत्येक पाकिटासह देण्यात आल्या आहेत. विभागीय वनअधिकारी एम. एम. पंडितराव, सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल ए. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सुनील भोईटे, डॉ. अश्विनी माळकर यांच्यासह वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. स्थानिक रोपांना ‘ब्रँड व्हॅल्यू’‘वन-जन जोडो’ अभियानांतर्गत या खोऱ्यात प्रायोगिक तत्त्वावर रोपवाटिका सुरू करण्यास प्रारंभ झाला आहे. स्थानिक अधिवासात वाढू शकतील, अशी दुर्मिळ रोपे तयार करून त्यांना ‘ब्रँड व्हॅल्यू’ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या दÞृष्टीने ग्रामस्थांना रोपांची यादी देण्यात आली होती. स्थानिकांनी या झाडांच्या बिया गोळा केल्या असून, यंदाच्या पावसाळ्यात त्या गादीवाफ्यावर पेरण्यात येतील. उगवण झाली की रोपे पिशवीत कशी भरायची याचे प्रशिक्षण ‘ड्रोंगो’ने स्थानिकांना दिले आहे. भविष्यकाळात गावठी आंब्याचे उत्कृष्ट वाण, कापा फणस , मोठे जांभूळ, पांढरा पळस, कदंब, गारदर वेल, बकुळ अशी रोपे या वाटिकेत तयार होतील आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल.