शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

आधी रणनीती सरदारांची; नंतर तयारी रणांगणाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा परिषदेतील काही सभापती बदलाच्या हालचाली जोरात सुरू असून, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख ...

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा परिषदेतील काही सभापती बदलाच्या हालचाली जोरात सुरू असून, राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील रणनीतीनंतर साताऱ्यात येऊन रणांगणाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे सभापतींची लवकरच खांदेपालट होऊ शकते.

२०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही सदस्यांनी सभापतिपद मिळावे म्हणून देव पाण्यात घातले आहेत. कारण, पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर मागीलवर्षी जानेवारी महिन्यात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यानंतर ९ जानेवारीला सभापतींची निवड झाली होती. सभापतींची निवड होण्यापूर्वी साताऱ्यातील झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सभापतिपदाचे दावेदार मागे पडले आणि अनपेक्षितपणे काही नावे समोर आली.

अर्थ व शिक्षण समिती सभापतिपदी मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापतिपदी मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती म्हणून कल्पना खाडे आणि महिला व बालकल्याणच्या सभापतिपदी सोनाली पोळ यांचे नावे जाहीर करण्यात आले. पण, त्याचवेळी राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी एक वर्षासाठी पदे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यावेळी नाराज झालेले दावेदार वर्ष कधी संपते याची वाट पाहत होते. आता वर्ष पूर्ण झाल्याने पुन्हा त्यांनी तयारी सुरू केली. त्यासाठी नेत्यांच्या भेटींचा सपाटाच लावला आहे.

नवीन घडामोडीत मानसिंगराव जगदाळे हे सभापतिपदावर कायम राहण्याची शक्यता आहे, तर कृषी आणि समाजकल्याणसाठी बापूराव जाधव, धैर्यशील अनपट, डॉ. अभय तावरे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. तसेच महिला व बालकल्याणसाठीही डॉ. भारती पोळ, दीपाली साळुंखे, अर्चना रांजणे यांची नावे आघाडीवर आहेत. डॉ. पोळ यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे सभापतिपदाबाबत मागणी केल्याचीही माहिती मिळत आहे. सध्या राजकीय घडामोडी वेगाने वाढू लागल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

चौकट :

बारामतीकरांचा सल्ला आवश्यकच...

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष किंवा सभापतिपदाबाबत निर्णय घेताना बारामतीचा सल्ला घ्यावा लागतोच. विशेष करून उपमुख्यमंत्री अजित पवार हे यामध्ये लक्ष घालतात. त्यानंतर पुढील सूत्रे हलतात. आताही सभापती बदलाबाबत रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे व जिल्ह्यातील अन्य काही राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होत असल्याची माहिती मिळत आहे. ही बैठक मंगळवार किंवा बुधवारी होऊ शकते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सर्व कार्यवृत्तांत त्यांच्या कानावर घालण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील राजकीय दिशा ठरविण्यात येणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

...................................................................