शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
3
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
4
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
5
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
6
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
7
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
8
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
9
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
10
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
11
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
12
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
13
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
14
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
15
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
16
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
17
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
18
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
19
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
20
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:02 IST

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. पाण्याच्या ...

दशरथ ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. पाण्याच्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील कृष्णा व नीरा खोºयातील धरणाचा पाणीसाठा तीस टक्क्यांच्या खाली आल्याने स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीवापराचे योग्य नियोजन करणे गरजेचे बनले आहे.नीरा व कृष्णा खोºयातील धरणांच्या पाणीसाठ्याचा मागील चार महिन्यांत अनिर्बंध उपसा झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या मध्यावरच पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. गेल्या नीरा खोºयातील नीरा देवधर, भाटघर व वीर या तिन्ही धरणांतील पाणीसाठा साठ टक्क्यांपेक्षा जास्त होता. या तुलनेत यावर्षी नीरा खोºयातील नीरा देवधर १३ .८१ टक्के, भाटघर १९.१७ टक्के व वीर धरणात केवळ ५०.०६ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. तर कृष्णा खोºयातील कोयना धरणात ४५.०१ टक्के, धोम १४.७४ टक्के, कण्हेर ३४.७२ टक्के, धोम-बलकवडी २०.९२ टक्के, उरमोडी २५.२२ टक्के तर तारळी धरणात ४६.३७ टक्के एवढेच पाणी शिल्लक आहे.यावर्षी तापमान ४० अंशांच्या जवळपास आहे. पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यावर्षी टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे तसेच सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत-जास्त वापर करून पाणी काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर अनधिकृत पाणी उपसा न करता सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.बळीराजा हवालदिलनीरा खोºयातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो. येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांत यावर्षी सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पावसाअभावी यंदा शेतीचा हंगामही अत्यल्प उत्पादनाचा झाला आहे. उन्हामुळे पाण्याची गंभीर स्थिती यावर्षी दिसू लागल्याने बळीराजा हवालदिल झालेला पाहावयास मिळत आहे.