शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

नीरा-कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थिती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:02 IST

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. पाण्याच्या ...

दशरथ ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. पाण्याच्या भीषण टंचाईला सर्वसामान्य जनतेला सामोरे जावे लागणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील कृष्णा व नीरा खोºयातील धरणाचा पाणीसाठा तीस टक्क्यांच्या खाली आल्याने स्थिती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीवापराचे योग्य नियोजन करणे गरजेचे बनले आहे.नीरा व कृष्णा खोºयातील धरणांच्या पाणीसाठ्याचा मागील चार महिन्यांत अनिर्बंध उपसा झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या मध्यावरच पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. गेल्या नीरा खोºयातील नीरा देवधर, भाटघर व वीर या तिन्ही धरणांतील पाणीसाठा साठ टक्क्यांपेक्षा जास्त होता. या तुलनेत यावर्षी नीरा खोºयातील नीरा देवधर १३ .८१ टक्के, भाटघर १९.१७ टक्के व वीर धरणात केवळ ५०.०६ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. तर कृष्णा खोºयातील कोयना धरणात ४५.०१ टक्के, धोम १४.७४ टक्के, कण्हेर ३४.७२ टक्के, धोम-बलकवडी २०.९२ टक्के, उरमोडी २५.२२ टक्के तर तारळी धरणात ४६.३७ टक्के एवढेच पाणी शिल्लक आहे.यावर्षी तापमान ४० अंशांच्या जवळपास आहे. पाण्याचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यावर्षी टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे तसेच सूक्ष्म सिंचनाचा जास्तीत-जास्त वापर करून पाणी काटकसरीने वापरावे. त्याचबरोबर अनधिकृत पाणी उपसा न करता सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.बळीराजा हवालदिलनीरा खोºयातील धरणाच्या पाण्याचा उपयोग सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तसेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती ते इंदापूरपर्यंत होत असतो. येथील शेती याच पाण्यावर अवलंबून असते. सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांत यावर्षी सरासरीपेक्षा खूपच पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पावसाअभावी यंदा शेतीचा हंगामही अत्यल्प उत्पादनाचा झाला आहे. उन्हामुळे पाण्याची गंभीर स्थिती यावर्षी दिसू लागल्याने बळीराजा हवालदिल झालेला पाहावयास मिळत आहे.