शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

तारळे, ढेबेवाडी खोऱ्यांसह आंबेनळी भागातील एसटीच्या फेऱ्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST

पाटण तालुक्यातील आंबेघर या परिसरात अनेक गावात भुस्खलन होऊन गावेच्या गावे गाढली गेली होती. तर डोंगराचा कडाच कोसळल्याने अनेक ...

पाटण तालुक्यातील आंबेघर या परिसरात अनेक गावात भुस्खलन होऊन गावेच्या गावे गाढली गेली होती. तर डोंगराचा कडाच कोसळल्याने अनेक गावांमध्ये चालत जाणेही अवघड झाले होते. त्यामुळे काहीवेळा तर दीड-दोन तास चालत जावे लागत होते. अशा परिस्थितीत एसटीची वाहतूक करणे अवघडच होते. महाबळेश्वर तालुक्यातील परिस्थितीही काही वेगळी नव्हती. केळवली, आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने अनेक गावांचा एसटीचा संपर्क तुटला होता. त्यामुळे प्रतापगडाकडे जाणाऱ्या गावातील वाहतूक बंद होती. याच काळात एक व्यक्ती प्रचंड आजारी होती. मात्र रुग्णालयातही नेता येत नव्हते. त्यामुळे चक्क जेसीबीच्या समोरील खोऱ्यात बसवून पलीकडे सोडण्यात आले होते. आंबेनळी घाटातील वाहतूक आता सुरू केली असली, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एसटीला फेऱ्या सुरू करण्याबाबत अद्याप पत्रव्यवहार केलेला नाही.

चौकट

आंबेनळी घाटात वाहतूक बंदच

महाबळेश्वरकडून महाडकडे जाणाऱ्या मार्गावरील आंबेनळी घाटात जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. या घाटातून हलक्या वाहनांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र बांधकाम विभागाने अजूनही एसटी प्रशासनाला वाहतुकीसाठी परवानगी दिलेली नाही.

अन्य मार्गाने वाहतूक सुरू

महाबळेश्वरमधून तापोळ्याकडे एसटीची वाहतूक केली जाते. मात्र अजूनही तापोळ्यापासून आतील बाजूला जाणाऱ्या गावांमध्ये सायकलनेही जाता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने काही वेळेस एसटीच्या फेऱ्या वळविल्या आहेत. कास बंगल्यापर्यंत गाड्या जात आहेत. त्याचप्रमाणे पाटण तालुक्यातही अनेक मार्गावर वाहतूक वळवावी लागली आहे.

एसटीचे उत्पन्न घटले

१. महाबळेश्वर, पाटण तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे खासगी वाहनांची संख्याही कमी आहे. त्यामुळे एसटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे एसटीच्या फेऱ्या बंद कराव्या लागल्या.

२. महाबळेश्वर आगाराला कोरोनापूर्वी पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र आता ते घटून चक्क एक लाखावर आले आहे. त्यामुळे एसटी अडचणीत आली आहे.

कोट

आतील वाहतूक बंदच

महाबळेश्वरपासून तापोळापर्यंत एसटीने वाहतूक केली जाते. मात्र आतील भागातील येरणा, तेटली या गावांमध्ये जाणारे रस्ते अजूनही खराबच आहेत. त्यामुळे एसटी जाऊच शकत नाही.

- नामदेव पतंगे,

आगार व्यवस्थापक, महाबळेश्वर

चौकट

गणपतीमुळे वाहतुकीवर परिणाम

सातारा विभागातून शंभर गाड्या मुंबईला देण्यात आल्या आहेत. हे करत असताना प्रत्येक आगारातून गाड्या पाठविण्याचे नियोजन केले आहे. यामुळे त्या त्या आगारातील ग्रामीण फेऱ्यांवर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. मात्र शाळा-महाविद्यालय अजूनही बंद असल्याने त्यांचा फार मोठा फटका प्रवाशांना जाणवत नाही.