शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
2
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
3
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
4
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
5
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
6
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
7
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
8
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
9
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
10
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
11
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
12
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
13
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
14
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
15
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
16
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
17
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
18
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
19
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
20
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
Daily Top 2Weekly Top 5

तारळे, ढेबेवाडी खोऱ्यांसह आंबेनळी भागातील एसटीच्या फेऱ्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST

पाटण तालुक्यातील आंबेघर या परिसरात अनेक गावात भुस्खलन होऊन गावेच्या गावे गाढली गेली होती. तर डोंगराचा कडाच कोसळल्याने अनेक ...

पाटण तालुक्यातील आंबेघर या परिसरात अनेक गावात भुस्खलन होऊन गावेच्या गावे गाढली गेली होती. तर डोंगराचा कडाच कोसळल्याने अनेक गावांमध्ये चालत जाणेही अवघड झाले होते. त्यामुळे काहीवेळा तर दीड-दोन तास चालत जावे लागत होते. अशा परिस्थितीत एसटीची वाहतूक करणे अवघडच होते. महाबळेश्वर तालुक्यातील परिस्थितीही काही वेगळी नव्हती. केळवली, आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने अनेक गावांचा एसटीचा संपर्क तुटला होता. त्यामुळे प्रतापगडाकडे जाणाऱ्या गावातील वाहतूक बंद होती. याच काळात एक व्यक्ती प्रचंड आजारी होती. मात्र रुग्णालयातही नेता येत नव्हते. त्यामुळे चक्क जेसीबीच्या समोरील खोऱ्यात बसवून पलीकडे सोडण्यात आले होते. आंबेनळी घाटातील वाहतूक आता सुरू केली असली, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एसटीला फेऱ्या सुरू करण्याबाबत अद्याप पत्रव्यवहार केलेला नाही.

चौकट

आंबेनळी घाटात वाहतूक बंदच

महाबळेश्वरकडून महाडकडे जाणाऱ्या मार्गावरील आंबेनळी घाटात जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. या घाटातून हलक्या वाहनांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र बांधकाम विभागाने अजूनही एसटी प्रशासनाला वाहतुकीसाठी परवानगी दिलेली नाही.

अन्य मार्गाने वाहतूक सुरू

महाबळेश्वरमधून तापोळ्याकडे एसटीची वाहतूक केली जाते. मात्र अजूनही तापोळ्यापासून आतील बाजूला जाणाऱ्या गावांमध्ये सायकलनेही जाता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने काही वेळेस एसटीच्या फेऱ्या वळविल्या आहेत. कास बंगल्यापर्यंत गाड्या जात आहेत. त्याचप्रमाणे पाटण तालुक्यातही अनेक मार्गावर वाहतूक वळवावी लागली आहे.

एसटीचे उत्पन्न घटले

१. महाबळेश्वर, पाटण तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे खासगी वाहनांची संख्याही कमी आहे. त्यामुळे एसटी हेच एकमेव वाहतुकीचे साधन होते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे एसटीच्या फेऱ्या बंद कराव्या लागल्या.

२. महाबळेश्वर आगाराला कोरोनापूर्वी पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र आता ते घटून चक्क एक लाखावर आले आहे. त्यामुळे एसटी अडचणीत आली आहे.

कोट

आतील वाहतूक बंदच

महाबळेश्वरपासून तापोळापर्यंत एसटीने वाहतूक केली जाते. मात्र आतील भागातील येरणा, तेटली या गावांमध्ये जाणारे रस्ते अजूनही खराबच आहेत. त्यामुळे एसटी जाऊच शकत नाही.

- नामदेव पतंगे,

आगार व्यवस्थापक, महाबळेश्वर

चौकट

गणपतीमुळे वाहतुकीवर परिणाम

सातारा विभागातून शंभर गाड्या मुंबईला देण्यात आल्या आहेत. हे करत असताना प्रत्येक आगारातून गाड्या पाठविण्याचे नियोजन केले आहे. यामुळे त्या त्या आगारातील ग्रामीण फेऱ्यांवर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. मात्र शाळा-महाविद्यालय अजूनही बंद असल्याने त्यांचा फार मोठा फटका प्रवाशांना जाणवत नाही.