शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्वारी हे गरिबांचे धान्य होते. गहू हा सणालाच वापरला जात होता तर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्वारी हे गरिबांचे धान्य होते. गहू हा सणालाच वापरला जात होता तर शहरात चपातीला स्थान होते. पण, आरोग्याच्यादृष्टीने ज्वारीचे महत्त्व वाढले आहे. त्यातच गव्हाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे गव्हाचा दर कमी झाला आहे. त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारीची श्रीमंती अधिक वाढली असल्याने शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे.

लोकांकडून आहारात प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, गहू या धान्याचा अधिक उपयोग करण्यात येतो. काही प्रमाणात नाचणी, मका यांचाही वापर केला जातो. ३० वर्षांपूर्वी ज्वारीला आहारात अधिक स्थान होते तर गहू सणाला व पाहुणे मंडळी आली की वापरला जाता होता. पण, गेल्या काही वर्षांत ज्वारीपेक्षा गव्हाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे गव्हाचा दर कमी झाला आहे. त्यातच डॉक्टरही ज्वारी आरोग्यासाठी चांगली असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारीला आहारात प्राधान्य मिळत चालले आहे. भाकरी रोज खाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. तर चपाती खाणारे नागरिक शहरी भागात अधिक आहेत.

गेल्या काही वर्षांत ज्वारीचे उत्पादन कमी होत आहे तर गव्हामध्ये संकरित वाण आले आहेत. यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गव्हाचा दर कमी होत आहे तर ज्वारी महागच होत चालली आहे. यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ लागले आहेत.

...................

अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रति क्विंटल दर)

ज्वारी गहू

१९८० ९०० १०००

१९९० १२०० १४००

२००० १८०० २०००

२०१० २५०० २२००

२०२० ३००० २८००

२०२१ ३६०० ३०००

......................................................

आपल्या आरोग्याची श्रीमंती ज्वारीतच...

१. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरिराला पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमधून शरिराला मुबलक प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्वारीच्या भाकरीमुळे अन्नाचे सहज पचन होते.

२. ग्रामीण भागात आजही ज्वारीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे कदाचित शहरीपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच ज्वारी फायदेशीर ठरत आहे.

३. ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो, त्यांनी चपातीऐवजी आहारात ज्वारीचा समावेश करावा, असे सांगण्यात येते.

...............................................................

जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन टिकून...

सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात ज्वारीचे उत्पादन घेण्यात येते. खरीपमध्ये सातारा, जावळी, कऱ्हाड, वाई, पाटण या तालुक्यांत ज्वारीचे पीक घेतले जाते. तर पूर्व भागात माण, खटाव आणि फलटण तालुक्यात रब्बीत ज्वारीचे पीक घेण्यात येते. माण, खटाव तालुक्यांमधील वातावरण ज्वारीसाठी पोषक असते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी ज्वारीचे पीक घेतात. तसेच गहूही काही प्रमाणात करतात. जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र व उत्पादन टिकून असल्याचे दिसून येत आहे.

.............................................

भाकरी परवडायची म्हणून खायचो...

आमच्या काळात गव्ह कमी व्हायचा. त्यातच शेतात जुंधळा केला जायचा. गव्हाला दर असल्यामुळे परवडणारा जुंधळा घरात असायचा. त्यामुळे जेवणात जोंधळा भाकरीला महत्त्व असायचं. आताही तीच खातू.

- बाबासाहेब आटपाडकर

..............................

३० वर्षांपूर्वी बाजरी आणि ज्वारी हेच प्रमुख पीक आम्ही घ्यायचो. त्यातून ज्वारीची भाकरी वर्षभर खात होतो. चपाती सण, पाहुणे आले की करत होतो. पण, आता गहू स्वस्त झाला असला तरी सवयीमुळे ज्वारीची भाकरीच खातो.

- सुरेश हांगे

......................................................

चपाती आवडीने खातो...

जेवणात ज्वारी, बाजरीची भाकरी असते. तसेच चपाती खाण्याचे प्रमाणही वाढले आहे. सवय असल्याने चपातीलाच अधिक प्राधान्य असते. दररोज एकवेळ तरी चपाती आवडीने खाल्ली जाते.

- संजय चव्हाण

.........................

शहरी भागातील जेवणात अजूनही चपातीचे स्थान टिकून आहे. मुलांना आणि आम्हालाही चपाती आवडते. त्यामुळे कधीतरी ज्वारी आणि बाजरीची भाकरी खातो.

- बाळासाहेब लंगुटे

.................................................................