शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
7
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
8
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
9
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
10
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
11
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
12
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
13
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
15
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
16
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
17
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
18
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
19
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
20
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपूर येथील स्वातंत्र्यसेनानी सोपानराव घोरपडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:21 IST

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकारमधील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर गटाचे प्रमुख सोपानराव कुंडलिक घोरपडे (आप्पा) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते.

ठळक मुद्देरहिमतपूर येथील स्वातंत्र्यसेनानी सोपानराव घोरपडे यांचे निधनप्रतिसरकारच्या चळवळीतील सातारा जिल्ह्यातील अखेरचा दुवा निखळला

रहिमतपूर : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकारमधील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर गटाचे प्रमुख सोपानराव कुंडलिक घोरपडे (आप्पा) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. घोरपडे यांच्या निधनाने प्रतिसरकारच्या चळवळीतील सातारा जिल्ह्यातील अखेरचा दुवा निखळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, नात, नातू, नात सून व त्यांची मुले असा परिवार आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून सोपानराव घोरपडे यांना ओळखले जात होते. सोपानराव घोरपडे यांचा जन्म १५ मे १९२० रोजी रहिमतपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले.

१९६५ मध्ये प्रभात फेऱ्यांत सहभागी होऊन सोपानराव घोरपडे यांनी स्वातंत्र्य लढ्यास सुरुवात केली. १९३६ ते १९३८ या कालावधीत विद्यार्थी संघटनेचा तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.

इंग्लंडचे सहावे जॉर्ज गादीवर बसले तेव्हा रहिमतपूर येथील विद्यार्थ्यांना खाऊ व बिल्ले वाटप केले होते. परंतु विद्यार्थी संघटनेने खाऊ व बिल्ले फेकून देत निषेध केला. १९३९ मध्ये कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व १९४० मध्ये कोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सोपानराव घोरपडे यांनी भूषवले आहे.त्यावेळी सुरू झालेल्या जागतिक युद्धावेळी ब्रिटिश सरकारने घेतलेल्या देशविरोधी निर्णयाविरुद्ध प्रचार केल्याबद्दल सोपानराव घोरपडे यांना तीन वर्षे तीन महिन्यांची शिक्षा झाली. ब्रिटिश सरकारने कितीही त्रास दिला तरी देशहितासाठी लढण्याचे काम घोरपडे आप्पांनी कायम सुरू ठेवले.

रहिमतपूर येथे झालेल्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोपानराव घोरपडे यांच्या कामाचे कौतुक केले होते. १९४२ च्या  चले जाव आंदोलनामध्ये पुसेगाव येथे शासकीय इमारत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून सोपानराव घोरपडे यांना एक वर्ष स्थानबद्ध म्हणून कारावास भोगावा लागला. त्यानंतर ब्रिटिश सरकारने घोरपडे आप्पा यांच्यावर अटक वॉरंट काढले.

यावेळी आप्पांनी भूमिगत होवून सुमारे ७५ लोकांचा गट तयार केला. या गटाच्या माध्यमातून जनतेला त्रास देणाऱ्या गुंडांना शिक्षा देण्याची कामे केली. तसेच गावोगावचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली.

या कालावधीतच भूमिगतांना अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पोलसि बंदोबस्त वाढविण्यात आला. त्यामुळे सोपानराव घोरपडे मुंबईला गेले. मुंबई येथे राष्ट्र सेवा दल, हिंदी वर्ग व साक्षरता प्रसार यासारखी कामे केली. स्वातंत्र्य संग्रामात सोपानराव घोरपडे यांनी मोठे योगदान दिले.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सातारा जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष म्हणून १९५० ते १९५२ या कालावधीत त्यांनी काम पाहिले. रहिमतपूर नगरपरिषद व विविध सहकारी संस्थांतील महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केले.

जिल्हा स्वातंत्र्यसैनिक गौरव समिती व जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ९ आॅगस्ट २००७ रोजी त्यांचा दिल्लीत तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.सोपानराव घोरपडे यांच्यावर ब्रह्मपुरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर