शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कुणाचं भाग्य फळफळलं.. तर कुणाचं नशीब फुटलं!

By admin | Updated: September 26, 2014 23:32 IST

लगाव बत्ती

‘नशीब बदलायला वेळ नाही लागत!’ असं कधीतरी कुठं तरी जाहिरातीत आम्ही पामरांनी वाचलेलं; पण एकाच वेळी ‘कुणाचं भाग्य फळफळलं’ तर ‘कुणाचं नशीब फुटलं’ अशा विरोधभासाच्या घटना पाहण्याचा योग मात्र सातारकरांनी अनुभवलेला. काय सांगू रावऽऽ कालपर्यंत जिथं साधं चिटपाखरूही फिरकत नव्हतं, तिथं आज अकस्मातपणे दहा हजारांची ‘लड’ उडाली... अन् जिथं गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड धामधूम सुरू होती, तिथं क्षणाधार्थ सामसूम निर्माण झाली. ‘महायुती’ अन् ‘आघाडी’च्या आकस्मिक घटस्फोटानंतर अनेक इच्छुक म्हणे, अनाथ झाले... तर अनेकांना राजकीयदृष्ट्या आधार मिळाला.साताऱ्यात ‘बाबाराजें’च्या विरोधात ‘दीपक पवार’ की ‘रवी पवार’ असा प्रश्न चर्चेत असताना आज अचानक ‘रजनी पवार’ नाव पुढं आलं. आता याला कारणीभूत अजित पवार आहेत, हा भाग वेगळा; कारण ‘स्वतंत्र लढलो तर राष्ट्रवादीलाच सर्वाधिक फायदा होईल, ’ असं ‘पीपीटी’ (कॉर्पोरेट कंपन्यांच्या भाषेत ‘पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन’) म्हणे अजितदादांनी थोरल्या काकांसमोर केलेलं. मग काय, आजपर्यंतचा अनुभव बाजूला ठेवून काकांनी दादांवर विश्वास टाकलेला.कोरेगावात किरण बर्गेंना आज अकस्मात मुंबईत बोलवून घेण्यात आलं. गावोगावच्या शिवारात ‘कणसे’ फुलत असतानाच अकस्मातपणे काँग्रेस परिवारात आशेचा ‘किरण’ चमकला होता. मात्र, शेवटच्या क्षणी ‘कणसें’नाच लॉटरी लागली. लोकसभेच्या खर्चाचा ताळमेळ लावण्यात अजूनही मग्न असणाऱ्या जाधवांच्या पुरुषोत्तमांकडं बघून म्हणे ‘वाई-खंडाळ्यात कमळ’ फुललं. लोकसभेला मोदींची किटली जशी कऱ्हाडात फिरली होती, तसं मोदीचं कमळ वाईत फुलवण्याची संधी पक्षानं त्यांना स्वत:हून दिलीय. फलटणमध्ये मात्र, दिगंबरांची खेळी त्यांच्यावरच उलटलीय. महिनाभरापूर्वी ‘स्वाभिमानी’त मोठ्या थाटामाटानं प्रवेश केलेल्या आगवणेंना म्हणे आता पुन्हा एकदा काँग्रेसचा ‘अभिमान’ वाटू लागलाय; कारण फलटणचे हिंदुराव म्हणे, कधीच काँग्रेसच्या विरोधात जाणार नाहीत. तशीच गत पाटणच्याही हिंदुरावांची झालीय. पाटणच्या आमदारकीशी देणं-घेणं नसल्याच्या थाटात वावरणारे हिंदुराव अचानकपणे चर्चेत आलेत. त्यांनी बाबांच्या ‘राहुल’ला पाठिंबा दिलाय. पाटणचा राजकीय इतिहास बदलण्याची भाषा ढेबेवाडी खोऱ्यात घुमू लागलीय. कऱ्हाडात तर कुणालाच कुणाचा मेळ लागेनासा झालाय. आघाडी फुटली म्हणून ‘उत्तर’मध्ये बाळासाहेबांचा जीव कासावीस होऊ लागलाय, तर ‘दक्षिण’मध्ये त्यांचेच बंधू सुभाषराव यांचा चेहरा भलताच फुललाय. ‘उत्तर’मध्ये ‘धैर्यशील’तर म्हणे भलत्याच खुशीत गाड्या भरून गावोगावी पेढे वाटून आलेत. मात्र, ‘दादा..निवडणूक अजून व्हायचीय!’ असं कार्यकर्त्यांनी हळूच कानात सांगितल्यावर त्यांचे पाय जमिनीवर आलेत. अशा बऱ्याच गमती-जमती आजूबाजूला घडू लागल्यात. यावर आपला ‘वॉच’ आहेच म्हणा.----सचिन जवळकोटे