शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

सामाजिक बांधिलकी फलकावर झळकली

By admin | Published: October 12, 2015 9:01 PM

खंडाळा ग्रामपंचायतीचा उपक्रम : काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन

खंडाळा : ‘पाणी हे जीवन आहे,’ त्यामुळे पाण्याचा गरजेपुरता आणि काटकसरीने वापर केला पाहिजे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. विशेषत: यावर्षी गावोगावी दृष्काळसदृश परिस्थिती असल्याने पाण्याचे महत्त्व समजू लागले आहे. पाण्याच्या वापराबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी खंडाळा ग्रामपंचायतीने शहरातील चौकाचौकांमध्ये फलकाद्वारे जनप्रबोधन करण्याची नामीयुक्ती वापरली आहे. त्यामुळे एरव्ही कार्यक्रम वाढदिवसाचे फलक झळकणाऱ्या जागी पाणी वापराच्या सूचना देणारे फलक ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. सर्वत्र दुष्काळाची चिन्हे जाणवू लागली आहेत. त्यामुळे काही गावांतून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे पाणीचा योग्य वापर गरजेनुसार व काटकसरीने होणे आवश्यक आहे; परंतु हे लोकापर्यंत पोहोचविणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी खंडाळा ग्रामपंचायतींनी शहरातील प्रत्येक चौकात ‘काटकसरीने पाणी वापरा’ अशा आशयाचे फलक लावले आहेत. जाता येता हे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आपोपच लोकांचे प्रबोधन होत आहे. वाढदिवसाचे फलक लावण्यापेक्षा जनजागृतीसाठी हा मार्ग चांगला असल्याचे ग्रामस्थांमध्येच चर्चा आहे. (प्रतिनिधी)‘पाणी जपून वापरा’ हे तोंडी किती जणांना सांगणार? यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेऊन फलक लावले आहेत. त्याचा प्रभाव जाणवत आहे. लोकांनी यापुढील काळात पाण्याचा दक्षतेने वापर करावा.- सुरेश गाढवे, उपसरपंच खंडाळा