शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

..तर मी ‘रिपाइं’चे अध्यक्षपद सोडायला तयार; मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

By नितीन काळेल | Updated: October 3, 2024 17:33 IST

देशात समान नागरी कायदा यायला हवा 

सातारा : ‘रिपाइं’मध्ये अनेक गट आहेत. यामध्ये आमचीच ‘रिपाइं’ खरी आहे. त्यामुळे सर्वांनी आपापले गट बरखास्त करुन आमच्या ‘रिपाइं’त सहभागी व्हावे. प्रकाश आंबेडकर यांनीही ‘वंचित’ बरखास्त करावी. पक्षाचे ते अध्यक्ष होणार असतील तर मीही अध्यक्षपद सोडायला तयार आहे. तसेच देशात समान नागरी कायदा यायला हवा, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते. सातारा येथे ‘रिपाइं’चा मेळावा होता. यासाठी मंत्री आठवले आले होते.मंत्री आठवले म्हणाले, आमचा ’रिपाइं’ पक्ष देशात आहे. ‘रिपाइं’तील सर्व गट एकत्र आलेतर ताकद वाढणार आहे. कारण, एकेवेळी राज्यात चार खासदार निवडूण आले होते. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी सर्वजण एकत्र आले तर राज्यात मोठी ताकद उभी राहील. कारण स्वतंत्र लढून काहीच फायदा होत नाही.विधानसभा निवडणुकीसाठी ‘रिपाइं’ने २१ जागांची यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहे. आम्हाला ८ ते १० जागा मिळाव्यात ही अपेक्षा आहे, असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, महायुतीत आमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. आम्ही त्यांच्याबरोबर असल्याने गृहीत धरतात हे खरे. पण, त्याचबरोबर सन्मानही मिळायला हवा. आताच्या निवडणुकीत महायुती १७० जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल.

मंत्री आठवले म्हणाले..

  • राज्यात ‘रिपाइं’ला दोन महामंडळांची जबाबदारी मिळावी
  • राज्यपाल नियुक्त आमदारपदी एकाची नियुक्ती करावी
  • देशात समाननागरी कायदा यायला हवा. हिंदू-मुस्लीम समाज एकत्र आणण्यासाठी फायदा होईल
  • वक्फ बोर्ड कायद्यामुळे मुस्लीम समाजाचा फायदा होईल.
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये बहुमत घ्यावे. भारताबरोबर राहण्याची जनतेची इच्छा आहे.
  • पाकिस्तानने काश्मीरमधील आतंकवाद, घुसखोरी थांबवावी.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर