शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

..तर मी ‘रिपाइं’चे अध्यक्षपद सोडायला तयार; मंत्री रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर

By नितीन काळेल | Updated: October 3, 2024 17:33 IST

देशात समान नागरी कायदा यायला हवा 

सातारा : ‘रिपाइं’मध्ये अनेक गट आहेत. यामध्ये आमचीच ‘रिपाइं’ खरी आहे. त्यामुळे सर्वांनी आपापले गट बरखास्त करुन आमच्या ‘रिपाइं’त सहभागी व्हावे. प्रकाश आंबेडकर यांनीही ‘वंचित’ बरखास्त करावी. पक्षाचे ते अध्यक्ष होणार असतील तर मीही अध्यक्षपद सोडायला तयार आहे. तसेच देशात समान नागरी कायदा यायला हवा, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय  सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. यावेळी राजाभाऊ सरवदे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते. सातारा येथे ‘रिपाइं’चा मेळावा होता. यासाठी मंत्री आठवले आले होते.मंत्री आठवले म्हणाले, आमचा ’रिपाइं’ पक्ष देशात आहे. ‘रिपाइं’तील सर्व गट एकत्र आलेतर ताकद वाढणार आहे. कारण, एकेवेळी राज्यात चार खासदार निवडूण आले होते. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. यासाठी सर्वजण एकत्र आले तर राज्यात मोठी ताकद उभी राहील. कारण स्वतंत्र लढून काहीच फायदा होत नाही.विधानसभा निवडणुकीसाठी ‘रिपाइं’ने २१ जागांची यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली आहे. आम्हाला ८ ते १० जागा मिळाव्यात ही अपेक्षा आहे, असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, महायुतीत आमच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. आम्ही त्यांच्याबरोबर असल्याने गृहीत धरतात हे खरे. पण, त्याचबरोबर सन्मानही मिळायला हवा. आताच्या निवडणुकीत महायुती १७० जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल.

मंत्री आठवले म्हणाले..

  • राज्यात ‘रिपाइं’ला दोन महामंडळांची जबाबदारी मिळावी
  • राज्यपाल नियुक्त आमदारपदी एकाची नियुक्ती करावी
  • देशात समाननागरी कायदा यायला हवा. हिंदू-मुस्लीम समाज एकत्र आणण्यासाठी फायदा होईल
  • वक्फ बोर्ड कायद्यामुळे मुस्लीम समाजाचा फायदा होईल.
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये बहुमत घ्यावे. भारताबरोबर राहण्याची जनतेची इच्छा आहे.
  • पाकिस्तानने काश्मीरमधील आतंकवाद, घुसखोरी थांबवावी.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरRamdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर