शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानसूर्याची सही प्रतापसिंह हायस्कूलच्या नोंदवहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST

अवघ्या जगासाठी ज्ञानसूर्य म्हणून तेजोमय प्रकाश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा शहरातील श्री. छ. प्रतापसिंह ...

अवघ्या जगासाठी ज्ञानसूर्य म्हणून तेजोमय प्रकाश देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा शहरातील श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झाले. आजही हायस्कूलच्या रजिस्टरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भीवा रामजी आंबेडकर असे असून, १९१४ क्रमांकाला तशी नोंद आहे. शिवाय त्यांची या रकान्यात स्वाक्षरीही आहे.

प्रवेश घेताना या शाळेच्या मनाला आणि तेथील मातीच्या कणाला पुसटशी कल्पनासुध्दा नसेल की हा बाल भीवा भविष्यात जगातला आदर्श विद्यार्थी ठरेल. परंतु, हे सारं भीवाने आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरं ठरवलं. या सातारच्या मातीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य जगाला मिळाला.

या हायस्कूलमध्ये त्यांचे पाऊल पडले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळसुध्दा त्यांना प्राप्त झाले. म्हणूनच आज छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या जगाचे प्रेरणास्थान ठरले आहे. म्हणूनच आज हे हायस्कूल पाहायला देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. हे हायस्कूल म्हणजे ऐतिहासिक ठेवा असून, तो जतन करणे आवश्यक आहे.

अमेरिका, इंग्लंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा यथोचित गौरव झालाय. तेथील विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे उभारले आहेत. शिवाय तेथे ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ असे कोट केलेले आहे. म्हणजे ज्यांना जगात ज्ञानाचे प्रतीक संबोधले जाते आणि जगातला सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सातारचे विद्यार्थी होत. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा देदिप्यमान असा वारसा या हायस्कूलला लाभलाय ही तमाम सातरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारने या हायस्कूलला कोणत्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय दर्जा देणं गरजेचं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी राजवाडा येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासन स्तरावर साजरा होत आहे. साताऱ्यातील साहित्यिक अरुण विश्वंभर जावळे यांनी तब्बल १५ वर्ष महाराष्ट्र सरकारकडे या विद्यार्थी दिवसासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे सरकारने २०१७मध्ये विद्यार्थी दिवसाची घोषणा केली आणि छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हे नव्याने चर्चेत आले.

खरंतर, समाजाला जबरदस्त प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान करण्याच्या हेतूने ७ नोव्हेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ हा अत्यंत महत्त्वाचा ऊर्जादायी दिवस आहे. नवा, समृध्द, शक्तिशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या, दलित- वंचितांच्या आणि एकूणच सर्व समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाच्या मुख्य धारेत आणायचे असेल तसेच एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे पाहायचे असेल तर विद्यार्थी दिवस भारतभर साजरा होणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करत सातारचा हा विद्यार्थी दिवस भारतभर होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचेही साहित्यिक अरुण जावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ऐतिहासिक ठेवा म्हणून बाबासाहेबांची शाळेच्या नोंदवहीत असलेली सही जतन करणे तितकेच गरजेचे आहे.

केंद्र सरकार देणार सव्वाशे पत्रे...

शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासनस्तरावरुन साजरा व्हावा, यासाठी १५ वर्ष महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला. या आग्रहाला दाद देत सरकारने तीन वर्षांपूर्वी विद्यार्थी दिवस घोषित केला. आता हा विद्यार्थी दिवस भारतभर होण्यासाठी दिल्ली दरबारी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा करावी, यासाठी राज्यभरातून १ लाख २५ हजार पत्रे दिल्लीला पाठवणार असून, काही पत्रे रक्ताने लिहिणार असल्याचे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी सांगितले.

- सागर गुजर