शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

भल्या पहाटे डोंगरावर ग्रामस्थांचे श्रमदान

By admin | Updated: April 19, 2017 23:06 IST

वॉटर कप जिंकणारच : जायगावकरांचा निर्धार; गटतट विसरून एकत्र, पाणीदार गावासाठी कंबर कसली

औंध : जानेवारी, फेब्रुवारी महिना आला की ओढे, नाले आटतात. साडेतीनशे, चारशे फुटांवरील कूपनलिका कोरड्या पडतात. पाणीटंचाईमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून टँकरशीही नाते दृढ झालेले. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रचंड चटके सोसलेले जायगावकर पाणी बचतीसाठी कमालीचे जागृत झाले. त्यातूनच गाव पाणीदार करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ एकवटले आहेत. भल्या पहाटे ग्रामस्थ डोंगरावर जाऊन काम करीत आहेत. जायगावला मोठी नैसर्गिक देणगी लाभली आहे. उत्तर दिशेचा अपवाद वगळता तिन्ही बाजूंनी डोंगर आहे. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पाणी अडवले नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. दरवर्षी गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या चार वर्षांत कूपनलिका खोदून काहीजणांनी पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पाण्याची पातळी खालावल्यामुळे कूपनलिका कोरड्या पडल्या असून, पाण्यासाठी घातलेले लाखो रुपये वाया गेले आहेत. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या जायगावकरांना पाण्याचे महत्त्व समजल्याने गाव व परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरवून गाव पाणीदार करण्यासाठी ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला. या जलसाक्षर चळवळीत सहभागी होण्यासाठी लहानांपासून आबालवृद्ध सरसावले आहेत. भल्या पहाटे टिकाव, खोरे, पाटी घेऊन लोक डोंगर गाठतात. पाणी फाउंडेशनची गावात धूम असून, ओढ्याचे खोलीकरण, गाळ काढणे, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी खड्डे काढण्यात आले आहेत. डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी (डिप सीसीटी) समतल चर खोदण्याचे काम सुरू आहे. गाव पाणीदार करून वॉटर कप जिंकायचा या इर्षेने झपाटलेले ग्रामस्थ राजकीय मतभेद बाजूला सारून पाण्यासाठी राबत आहेत. (वार्ताहर) शासनावर अवलंबून न राहता देणगी...‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेत ग्रामस्थांनी ऐक्याची वज्रमूठ आवळली असून, श्रमदानाबरोबर लोकवर्गणीतून गाळ काढणे, खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. निधीसाठी शासनावर अवलंबून न राहता सर्व स्तरांतून लोकांनी देणगी गोळा करून कामाला वेगाने सुरुवात केली आहे. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग...पाणी फाउंडेशनच्या कामाला गती आल्याने गावागावात पाणीदार चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसुद्धा सरसावले आहेत. पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, तहसीलदार पवार-कार्डीले याशिवाय औंध पोलिस स्टेशनची टीमसुद्धा या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेत सहभागी झाली आहे.