शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

दुकानदारांचे अर्धे शटर कोरोना स्प्रेडरना खुणावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST

सातारा: इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधिताची संख्या कमी येत असतानाच सातारा मात्र याला अपवाद ठरत आहे. याची कारणे अनेक असली ...

सातारा: इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधिताची संख्या कमी येत असतानाच सातारा मात्र याला अपवाद ठरत आहे. याची कारणे अनेक असली तरी रस्त्यावर विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांना अद्यापही जरब बसलेली दिसत नाही. ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी जेव्हा साताऱ्यात लॉकडाऊन जाहीर झाला, तेव्हा १०० हून अधिकजणांवर गुन्हे दाखल केले गेले. मात्र, आता गुन्हे दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाली, पण बाहेर पडणाऱ्यांची संख्या मात्र तितकीच असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाने सर्व व्यवसाय ठप्प केले असले तरी कोरोनाची साखळी तोडणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ पोलिसांनी कारवाया केल्यानंतरच घरात थांबावे, अशाने कोरोनाची साखळी तुटणार नाही, तर दुसरीकडे पोलिसांनीही आता कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अनेकजण सध्या खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. या कोरोना स्प्रेडर लोकांवर खरंतर जरब असणे गरजेचे आहे. सातारा शहरांमध्ये सकाळी सात ते अकरा या वेळेत घरपोच भाजीपाला आणि किराणा मालाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, असे असताना अनेक दुकानदार दुकानाचे शटर अर्धे उघडे ठेवून विक्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हीच परिस्थिती भाजीपाला विक्रेत्यांचीही आहे. लोक खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग फैलावत आहे. सकाळी दहा ते अकरा या वेळेतच पोलिसांच्या कारवाया होत आहेत. मात्र, दुपारी बारानंतर पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत. याचाच अनेकजण गैरफायदा घेऊन काहीही काम नसताना इकडून तिकडे फिरत आहेत. काहीजण घरातून जुनी मेडिकलची फाईल घेऊन घराबाहेर पडत आहेत. पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांना हातात असलेली फाईल दाखवून आपली सुटका करून घेत आहेत. पुढे गेल्यानंतर पोलिसांना कसे गंडवले अशा तोऱ्यात अनेकजण शहरात मोकाट फिरत आहेत. या कोरोना स्प्रेडरवर खरंतर पोलिसांनी अत्यंत कडक धोरण अवलंबून कारवायांना वेग आणला पाहिजे.

चौकट : अनेकजण काढतायेत अंगावर आजार!

खोकला, सर्दी, ताप अशी लक्षणे असतानाही अनेकजण आजार अंगावर काढतात. प्रकृती खालावल्यानंतर अचानक मग रुग्णालयात धाव घेत आहेत. तोपर्यंत हा रुग्ण दहा ते बाराजणांना संसर्ग करून मोकळा झालेला असतो. त्यामुळे थोडी तरी लक्षणे आढळली तर आजार अंगावर न काढता तत्काळ रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे, तरच ही कोरोनाची लाट रोखू शकते.

चौकट : घरपोच सुविधा नावालाच!

शहरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक दुकाने उघडी असतात. हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे लोक खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. दुकानदारांना घरपोच सुविधा देणे परवडत नाही. त्यांच्या दुकानांमध्ये कामगारही नाहीत. त्यामुळे मग अनेक दुकानदार आपल्या दुकानाचे अर्धी शटर उडून गिऱ्हाईकांची वाट पाहत असतात.