शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवसागर’ २१ वर्षांनी आटला!

By admin | Updated: June 10, 2014 02:14 IST

बोटी बंद : पर्यटकांचा ओघ रोडावला; हॉटेल व्यवसाय ठप्प; डोंगराळ भागातील ग्रामस्थांना करावी लागतेय कोरड्या पात्रातून पायपीट

सातारा : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाचा भेगाळलेला तळ तब्बल २१ वर्षांनंतर दिसू लागला आहे. पाण्याची पातळी १९९३ नंतर प्रथमच इतकी खालावली असून, त्यामुळे बामणोली-तापोळा भागातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. बोटी बंद झाल्यामुळे परिसरातील तीन नद्यांच्या खोऱ्यांत वसलेल्या अनेक दुर्गम गावांमधील ग्रामस्थांना शिवसागराच्या आटलेल्या पात्रातून मोठी पायपीट करावी लागत आहे. जलाशयातील पाणी खूपच कमी झाल्यामुळे बामणोली आणि तापोळा या ठिकाणचे तीनही बोट क्लब बंद आहेत. बामणोलीत ‘भैरवनाथ’, तर तापोळ्यात ‘विशाल’ आणि ‘शिवसागर’ असे दोन बोट क्लब आहेत. जलाशयाच्या पलीकडे असणाऱ्या गावांतील ग्रामस्थांना ये-जा करण्याचे होड्या आणि लाँचेस हे एकमेव साधन आहे. काही नौका जिल्हा परिषदेनेही पुरविल्या आहेत. तथापि, त्यातील एकही आता पाण्यात दिसत नाही. सर्व नौका किनाऱ्यावर आणून ठेवण्यात आल्या आहेत. या विभागात तीन खोरी आहेत. सोळशी आणि कोयनेचा संगम तापोळ्याजवळ होतो, तर कोयना आणि कांदाटी नद्यांचा संगम शेंबडीजवळ होतो. या संगमांपर्यंत पाणी आटले असल्याने त्यापलीकडे असणाऱ्या गावांचा जलमार्ग बंद झाला आहे. यापैकी एका खोऱ्यात दरे, गाडवली, पिंपरी, अकल्पे, निवळी, लामज, वाघावळे, उचाट, कांदाट, काळोशी, म्हाळुंगे, चकदेव आदी दुर्गम गावे आहेत. बामणोलीपासून पुढे एका खोऱ्यात वाळणे, अहीर, पाली, खरोशी, रेणोशी आदी गावे आहेत. तिसऱ्या खोऱ्यात शिंदी, रवदी, अरव, कुसापूर, शेलटी, खिरखंडी अशी गावे आहेत. यातील काही गावांना जोडणारे मार्ग अनुक्रमे बामणोली आणि महाबळेश्वर येथून आहेत; मात्र ते खूपच लांबचे मार्ग आहेत. त्यामुळे या गावांमधील ग्रामस्थ सध्या शिवसागर जलाशयातून चालत ये-जा करीत आहेत. जलाशयातील कोरडा भाग शोधून चालावे लागत असल्याने खूप लांबचा वळसा ग्रामस्थांना घालावा लागत आहे. तापोळ्यापासून पुढे वानवडी, सौंदरी, वाघेरा ही गावे आहेत, तर बामणोलीच्या पुढे म्हावशी, तेटली, केळघर, सोळशी, आपटी, निपाणी, कुस, रामेघर, वाकी, लाखवड, गोगवे आदी गावे आहेत. जलाशयात पाणी असताना या गावांना नौकेतून जाता येते. आता जलाशय आटल्याने पात्रातील कोरडा भाग शोधून चालत जावे लागत आहे. काही वेळा वळिवाच्या सरी कोसळतात आणि काही ठिकाणी तात्पुरते पाणी साचते. अशा वेळी काही गावांचा संपर्क दोन ते चार दिवसांसाठी तुटतो. दरम्यान, धरणात बुडालेल्या जुन्या बामणोली गावाचे अवशेष उघड दिसू लागले आहेत. (प्रतिनिधी)