शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'शिवशंकर' पतसंस्थेचे व्यवहार ठप्प; ठेवीदार अस्वस्थ!

By प्रमोद सरवळे | Updated: October 20, 2022 21:47 IST

याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील लिंगायत समाजातील लोकांच्या पुढाकारातून सुमारे २५ वर्षांपूर्वी शिवशंकर नागरी पतसंस्थेची स्थापना झाली. व्यापारी लोकांनी सुरू केलेली ही पतसंस्था अल्पावधीतच नावारूपाला आली. त्यामुळे संस्थेच्या ठेवीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

प्रमोद सुकरे, कराड- सध्या दिवाळीची धामधूम जोरात सुरू आहे. बाजारपेठेत सर्वत्र गर्दी आहे. पण या सगळ्या गर्दीत आणि धावपळीत कराडच्या बाजारपेठेतील शिवशंकर नागरी पतसंस्था गेल्या १० दिवसापासून बंदच आहे. तेथील सगळेच व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्यात मोठी अस्वस्थता पसरली आहे.अनेकांनी उपनिबंधकांकडे लेखी अर्ज करून ठेवी परत करण्याची मागणी केली आहे. दिवाळीच्या तोंडावरच पतसंस्थेतील पैसे आणि लॉकरमधील दागिने मिळत नसल्याने सभासद, ठेवीदार आक्रमक होताना दिसत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील लिंगायत समाजातील लोकांच्या पुढाकारातून सुमारे २५ वर्षांपूर्वी शिवशंकर नागरी पतसंस्थेची स्थापना झाली. व्यापारी लोकांनी सुरू केलेली ही पतसंस्था अल्पावधीतच नावारूपाला आली. त्यामुळे संस्थेच्या ठेवीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुख्य बाजारपेठेतच संस्था असल्याने लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

  सध्या या पतसंस्थेत सुमारे २५ कोटींवर ठेवी आहेत. मात्र गत १० आक्टोंबर पासून पतसंस्थेचे दारच उघडलेले नाही. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. परिणामी ठेवीदार, खातेदार अस्वस्थ झाले आहेत. संस्थाच बंद असल्याने दत्तात्रय तारळेकर, रवींद्र मुंढेकर, अशोक संसुद्दी, उदय  हिंगमिरे यांच्यासह १०० वर ठेवीदारांनी ठेवी परत मिळत नाहीत त्या परत मिळाव्यात म्हणून उपनिबंधक कराड यांच्याकडे लेखी अर्ज दाखल केले आहेत. मात्र अद्याप तरी कोणतीच कार्यवाही झालेली दिसत नाही.

 संस्थेत गेले तर संस्था बंद अवस्थेत आहे. आणि संचालक मंडळाला भेटायला गेले तर संचालकही घरात भेटत नाहीत,त्यांचे फोन लागत नाहीत असे अनेक जण सांगतात. त्यामुळे ठेवीदारांच्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीच्या तोंडावर ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या लोकांच्या ठेवी, पैसे, दागिने केव्हा परत मिळणार? हा खरा प्रश्न आहे.

 अध्यक्षच म्हणतात कर्मचाऱ्यांनी अपहार केलाय ... -पतसंस्थेचे अध्यक्ष शरद मुंढेकर यांनी ६ ऑक्टोबर रोजी उपनिबंधक कराड यांना एक पत्रव्यवहार केला आहे. त्यात पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर कर्ज प्रकरण करून अपरातफर केली असल्याचे म्हटले आहे. सेवक वर्गाने संस्थेचे कर्ज प्रकरणाचे रेकॉर्ड मध्ये चुकीच्या नोंदी करून मंजूर कर्ज रकमेमध्ये फेरबदल करून स्वअक्षरांमध्ये जादाची रक्कम परस्पर लावून नोंद केली आहे. तरी दोषींवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे.

 ठेवीदारांच्या बैठकीत सगळेच आक्रमक -संस्थेच्या ठेवीदारांची दोन दिवसांपूर्वी येथील लिंगायत मठ संस्थेत बैठक झाली. या बैठकीला   ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी त्रासलेल्या ठेवीदारांनी संस्थेच्या संचालक मंडळासह कर्मचाऱ्या विरोधात आक्रमक मते मांडली. पैसे परत मिळाले नाहीत तर लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.

शिवशंकर पतसंस्थेच्या संदर्भात ठेवी परत मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकांनी आमच्या कार्यालयात केल्या आहेत. आम्ही संस्थेच्या संचालक मंडळाला त्यांचे अपूर्ण असणारे ऑडिट त्वरित सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. ते आँडिट आमच्याकडे आल्यानंतर पुढील निर्णय आम्ही घेणार आहोत.- संदीप जाधव, उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड

टॅग्स :bankबँकSatara areaसातारा परिसरKaradकराड