शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!

By admin | Updated: March 13, 2017 17:12 IST

दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीत

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीतशाहूपुरी (सातारा) : जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळांच्या चटक्यांची दाहकता जाणवत असतानाच शाहूपुरीमध्ये लाखो लिटर पाणी गटारीतून वाहून जात आहे. येथील दत्त दिगंबर कॉलनी, पवार कॉलनी, समता पार्क, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी परिसरातील जलवाहिनीला सुमारे पन्नास ठिकाणी गळती लागली आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यात सणासुदीच्या काळात अनेक गावांमधील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साताऱ्याच्या उपनगरांमध्येही काही दिवसांतच ही वेळ येणार आहे. या अवस्थेतही शाहूपुरीत विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. शाहूपुरीला पाणीपुरवठा करत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यातून दररोज लाखो लिटरचे पाणी वाया जात आहे. गळती लागल्यामुळे या परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साठत आहे. तेथून जाताना ज्येष्ठ नागरिक, तरुणींचे पाय घसरत असल्याने तेथून चालणेही अवघड बनत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हीच अवस्था असताना त्याकडे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.गळती लागल्यामुळे वाहनचालक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने वेळेतच लक्ष लागून येथील सर्व गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पाणी बचतीचे महत्त्व प्राधिकरणाला कधी कळणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.दुरुस्तीचे कर्मचारी अवेळीजीवन प्राधिकरणने या परिसरात जलवाहिनीच्या दुुरुस्तीसाठी कर्मचारी नेमले आहेत. परंतु ते कधीही वेळेवर उपलब्ध नसतात. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम कसेबसे घाई गडबडीत तात्पुरते करून तेथून पळ काढतात. त्यामुळे परत त्या जागेवर गळती लागते. गळती रोखणे हे संबंधित यंत्रणांचे कर्तव्यच ठरते. प्राधिकरणने मनमानी कारभारास वेळीच आवर न घातल्यास ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. शाहूपुरीत अनेक वर्षे पाणीपुरवठा गळतीचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन नसल्याने येथील नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. - भारत भोसले