शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!

By admin | Updated: March 13, 2017 17:12 IST

दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीत

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीतशाहूपुरी (सातारा) : जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळांच्या चटक्यांची दाहकता जाणवत असतानाच शाहूपुरीमध्ये लाखो लिटर पाणी गटारीतून वाहून जात आहे. येथील दत्त दिगंबर कॉलनी, पवार कॉलनी, समता पार्क, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी परिसरातील जलवाहिनीला सुमारे पन्नास ठिकाणी गळती लागली आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यात सणासुदीच्या काळात अनेक गावांमधील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साताऱ्याच्या उपनगरांमध्येही काही दिवसांतच ही वेळ येणार आहे. या अवस्थेतही शाहूपुरीत विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. शाहूपुरीला पाणीपुरवठा करत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यातून दररोज लाखो लिटरचे पाणी वाया जात आहे. गळती लागल्यामुळे या परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साठत आहे. तेथून जाताना ज्येष्ठ नागरिक, तरुणींचे पाय घसरत असल्याने तेथून चालणेही अवघड बनत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हीच अवस्था असताना त्याकडे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.गळती लागल्यामुळे वाहनचालक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने वेळेतच लक्ष लागून येथील सर्व गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पाणी बचतीचे महत्त्व प्राधिकरणाला कधी कळणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.दुरुस्तीचे कर्मचारी अवेळीजीवन प्राधिकरणने या परिसरात जलवाहिनीच्या दुुरुस्तीसाठी कर्मचारी नेमले आहेत. परंतु ते कधीही वेळेवर उपलब्ध नसतात. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम कसेबसे घाई गडबडीत तात्पुरते करून तेथून पळ काढतात. त्यामुळे परत त्या जागेवर गळती लागते. गळती रोखणे हे संबंधित यंत्रणांचे कर्तव्यच ठरते. प्राधिकरणने मनमानी कारभारास वेळीच आवर न घातल्यास ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. शाहूपुरीत अनेक वर्षे पाणीपुरवठा गळतीचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन नसल्याने येथील नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. - भारत भोसले