शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!

By admin | Updated: March 13, 2017 17:12 IST

दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीत

शाहूपुरीत पन्नास ठिकाणी गळती!दुष्काळात तेरावा : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावरून गटारीतशाहूपुरी (सातारा) : जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळांच्या चटक्यांची दाहकता जाणवत असतानाच शाहूपुरीमध्ये लाखो लिटर पाणी गटारीतून वाहून जात आहे. येथील दत्त दिगंबर कॉलनी, पवार कॉलनी, समता पार्क, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी परिसरातील जलवाहिनीला सुमारे पन्नास ठिकाणी गळती लागली आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यात सणासुदीच्या काळात अनेक गावांमधील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साताऱ्याच्या उपनगरांमध्येही काही दिवसांतच ही वेळ येणार आहे. या अवस्थेतही शाहूपुरीत विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. शाहूपुरीला पाणीपुरवठा करत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यातून दररोज लाखो लिटरचे पाणी वाया जात आहे. गळती लागल्यामुळे या परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साठत आहे. तेथून जाताना ज्येष्ठ नागरिक, तरुणींचे पाय घसरत असल्याने तेथून चालणेही अवघड बनत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हीच अवस्था असताना त्याकडे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.गळती लागल्यामुळे वाहनचालक व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने वेळेतच लक्ष लागून येथील सर्व गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पाणी बचतीचे महत्त्व प्राधिकरणाला कधी कळणार, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.दुरुस्तीचे कर्मचारी अवेळीजीवन प्राधिकरणने या परिसरात जलवाहिनीच्या दुुरुस्तीसाठी कर्मचारी नेमले आहेत. परंतु ते कधीही वेळेवर उपलब्ध नसतात. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम कसेबसे घाई गडबडीत तात्पुरते करून तेथून पळ काढतात. त्यामुळे परत त्या जागेवर गळती लागते. गळती रोखणे हे संबंधित यंत्रणांचे कर्तव्यच ठरते. प्राधिकरणने मनमानी कारभारास वेळीच आवर न घातल्यास ग्रामस्थांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. शाहूपुरीत अनेक वर्षे पाणीपुरवठा गळतीचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन नसल्याने येथील नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. - भारत भोसले