शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

भाचाच झाला तिचा भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

परळी खोऱ्यातील अंकुश जाधव हे आपल्या संयुक्त कुटुंबाबरोबर कुरूण या गावात राहात होते. सहा भावांमध्ये एकुलती एक बहीण असलेल्या ...

परळी खोऱ्यातील अंकुश जाधव हे आपल्या संयुक्त कुटुंबाबरोबर कुरूण या गावात राहात होते. सहा भावांमध्ये एकुलती एक बहीण असलेल्या सुरेखा यांच्यावर सगळ्यांचेच विशेष प्रेम होते. मात्र, सुरेखा लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरपलं. आईविना भावांच्या कुटुंबामध्ये वाढणाऱ्या सुरेखा यांचा विवाह शाहुपुरी येथील नितीन मोरे यांच्याशी झाला. त्यानंतर, अवघ्या काही वर्षांतच अंकुश जाधव यांचे अपघाती निधन झाले. वडीलभाऊ गेल्याचं दु:ख अव्यक्त राहिलं. आपल्या पाच भावांची साथ असतानाही त्यांना मोठ्या दादांची कमतरता जाणवू लागली. याची कल्पना त्यांचा भाचा दशरथ जाधव यांना आली. साताऱ्यात राहणाऱ्या दशरथ यांनी आत्याची ही अस्वस्थता ओळखली आणि राखी पौर्णिमेला थेट शाहुपुरीत आत्याचे घर गाठले.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेला, तरीही आत्याकडून राखी बांधून घेण्यासाठी दशरथ शाहुपुरीत सुरेखा मोरे यांच्या घरी जातो. याविषयी बोलताना दशरथ जाधव म्हणाले, ‘कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या वडिलांनी सगळ्या भावंडांना साथ दिली. आजीच्या पश्चात आत्या आणि वडिलांमध्ये अनोखे ऋणानुबंध मी पाहिले होते. लग्नानंतर ती माहेरी आली, तर तिचा पाहुणचार करण्यात आम्ही सगळेच व्यस्त असायचो. वडील गेल्यानंतर आत्याला त्यांची कमतरता जाणवते, हे लक्षात आलं. तिच्या बोलूनही झालं, पण तिच्या मनात त्यांच्या दादाची जागा रिकामीच वाटली. मग आत्याकडून राखी बांधून आपण तिला वडिलांची कमतरता भासू देऊ नये, असा विचार आला. तेव्हापासून सुमारे २२ वर्षांहून अधिक काळ ती मला राखी बांधते.’

भावाच्या मृत्यूनंतर भाच्याने आत्याबरोबर जोडलेले हे अनोखे नाते अव्याहतपणे दोन दशकांचा टप्पा ओलांडून पुढे प्रवाहित आहे. राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला दोघेही कुठंही असले, तरीही भेटणं आणि सण साजरा करणं हे त्यांच्या शेड्युलचा भाग आहे.

-प्रगती जाधव-पाटील