शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

भाचाच झाला तिचा भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

परळी खोऱ्यातील अंकुश जाधव हे आपल्या संयुक्त कुटुंबाबरोबर कुरूण या गावात राहात होते. सहा भावांमध्ये एकुलती एक बहीण असलेल्या ...

परळी खोऱ्यातील अंकुश जाधव हे आपल्या संयुक्त कुटुंबाबरोबर कुरूण या गावात राहात होते. सहा भावांमध्ये एकुलती एक बहीण असलेल्या सुरेखा यांच्यावर सगळ्यांचेच विशेष प्रेम होते. मात्र, सुरेखा लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरपलं. आईविना भावांच्या कुटुंबामध्ये वाढणाऱ्या सुरेखा यांचा विवाह शाहुपुरी येथील नितीन मोरे यांच्याशी झाला. त्यानंतर, अवघ्या काही वर्षांतच अंकुश जाधव यांचे अपघाती निधन झाले. वडीलभाऊ गेल्याचं दु:ख अव्यक्त राहिलं. आपल्या पाच भावांची साथ असतानाही त्यांना मोठ्या दादांची कमतरता जाणवू लागली. याची कल्पना त्यांचा भाचा दशरथ जाधव यांना आली. साताऱ्यात राहणाऱ्या दशरथ यांनी आत्याची ही अस्वस्थता ओळखली आणि राखी पौर्णिमेला थेट शाहुपुरीत आत्याचे घर गाठले.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेला, तरीही आत्याकडून राखी बांधून घेण्यासाठी दशरथ शाहुपुरीत सुरेखा मोरे यांच्या घरी जातो. याविषयी बोलताना दशरथ जाधव म्हणाले, ‘कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या वडिलांनी सगळ्या भावंडांना साथ दिली. आजीच्या पश्चात आत्या आणि वडिलांमध्ये अनोखे ऋणानुबंध मी पाहिले होते. लग्नानंतर ती माहेरी आली, तर तिचा पाहुणचार करण्यात आम्ही सगळेच व्यस्त असायचो. वडील गेल्यानंतर आत्याला त्यांची कमतरता जाणवते, हे लक्षात आलं. तिच्या बोलूनही झालं, पण तिच्या मनात त्यांच्या दादाची जागा रिकामीच वाटली. मग आत्याकडून राखी बांधून आपण तिला वडिलांची कमतरता भासू देऊ नये, असा विचार आला. तेव्हापासून सुमारे २२ वर्षांहून अधिक काळ ती मला राखी बांधते.’

भावाच्या मृत्यूनंतर भाच्याने आत्याबरोबर जोडलेले हे अनोखे नाते अव्याहतपणे दोन दशकांचा टप्पा ओलांडून पुढे प्रवाहित आहे. राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला दोघेही कुठंही असले, तरीही भेटणं आणि सण साजरा करणं हे त्यांच्या शेड्युलचा भाग आहे.

-प्रगती जाधव-पाटील