शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

भाचाच झाला तिचा भाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:41 IST

परळी खोऱ्यातील अंकुश जाधव हे आपल्या संयुक्त कुटुंबाबरोबर कुरूण या गावात राहात होते. सहा भावांमध्ये एकुलती एक बहीण असलेल्या ...

परळी खोऱ्यातील अंकुश जाधव हे आपल्या संयुक्त कुटुंबाबरोबर कुरूण या गावात राहात होते. सहा भावांमध्ये एकुलती एक बहीण असलेल्या सुरेखा यांच्यावर सगळ्यांचेच विशेष प्रेम होते. मात्र, सुरेखा लहान असतानाच त्यांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरपलं. आईविना भावांच्या कुटुंबामध्ये वाढणाऱ्या सुरेखा यांचा विवाह शाहुपुरी येथील नितीन मोरे यांच्याशी झाला. त्यानंतर, अवघ्या काही वर्षांतच अंकुश जाधव यांचे अपघाती निधन झाले. वडीलभाऊ गेल्याचं दु:ख अव्यक्त राहिलं. आपल्या पाच भावांची साथ असतानाही त्यांना मोठ्या दादांची कमतरता जाणवू लागली. याची कल्पना त्यांचा भाचा दशरथ जाधव यांना आली. साताऱ्यात राहणाऱ्या दशरथ यांनी आत्याची ही अस्वस्थता ओळखली आणि राखी पौर्णिमेला थेट शाहुपुरीत आत्याचे घर गाठले.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ उलटून गेला, तरीही आत्याकडून राखी बांधून घेण्यासाठी दशरथ शाहुपुरीत सुरेखा मोरे यांच्या घरी जातो. याविषयी बोलताना दशरथ जाधव म्हणाले, ‘कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या वडिलांनी सगळ्या भावंडांना साथ दिली. आजीच्या पश्चात आत्या आणि वडिलांमध्ये अनोखे ऋणानुबंध मी पाहिले होते. लग्नानंतर ती माहेरी आली, तर तिचा पाहुणचार करण्यात आम्ही सगळेच व्यस्त असायचो. वडील गेल्यानंतर आत्याला त्यांची कमतरता जाणवते, हे लक्षात आलं. तिच्या बोलूनही झालं, पण तिच्या मनात त्यांच्या दादाची जागा रिकामीच वाटली. मग आत्याकडून राखी बांधून आपण तिला वडिलांची कमतरता भासू देऊ नये, असा विचार आला. तेव्हापासून सुमारे २२ वर्षांहून अधिक काळ ती मला राखी बांधते.’

भावाच्या मृत्यूनंतर भाच्याने आत्याबरोबर जोडलेले हे अनोखे नाते अव्याहतपणे दोन दशकांचा टप्पा ओलांडून पुढे प्रवाहित आहे. राखी पौर्णिमा आणि भाऊबीजेला दोघेही कुठंही असले, तरीही भेटणं आणि सण साजरा करणं हे त्यांच्या शेड्युलचा भाग आहे.

-प्रगती जाधव-पाटील