शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला विकासात पुढे घेऊन जाण्यासाठी युवा शक्तीची गरज- शरद पवार

By दीपक शिंदे | Updated: July 3, 2023 14:05 IST

अपप्रवृत्तीला मदत करणाऱ्यांना सहा महिन्यात जागा दाखवू!

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: देशातील सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीचा अधिकार काढून घेणे आणि जातीय दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. राज्यात देखील अशाच प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना पुढील सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. तसेच महाराष्ट्राला पुन्हा प्रगती कडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असून त्याला युवाशक्तीचा हातभार लागणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून त्यांनी पक्षाची नवी भूमिका स्पष्ट केली. त्याबरोबरच आगामी कालावधीमध्ये कोणत्या पद्धतीने पुढे जाणे आवश्यक आहे याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, मानसिंगराव देशमुख, अरुण लाड, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार, रोहित पाटील आणि प्रतीक पाटील उपस्थित होते. शरद पवार म्हणाले,  जात, धर्म आणि पंथ या माध्यमातून माणसांमध्ये संघर्ष कसा वाढत जाईल, यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग तयार होतो आहे. शाहूंचे कोल्हापूर असेल नांदेड, सांगोला, अकोला या ठिकाणी लोकांमध्ये वैरभावना निर्माण करून ती वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातूनच जातीय दंगे झाले.समाजविघातक प्रवृत्ती या उभ्या  राहत असताना त्यांना रोखण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस हे काम करत आहे. मात्र त्यालाही अडथळा आणण्याचा प्रयत्न या शक्तीकडून होत आहे.

शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून सरकार एकत्रितपणे चालवण्याचं काम केलं. मात्र हे सरकार देखील पाडून टाकण्याचं काम या विघातक शक्तिने केले. देशात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून मध्य प्रदेश मध्ये कमलनाथ यांचे सरकार देखील अशाच पद्धतीने पाडण्यात आले.  देशात दिल्ली, पंजाब, उत्तराखंड या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती निर्माण केली जात आहे. सध्या संकटाचा काळ आहे, पण यातूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. या प्रवृत्तीला थांबविले पाहिजे. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकर यांचा आहे. लोकशाहीत काम करणाऱ्या कामगारांचा आहे. या ठिकाणी जातीयवादी विचारधारा कधीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार नाही. यासाठी ही नवीन पिढी जातीयवाद्यांना गाडण्याचे काम करेल. दुर्दैवाने आपले काही सहकारी या जातीवादांसोबत जात आहेत. मात्र, लवकरच त्यांना त्यांची जागा देखील कळेल. यासाठी सर्व सामाजिक शक्ती मजबूत करून आपण लढा उभारला पाहिजे. सर्वांच्या हिताचे कष्टकऱ्यांचे आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे राज्य निर्माण करण्याचे काम पुढच्या काळामध्ये होणं आवश्यक असल्याचेही  पवार म्हणाले.

आता फक्त माझाच आवाज..

प्रीतीसंगमावरती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी शरद पवारांनी सर्वांना शांत करत, शांत बसा, कोणी बोलू नका. आता फक्त माझाच आवाज असे बोलल्याने सर्वत्र शांतता पसरली. मात्र त्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे हे देखील सर्वांना कळले.

तुमच्याकडे बेंदूर आमच्याकडे गुरुपौर्णिमा

यशवंतराव चव्हाण हे तुमचे आमचे सर्वांचे गुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जनमत तयार करण्याचे काम पुढच्या काळात करायचे आहे. ते त्यांचा आशीर्वाद घेऊनच करणार आहोत. यासाठी त्यांना वंदन करून महाराष्ट्राच्या नवीन कामाला सुरुवात करत असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तुमच्याकडे बेंदूर असला तरी आमची गुरुपौर्णिमा आहे असे सांगत त्यांनी उपस्थिताना नव्या महाराष्ट्राच्या जडणघडणी बाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षKaradकराडNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार