शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद, मकरदआबांना लाल दिवा..

By नितीन काळेल | Updated: October 4, 2023 19:13 IST

अजितदादा गटाला पुन्हा साताऱ्याला बालेकिल्ला बनवायचाय

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर २० वर्षांपासून वर्चस्व गाजवलेल्या राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला चार वर्षांत भगदाड पडत गेले. ताकद कमी झाली. आता पक्षात फूट असलीतरी अजितदादा गटाला पुन्हा साताऱ्याला बालेकिल्ला बनवायचे आहे. त्यामुळे नव्या राजकीय घडामोडीत दबावातून का असेना पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घ्यायचे आहे. यातूनच आमदार मकरंद पाटील यांना लाल दिवा देण्याचे निश्चीत आहे. त्यामुळे सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडील पालकमंत्रिपद जाण्याचे संकेत आहेत.महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण यांच्या रुपाने काॅंग्रेसवर भरभरून प्रेम केले. पण, १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना केली आणि जिल्हा पवार यांच्या पाठिशी ठामपणे राहिला. त्यावेळी विधानसभेचे १० पैकी ९ आमदार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे झाले. त्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीच सबकुछ होती. पण, गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादीला हादरे बसले. त्यामुळे भाजपची ताकद वाढली.सध्यस्थितीत राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांनी सातारा जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्ह्यावर कब्जा मिळवायचा आहे. यासाठी रणनिती आणि दबावाचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातूनच साताऱ्याचे पालकमंत्रीपदही हवे आहे. यासाठी स्वत: अजित पवार आग्रही आहेत. यासाठी अंतर्गत राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. पण, हे पद कोणाला द्यायचे असा प्रश्न असलातरी वाईचे आमदार मकरंद पाटील यांना लाॅटरी लागण्याचे संकेत आहेत.आमदार मकरंद पाटील अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. वाई विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे. मकरंद पाटील दादा समऱ्थक झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी अजित पवार भाजपबरोबर गेले त्यावेळीच मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्याचे निश्चीत होते. पण, त्यांनी तातडीने निर्णय न घेतल्याने मंत्रीपद रखडल्याचे सांगण्यात येते. पण, आज राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. ते मकरंद पाटील यांचेच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पाटील यांना लाल दिवा मिळणारच असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे पितृपंधरवडा झाल्यानंतर मकरंदआबाचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल असे संकेत आहेत. त्यातूनच अजित पवार यांना साताऱ्याचे पालकमंत्रिपदही हवे आहे. या जागेवर मकरंद पाटील यांची वर्णी लागणार हे स्पष्ट आहे. यातूनच अजितदादा जिल्ह्यात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

रामराजे-मकरंदआबांची जोडी...राष्ट्रवादीतील फुटीनंतर जिल्ह्यात दोन गट झाले आहेत. अजितदादा गटात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण आदी आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीची जिल्ह्यातील कमान खासदार लक्ष्मणराव पाटील आणि रामराजेंनी सांभाळली. आता लक्ष्मणराव पाटील यांच्या पश्चात मकरंद पाटील हे रामराजेंच्याबरोबर आहेत. या दोघांवरच अजितदादा गट जिल्ह्यात मजबूत मोट बांधू पाहत आहे.

... तर माढा, सातारा लोकसभेला दोघांचे बंधू उमेदवारराष्ट्रवादी काॅंग्रेस एकसंध होती तेव्हा सातारा लोकसभा मतदारसंघातून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. नितीन पाटील हे मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. तर माढ्यातून रामराजे किंवा त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे उभे राहणार अशी अटकळ होती. पण, गेल्या तीन महिन्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यात. महायुतीत माढा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास अजितदादा गटातून संजीवराजे दावेदार होऊ शकतात. सध्या त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहे. तर सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास नितीन पाटील उमेदवार असू शकतात.

पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व. (१९९५ पासून)

  • हर्षवर्धन पाटील - काॅंग्रेस
  • अजित पवार - राष्ट्रवादी
  • दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादी
  • जयंत पाटील - राष्ट्रवादी
  • रामराजे नाईक-निंबाळकर - राष्ट्रवादी
  • शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी
  • विजय शिवतारे - शिवसेना
  • बाळासाहेब पाटील- राष्ट्रवादी
  • शंभूराज देसाई - शिवसेना (शिंदे गट)
टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShambhuraj Desaiशंभूराज देसाई