शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

डोंगरांवरील धनदांडग्याच्या हाॅटेलचे सांडपाणी नैसर्गिक जलस्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा- कास-बामणोली जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोनशेहून अधिक लहान -मोठी हॉटेल आहेत. बहुतेक व्यावसायिकांनी सांडपाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा- कास-बामणोली जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोनशेहून अधिक लहान -मोठी हॉटेल आहेत. बहुतेक व्यावसायिकांनी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा (एसटीपी प्लँट) बसवलेले नाहीत. त्यामुळे या व्यावसायिकांचे सांडपाणी रोज मुरतं कुठं? असा प्रश्न आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही याची माहिती उपलब्ध नाही. रोज लाखो लिटर दूषित पाणी नैसर्गिक जलस्रोतात सोडणाऱ्या या धनदांडग्यांना चाप कोण लावणार, असा प्रश्न सजग पर्यावरणप्रेमी सातारकरांनी उपस्थित केला आहे.

युनेस्कोने कास पठाराला २०१३ मध्ये जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धनदांडग्यांची पावलं कास रस्त्याकडे वळली. गेल्या आठ दहा वर्षांत कास रस्त्यावर सुमारे २०० पेक्षा अधिक हॉटेल, रिसॉर्ट, कथित फार्महाऊसेस उभी राहिली आहेत. म्हणायला ही वैयक्तिक निवासस्थानं असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी राजरोसपणे व्यावसायिक वापर केला जातो. सातारा ते कास या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा आज अभावानेच रिकामी जागा पाहायला मिळते. यवतेश्वर पठारही कुंपणाने झाकोऴले आहे. २०१७ मध्ये तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने कास पठार परिसरात बांधकाम केल्यास बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल, असे इशारा देणारे फलक लावले होते. हे फलकही नंतर काही हितचिंतकांनी गायब केले. कोरोनाच्या महामारीत उद्योग व्यवसाय ठप्प झाले असताना कास रस्त्यावर बांधकामे मात्र राजरोसपणे सुरू आहेत. आपणच लावलेल्या फलकांचा आणि दिलेल्या नोटिसांचा जिल्हा प्रशासनाला विसर पडला आहे.

हाॅटेल, लाॅजिंग, रिसाॅर्टमधून सोडून देण्यात येणाऱ्या सांडपाण्यात खाद्यान्न, तेल, मलमूत्र, रसायने यांचे घटक असतात. जे अन्नाच्या माध्यमांतून जलचरांच्या पोटात जाऊन जलचरांची साखळी खंडित होऊ शकते. खेकडे, मासे आदी अन्न म्हणून आपण वारंवार भक्षण करतो. त्या वेळी या दूषित अन्नाचा मानवी शरीरावर दीर्घकालीन परिणाम संभवतात. याशिवाय दूषित पाणी प्यायल्याने मानवी तसेच इतर सजीवांवरही परिणाम होतो. पश्चिम घाटाच्या या डोंगररांगेवर, सातारा-कास-बामणोली रस्त्याला काही शेकड्यांत हाॅटेल, फार्म नसलेली फार्म हाऊसेस, रिसाॅर्ट आहेत. या व्यावसायिकांकडे स्वत:च्या सांडपाण्याचा निचरा करण्याची कोणतीही शास्त्रोक्त यंत्रणा नाही. मग त्यांचं रोज निर्माण होणारं लाखो लिटर सांडपाणी जातं कुठे, याचा शोध घेण्याची तसदी शासकीय यंत्रणेने कधी घेतलेली नाही. जी अवस्था सातारा-कास-बामणोली रस्त्यांवरील बेकायदा बांधकामांची तीच परिस्थिती सांडपाण्याच्या निचऱ्याबाबत आहे.

या डोंगररांगेच्या तिन्ही बाजूला कण्हेर, उरमोडी, कास तलाव व शिवसागर जलाशय हे पाण्याचे मोठे साठे आहेत. या साठ्यांना अखेरीस मिळणारे लहान-मोठे ओहोळ, नद्या, नाले हे स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या नैसर्गिक जलस्रोत आहेत. परिणामी या डोंगरी भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या व्यावसायिकांकडे स्थानिक कामगारांची संख्या मोठी आहे. रोजीरोटीवर परिणाम होईल या भीतीने स्थानिक ग्रामस्थांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. वारसा म्हणून जागतिक पातळीवर पोहोचलेल्या कास पठाराचा निसर्ग वारसा शासनाला खरोखरच टिकवायचा असेल तर या धनधांडग्यांचे सांडपाणी मुरते कोठे, याचा शोध जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत घ्यावा, अशी सजग सातारकरांची मागणी आहे.

कोट....

"महाबळेश्वर -पाचगणी येथे २००० साली पहिला इको सेन्सेटिव्ह झोन तयार झाला. तेथील जैवविविधता सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात इतरत्र कास, ठोसेघर, चाळकेवाडी, पाटण, जावळी या भागांत पाहायला मिळते. त्यामुळे इको सेन्सेटिव्हबाबत महाबळेश्वरसारखे पर्यावरणीय निकष या अन्य भागात तातडीने अमलात आणले पाहिजेत."

- सुनील भोईटे

मानद वन्यजीव रक्षक, सातारा.

चौकट ...

सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रणेमुळे ( सिवेज ट्रेटमेंट प्लान्ट) सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा बाग, शेती, बांधकाम, वाहने धुण्यासारख्या गोष्टींसाठी पुनर्वापर करता येईल. कास जलवाहिनीला दांडगाईने भगदाड पाडून काही खासगी व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे सातारकरांच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकला, हे उघड गुपीत आहे. किमान सांडपाण्याचा पुनर्वापर झाल्यास शुद्ध पाण्यावरील त्यांचा भार कमी होईल. याशिवाय जलप्रदूषणालाही आळा बसेल.