शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरांवरील धनदांडग्याच्या हाॅटेलचे सांडपाणी नैसर्गिक जलस्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा- कास-बामणोली जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोनशेहून अधिक लहान -मोठी हॉटेल आहेत. बहुतेक व्यावसायिकांनी सांडपाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा- कास-बामणोली जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोनशेहून अधिक लहान -मोठी हॉटेल आहेत. बहुतेक व्यावसायिकांनी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा (एसटीपी प्लँट) बसवलेले नाहीत. त्यामुळे या व्यावसायिकांचे सांडपाणी रोज मुरतं कुठं? असा प्रश्न आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही याची माहिती उपलब्ध नाही. रोज लाखो लिटर दूषित पाणी नैसर्गिक जलस्रोतात सोडणाऱ्या या धनदांडग्यांना चाप कोण लावणार, असा प्रश्न सजग पर्यावरणप्रेमी सातारकरांनी उपस्थित केला आहे.

युनेस्कोने कास पठाराला २०१३ मध्ये जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात धनदांडग्यांची पावलं कास रस्त्याकडे वळली. गेल्या आठ दहा वर्षांत कास रस्त्यावर सुमारे २०० पेक्षा अधिक हॉटेल, रिसॉर्ट, कथित फार्महाऊसेस उभी राहिली आहेत. म्हणायला ही वैयक्तिक निवासस्थानं असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी राजरोसपणे व्यावसायिक वापर केला जातो. सातारा ते कास या सुमारे पंचवीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुतर्फा आज अभावानेच रिकामी जागा पाहायला मिळते. यवतेश्वर पठारही कुंपणाने झाकोऴले आहे. २०१७ मध्ये तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने कास पठार परिसरात बांधकाम केल्यास बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल, असे इशारा देणारे फलक लावले होते. हे फलकही नंतर काही हितचिंतकांनी गायब केले. कोरोनाच्या महामारीत उद्योग व्यवसाय ठप्प झाले असताना कास रस्त्यावर बांधकामे मात्र राजरोसपणे सुरू आहेत. आपणच लावलेल्या फलकांचा आणि दिलेल्या नोटिसांचा जिल्हा प्रशासनाला विसर पडला आहे.

हाॅटेल, लाॅजिंग, रिसाॅर्टमधून सोडून देण्यात येणाऱ्या सांडपाण्यात खाद्यान्न, तेल, मलमूत्र, रसायने यांचे घटक असतात. जे अन्नाच्या माध्यमांतून जलचरांच्या पोटात जाऊन जलचरांची साखळी खंडित होऊ शकते. खेकडे, मासे आदी अन्न म्हणून आपण वारंवार भक्षण करतो. त्या वेळी या दूषित अन्नाचा मानवी शरीरावर दीर्घकालीन परिणाम संभवतात. याशिवाय दूषित पाणी प्यायल्याने मानवी तसेच इतर सजीवांवरही परिणाम होतो. पश्चिम घाटाच्या या डोंगररांगेवर, सातारा-कास-बामणोली रस्त्याला काही शेकड्यांत हाॅटेल, फार्म नसलेली फार्म हाऊसेस, रिसाॅर्ट आहेत. या व्यावसायिकांकडे स्वत:च्या सांडपाण्याचा निचरा करण्याची कोणतीही शास्त्रोक्त यंत्रणा नाही. मग त्यांचं रोज निर्माण होणारं लाखो लिटर सांडपाणी जातं कुठे, याचा शोध घेण्याची तसदी शासकीय यंत्रणेने कधी घेतलेली नाही. जी अवस्था सातारा-कास-बामणोली रस्त्यांवरील बेकायदा बांधकामांची तीच परिस्थिती सांडपाण्याच्या निचऱ्याबाबत आहे.

या डोंगररांगेच्या तिन्ही बाजूला कण्हेर, उरमोडी, कास तलाव व शिवसागर जलाशय हे पाण्याचे मोठे साठे आहेत. या साठ्यांना अखेरीस मिळणारे लहान-मोठे ओहोळ, नद्या, नाले हे स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या नैसर्गिक जलस्रोत आहेत. परिणामी या डोंगरी भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या व्यावसायिकांकडे स्थानिक कामगारांची संख्या मोठी आहे. रोजीरोटीवर परिणाम होईल या भीतीने स्थानिक ग्रामस्थांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. वारसा म्हणून जागतिक पातळीवर पोहोचलेल्या कास पठाराचा निसर्ग वारसा शासनाला खरोखरच टिकवायचा असेल तर या धनधांडग्यांचे सांडपाणी मुरते कोठे, याचा शोध जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत घ्यावा, अशी सजग सातारकरांची मागणी आहे.

कोट....

"महाबळेश्वर -पाचगणी येथे २००० साली पहिला इको सेन्सेटिव्ह झोन तयार झाला. तेथील जैवविविधता सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात इतरत्र कास, ठोसेघर, चाळकेवाडी, पाटण, जावळी या भागांत पाहायला मिळते. त्यामुळे इको सेन्सेटिव्हबाबत महाबळेश्वरसारखे पर्यावरणीय निकष या अन्य भागात तातडीने अमलात आणले पाहिजेत."

- सुनील भोईटे

मानद वन्यजीव रक्षक, सातारा.

चौकट ...

सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रणेमुळे ( सिवेज ट्रेटमेंट प्लान्ट) सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा बाग, शेती, बांधकाम, वाहने धुण्यासारख्या गोष्टींसाठी पुनर्वापर करता येईल. कास जलवाहिनीला दांडगाईने भगदाड पाडून काही खासगी व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे सातारकरांच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकला, हे उघड गुपीत आहे. किमान सांडपाण्याचा पुनर्वापर झाल्यास शुद्ध पाण्यावरील त्यांचा भार कमी होईल. याशिवाय जलप्रदूषणालाही आळा बसेल.