शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस

By नितीन काळेल | Updated: June 15, 2023 12:30 IST

माण तालुक्यात तर भीषणता अधिक

सातारा : मान्सूनचा पाऊस लांबला.. उन्हाळी पाऊसही कमी झाले.. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता वाढू लागली आहे. माण तालुक्यात तर भीषणता अधिक आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठीही लोक पायपीट करत आहेत. त्यातच टॅंकरने पाणीपुरवठा होत असलातरी अपुरा आहे. तर टॅंकरची वाट पाहण्यामुळे पै-पाहुणेही दुरावले असून पशुधनाची तर पाण्याअभावी परवड सुरू असल्याचे वास्तव समारे येत आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांत टंचाई जाणवली नव्हती. याला कारण जलसंधारणाची कामे. त्यातच पाऊसही वेळेत सुरु व्हायचा. वळीवही बरसून धरणीमाता तृप्त करायचा. पण, यंदा हवामान विभागाचा अंदाज खरा होताना दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणार असून सध्यातर मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत सतत वाढ होत चालली आहे. जून मध्यावर आलातरी लोकांची तहान भागविण्यासाठी टॅंकर धुरळा उडवत पळत आहे.सध्यस्थितीत जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा सोडले तर ९ तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये माणमध्ये तर उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणीटंचाईची दाहकता लोकांना गलबलून सोडत आहे. यामुळे प्रशासन टॅंकर सुरू करत असलेतरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे लोकांना विकतही पाणी घेण्याची वेळ आली आहे.

माणमध्ये टंचाईची स्थिती भयानाक आहे. २८ गावे आणि १६१ वाड्यांना टॅंकरचाच आधार आहे. तालुक्याच्या चाैफेर भागात टंचाई आहे. सध्या २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असलातरी यापुढे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. या टंचाईग्रस्त गावांत माणसी आणि जनावरांच्या संख्येप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. भाटकी गावातही गेल्या १५ दिवसांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. पण, पाणी कमी पडत आहे. त्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.या गावातील लोकांना पाणी देताना सार्वजनिक विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले जाते. त्यानंतर नळाद्वारे पाणी मिळते. पण, हे पाणी चार दिवसांतून एकदा येते. तर वाड्यांसाठी टॅंकर जागेवर जात असलातरी दिवसभर लोकांना वाट पहावी लागते. त्यामुळे कधी टॅंकर येतोय याची वाट पाहण्याने पाहुणे तसेच एखाद्या कामासाठीही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. भाटकीप्रमाणे माण तालुक्यातील अनेक गावांची स्थिती अशी झाली आहे. यासाठी प्रशासनाने वेगाने उपाययोजना राबवाव्यात अशीच मागणी होत आहे.

सध्या माणसांना आणि जनावरांसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण, हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जनावरांनाही चारा सोलापूर जिल्ह्यातून आणवा लागतोय. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या लवकर सुरू कराव्यात अशी आमची विनंती आहे. - दत्तात्रय शिर्के, सामाजिक कार्यकर्ते भाटकी, ता. माण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी