शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईची दाहकता वाढू लागली, सातारकरांचा टॅंकरची वाट बघण्यात जातो दिवस

By नितीन काळेल | Updated: June 15, 2023 12:30 IST

माण तालुक्यात तर भीषणता अधिक

सातारा : मान्सूनचा पाऊस लांबला.. उन्हाळी पाऊसही कमी झाले.. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता वाढू लागली आहे. माण तालुक्यात तर भीषणता अधिक आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठीही लोक पायपीट करत आहेत. त्यातच टॅंकरने पाणीपुरवठा होत असलातरी अपुरा आहे. तर टॅंकरची वाट पाहण्यामुळे पै-पाहुणेही दुरावले असून पशुधनाची तर पाण्याअभावी परवड सुरू असल्याचे वास्तव समारे येत आहे.जिल्ह्यात मागील चार वर्षांत टंचाई जाणवली नव्हती. याला कारण जलसंधारणाची कामे. त्यातच पाऊसही वेळेत सुरु व्हायचा. वळीवही बरसून धरणीमाता तृप्त करायचा. पण, यंदा हवामान विभागाचा अंदाज खरा होताना दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणार असून सध्यातर मान्सूनने ओढ दिली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत सतत वाढ होत चालली आहे. जून मध्यावर आलातरी लोकांची तहान भागविण्यासाठी टॅंकर धुरळा उडवत पळत आहे.सध्यस्थितीत जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा सोडले तर ९ तालुक्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये माणमध्ये तर उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणीटंचाईची दाहकता लोकांना गलबलून सोडत आहे. यामुळे प्रशासन टॅंकर सुरू करत असलेतरी पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे लोकांना विकतही पाणी घेण्याची वेळ आली आहे.

माणमध्ये टंचाईची स्थिती भयानाक आहे. २८ गावे आणि १६१ वाड्यांना टॅंकरचाच आधार आहे. तालुक्याच्या चाैफेर भागात टंचाई आहे. सध्या २० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असलातरी यापुढे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. या टंचाईग्रस्त गावांत माणसी आणि जनावरांच्या संख्येप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. भाटकी गावातही गेल्या १५ दिवसांपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. पण, पाणी कमी पडत आहे. त्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.या गावातील लोकांना पाणी देताना सार्वजनिक विहिरीत टॅंकरचे पाणी सोडले जाते. त्यानंतर नळाद्वारे पाणी मिळते. पण, हे पाणी चार दिवसांतून एकदा येते. तर वाड्यांसाठी टॅंकर जागेवर जात असलातरी दिवसभर लोकांना वाट पहावी लागते. त्यामुळे कधी टॅंकर येतोय याची वाट पाहण्याने पाहुणे तसेच एखाद्या कामासाठीही घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. भाटकीप्रमाणे माण तालुक्यातील अनेक गावांची स्थिती अशी झाली आहे. यासाठी प्रशासनाने वेगाने उपाययोजना राबवाव्यात अशीच मागणी होत आहे.

सध्या माणसांना आणि जनावरांसाठी शासनामार्फत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पण, हे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जनावरांनाही चारा सोलापूर जिल्ह्यातून आणवा लागतोय. शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या लवकर सुरू कराव्यात अशी आमची विनंती आहे. - दत्तात्रय शिर्के, सामाजिक कार्यकर्ते भाटकी, ता. माण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी