शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

खंबाटकीतील एस वळणावर पुन्हा भीषण अपघात; दोनजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:10 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्या परिसरातील एस वळणावर अपघातांची मालिका संपता संपेनासी झाली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी कंटेनर उलटी होऊन दोनजण जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही हे वळण कायमचे काढून टाकण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे या वळणावर अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.

ठळक मुद्देखंबाटकीतील एस वळणावर पुन्हा भीषण अपघात; दोनजण जागीच ठार १२ जखमी;अपघाताची मालिका सुरूच ; प्रशासनाचे दुर्लक्ष

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्या परिसरातील एस वळणावर अपघातांची मालिका संपता संपेनासी झाली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी कंटेनर उलटी होऊन दोनजण जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही हे वळण कायमचे काढून टाकण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे या वळणावर अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून महामागार्ने बोअर खोदकाम करणारा कंटेनर ( एमएच ११ एएल ४४६६) हा बोगदा ओलांडून पुढे आला. तीव्र उतारावरील एस वळणावर ट्रकचा गियर बॉक्स तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर एस वळणावरील पूलाच्या कठड्याला धडकून कंटेनर उलटला. या ट्रकमधून १४ कामगार प्रवास करीत होते. अपघातात दोन कामगार जागीच ठार झाले. त्यांची अद्याप ओळख पटली नाही.

 कालीमत्तू ( वय ३२ ) , प्रमोद ( वय ३६ ) , विठ्ठल भोगम ( वय २५ ) , मुस्तफा , शैलदुराई , राजा स्वामी , निलू , केसू सिंग ( वय ३० ) , मुन्ना स्वामी , व्यंकटेशन लक्ष्मण , बाबूलाल , जंगमू सलाम ( वय २५ ) हे १२ कामगार जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस व महामार्ग पोलिसांनी घाटात धाव घेऊन जखमी कामगारांना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ट्रकचा चक्काचूर अन् जखमींच्या किंकाळ्या ..

घाटातील एस वळणावर ट्रक संरक्षक कठड्याला अतिशय वेगाने धडकला. त्याची तीव्रता एवढी होती की ट्रकचा चक्काचूर झाला. ट्रकचे सर्व भाग तुटून महामार्गावर विखुरले तर काही भाग कठड्यावरुन खाली फेकले गेले. उगवत्या सूर्यालाच अपघात घडल्याने घाटात जखमींच्या किंकाळयांनी परिसर भयभीत झाला होता. साहित्याच्या गराड्यातून पोलिसांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवले. अपघाताची मालिका सुरूच ...खंबाटकीतील एस वळणावर बऱ्याचदा चालकांच्या हे एस वळण लक्षात येत नाही. पुढे अचानक एस आकाराचे वळण असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. मागील महिन्यात या ठिकाणी सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला एक पाय गमवावा लागला.

या वळणावर प्रवाशांचा मृत्यूचा आकडा शंभरीवर पोहोचला आहे. मात्र या वळणावर अद्याप उपाययोजना झाल्या नाहीत. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नवीन बोगदा केव्हा होणार आणि या वळणाचे काष्ट शुक्ल कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर