शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

निवारण परिषदेमध्ये १८५ तक्रारींचा निपटारा  : बानुगडे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:06 IST

अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आला. ही परिषद कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

ठळक मुद्देनिवारण परिषदेमध्ये १८५ तक्रारींचा निपटारा  : बानुगडे पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळाचा पुढाकार

सातारा : अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आला. ही परिषद कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे लाभधारक प्रकल्पग्रस्त तसेच सिंचन प्रकल्पातून वंचित गावे अथवा शेतकऱ्यांचा समस्या. तक्रारी व अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी साताऱ्यात या तक्रार निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेमध्ये जवळपास ४५० तक्रारी अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने पुनर्वसन तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, सिंचन योजनेच्या पाणीवाटपानुसार पाणी आवर्तनाचे प्रश्न, वंचित भागाकडून पाणी उपसा सिंचन योजना मागणी, पाणी परवाना मागणी, सिंचन योना पूर्णत्वाचे प्रश्न, सिंचन लांभधारकांचे प्रश्न, तसेच पुनर्वसन मोबदला, उदरनिर्वाह भत्ता यासंदर्भातील तक्रारी अर्जांचा समावेश होता.यातील १८५ अर्ज हे त्वरीत उपाययोजना करून कार्यवाही करण्याचे आदेश देऊन निकाली काढण्यात आले. कवठे, केंजळ, धोम-बलकवडी, जिहे, कठापूर, तारळी प्रकल्प तसेच धनगरवाडी, हणबरवाडी, टेंभू, उरमोडी या सिंचन योजनांवरील तक्रारीवर तक्रार कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.अधिकाऱ्यांपुढे थेट प्रश्न मांडून तसेच जागेवरच निराकरण करता आल्याने शेतकऱ्यांमधून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होत आहे.यावेळी बानुगडे-पाटील म्हणाले, कृष्णा खोरे महामंडळाला अधिकाधिक लोकाभिमूख करण्याचा प्रयत्न असून, प्रकल्पधारकांना वंचितांना आपल्या समस्या मांडता याव्यात, यासाठी ही परिषद आयोजित केली.

अनेक शेतकऱ्यांना आपली समस्या नेमकी कुठे मांडावी हा प्रश्न असतो. मांडली गेली तरी त्याचा पाठपुरावा करण्यात बराच वेळ जातो. त्यांचा हा वेळ वाचावा, यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे योगदान मोठे आहे.शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, डी.एम. बावळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अजित यादव, तालुका प्रमुख किरण भोसले, सुनील पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर