शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

निवारण परिषदेमध्ये १८५ तक्रारींचा निपटारा  : बानुगडे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:06 IST

अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आला. ही परिषद कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

ठळक मुद्देनिवारण परिषदेमध्ये १८५ तक्रारींचा निपटारा  : बानुगडे पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळाचा पुढाकार

सातारा : अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आला. ही परिषद कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे लाभधारक प्रकल्पग्रस्त तसेच सिंचन प्रकल्पातून वंचित गावे अथवा शेतकऱ्यांचा समस्या. तक्रारी व अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी साताऱ्यात या तक्रार निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेमध्ये जवळपास ४५० तक्रारी अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने पुनर्वसन तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, सिंचन योजनेच्या पाणीवाटपानुसार पाणी आवर्तनाचे प्रश्न, वंचित भागाकडून पाणी उपसा सिंचन योजना मागणी, पाणी परवाना मागणी, सिंचन योना पूर्णत्वाचे प्रश्न, सिंचन लांभधारकांचे प्रश्न, तसेच पुनर्वसन मोबदला, उदरनिर्वाह भत्ता यासंदर्भातील तक्रारी अर्जांचा समावेश होता.यातील १८५ अर्ज हे त्वरीत उपाययोजना करून कार्यवाही करण्याचे आदेश देऊन निकाली काढण्यात आले. कवठे, केंजळ, धोम-बलकवडी, जिहे, कठापूर, तारळी प्रकल्प तसेच धनगरवाडी, हणबरवाडी, टेंभू, उरमोडी या सिंचन योजनांवरील तक्रारीवर तक्रार कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.अधिकाऱ्यांपुढे थेट प्रश्न मांडून तसेच जागेवरच निराकरण करता आल्याने शेतकऱ्यांमधून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होत आहे.यावेळी बानुगडे-पाटील म्हणाले, कृष्णा खोरे महामंडळाला अधिकाधिक लोकाभिमूख करण्याचा प्रयत्न असून, प्रकल्पधारकांना वंचितांना आपल्या समस्या मांडता याव्यात, यासाठी ही परिषद आयोजित केली.

अनेक शेतकऱ्यांना आपली समस्या नेमकी कुठे मांडावी हा प्रश्न असतो. मांडली गेली तरी त्याचा पाठपुरावा करण्यात बराच वेळ जातो. त्यांचा हा वेळ वाचावा, यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे योगदान मोठे आहे.शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, डी.एम. बावळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अजित यादव, तालुका प्रमुख किरण भोसले, सुनील पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर