शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

धरणे भरण्यास सप्टेंबर उजडणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:43 IST

सातारा : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने दडी मारली असून, पश्चिमेकडेही तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची ...

सातारा : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने दडी मारली असून, पश्चिमेकडेही तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यातच जुलैमधील अतिवृष्टीकाळात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने ही धरणे भरण्यास सप्टेंबर महिना उजाडणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तर सध्या प्रमुख ६ धरणांत ८५ टक्क्यांवर पाणीसाठा आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात एक महिन्यापूर्वी तुफान वृष्टी झाली होती. यामुळे शेतीचे नुकसान झाले तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी आले होते. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करुन पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात आली.

गेल्या काही दिवसात पाऊस कमी-कमी होत गेला. त्याचबरोबर धरणांत येणाऱ्या पाण्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने धरणातून विसर्ग बंद करण्यात आला. कोयना धरणातून पाणी सोडणेही थांबविण्यात आले आहे. सध्या कोयना धरणात ९४ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८९.४० आहे तर धोम धरणात ११.८०, कण्हेर ८.८४ आणि उरमोडी धरणात ८.४१ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. तर टक्केवारीत हे प्रमाण धोम ८७.४०, कण्हेर ८७.५६ आणि उरमोडी धरणात ८४.३७ टक्के साठा आहे. तारळी धरणातही ९०.५२ टक्के पाणीसाठा झालेला आहे.

चौकट :

नवजाला ४२ मिलिमीटर पाऊस...

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला पावसाची नोंद झाली नाही. मात्र, यावर्षी जून महिन्यापासून कोयनेला ३,५७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला सकाळपर्यंत ४२ तर आतापर्यंत ४,६७९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४ तर यावर्षी जूनपासून ४,८११ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.

...............................................................