शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी अन् बनवडीचा ग्रामस्वच्छता अभियानात डंका

By नितीन काळेल | Updated: February 26, 2024 18:46 IST

सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखली

सातारा : सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखली असून आता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि कऱ्हाडमधील बनवडीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यस्तरावरील डंका कायम राहिला आहे. तर या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ मार्च रोजी होणार आहे.सातारा जिल्हा परिषदेने मागील २० वर्षांपासून शासनाच्या विविध योजना, उपक्रमांत दबदबा निर्माण केलेला आहे. ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राममध्येही सातत्याने यश मिळवले. त्यामुळे जिल्हा परिषदेचा राज्यस्तर तसेच दिल्लीतही गाैरव झाला आहे. आताही सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखत याहीवर्षी राज्यात पुरस्कार पटकावला आहे. तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-१९, २०१९-२० तसेच २०२०-२१ आणि २०२१-२२ (एकत्रित एक स्पर्धा) या वर्षांच्या कालावधीसाठी राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय पुरस्कार प्राप्त ठरलेल्या ग्रामपंचायती व विशेष पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण सन्मान सोहळा ५ मार्च रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात होणार आहे. तसेच दि.१ मार्च रोजी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागात प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतींचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील बनवडी आणि मान्याचीवाडी ग्रामपंचायतींचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील कामाबद्दल गौरव होत आहे. हा ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एकत्रित स्वच्छतेतील सातत्यपूर्ण कामगिरीचा परिपाक आहे. सर्वांचे जिल्हा परिषदेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबरच या गावांकडून जिल्ह्यातील इतर गावांनी प्रेरणा घेऊन यश मिळवावे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायतzpजिल्हा परिषद