शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

धोमची सुरक्षा रामभरोसे, पथदिवे बंद; फ्यूज बॉक्स सताड उघडे

By admin | Updated: July 16, 2017 16:02 IST

उपाययोजना न केल्यास आंदोलन, भाजयुमोचा इशारा

आॅनलाईन लोकमतवाई (जि. सातारा), दि. १५ : तालुक्यातील मुख्य सिंचनाचा स्त्रोत म्हणून धोम-बलकवडी व नागेवाडी या धरणांकडे पाहिले जाते. या धरणाच्या सुरक्षेला अनन्य साधारण महत्त्व असताना पाटबंधारे खात्याकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तिन्ही धरणांच्या भिंतीवर पर्यटकांचे बिनधास्तपणे वावरणे सुरू आहे. तसेच धरणाच्या भिंतीवरील पथदिवे बंद असून, फ्यूज बॉक्स उघडे पडलेले आहेत. याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने धोम पांटबंधारे विभाग, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, धोम धरणासह इतर धरणांच्या पाण्यावर हजारो नागरिकांसह लाखो हेक्टर शेती अवलंबून आहे. अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या तालुक्यातील सर्वच धरणांच्या सुरक्षेकडे मात्र धोम पाटबंधारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. लाखो लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न तालुक्यातील धरणांवर अवलंबून असताना पाटबंधारे खात्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.धोम धरणात अनेक वर्षांपासून नौकाविहार सुरू असून, नौकाविहाराचा ठेका घेणाऱ्यांकडे अधिकृत परवाना आहे का? नौकाविहार करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे? धोम धरणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे, ते कोणाच्या परवानगीने करण्यात आले आहे, असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत. तिन्ही धरणांच्या भिंतीवर पर्यटकांचे बिनधास्तपणे वावरणे सुरू असते. ह्यआओ-जाओ घर तुम्हाराह्ण अशी काहीशी परिस्थिती याठिकाणी आहे. त्यांना रोखणारे कोणी नाही. याला जबाबदार कोण?

धरणाच्या भिंतीवरील स्ट्रीटलाईट बंद अवस्थेत असून, फ्यूजबॉक्स सताड उघडे पडलेले आहेत. या सर्व बाबींकडे पाटबंधारे विभाग कानाडोळा करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, युवकचे जिल्हा सरचिटणीस मयूर नळ, राकेश फुले, अली आगा, महेश कोकरे, संतोष भागवत आदींच्या सह्या आहेत. धोम धरणाच्या सुरक्षेसाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यटक असो किंवा इतर कोणीही भिंतीवर येण्यासाठी कोणालाही परवानगी दिली जात नाही. धरण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना वेळेत रोखले जाते. धरणाच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जात आहे.- व्ही. बी. जाधव, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग वाई