शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

दुसरा बोगदा आवश्यक; पण जमीनही हवीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:02 IST

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुसºया बोगद्यामुळे वाहतूक आणखी सुरळीत होणार असून, घाटातील वाहतुकीचा वेळही वाचणार आहे. मात्र, यामध्ये बाधित शेतकºयांचा प्राधान्यानेविचार करून जाणाºया जमिनीच्या बदल्यात नवीन ठिकाणी जमीन द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.महामार्गावरील वाहतूक अधिक सोयस्कर व्हावी, यासाठी खंबाटकी घाटात दुहेरी बोगदा करण्याचे हायवे ...

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुसºया बोगद्यामुळे वाहतूक आणखी सुरळीत होणार असून, घाटातील वाहतुकीचा वेळही वाचणार आहे. मात्र, यामध्ये बाधित शेतकºयांचा प्राधान्यानेविचार करून जाणाºया जमिनीच्या बदल्यात नवीन ठिकाणी जमीन द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.महामार्गावरील वाहतूक अधिक सोयस्कर व्हावी, यासाठी खंबाटकी घाटात दुहेरी बोगदा करण्याचे हायवे प्राधिकरणाने ठरविले आहे. या नवीन बोगद्यासाठी खंडाळा, वाण्याचीवाडी आणि वेळे या तिन्ही गावांतील शेतकºयांच्या जमिनी जात आहेत. विकासात्मक कामे झाली पाहिजेत; पण ती शेतकºयांचे नुकसान करून नको, जे काम करणार आहात ते शेतकºयांना विश्वासात घेऊन केले जावे,’ अशा प्रतिक्रिया येथील शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.वास्तविक या नवीन बोगद्यानंतर होणारा रस्ता हा जुन्या टोलनाक्यापर्यंत जाऊन महामार्गाला जोडला जाणार आहे. यासाठी येथील स्थानिक शेतकºयांच्या आणखी जमिनी जाणार असल्याने हा बोगदा शेतकºयांच्या मुळावरच बसणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी हा रस्ता फ्लाय ओव्हरने बनविल्यास जमिनी वाचू शकतात.नवीन होणारा बोगदा व त्यानंतर दोन किलोमीटर लांबीचा रस्ता. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अंदाजे दोनशे दहा फूट जागा सोडावी लागणार आहे. शेतकºयांच्या संमतीने ही जागा घेण्यात येणार असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना शेतकºयांच्या अपरोक्ष जमीन मोजणीचा घाट घातला जात आहे. मात्र, यासाठी खंडाळा आणि वाण्याचीवाडी येथील शेतकºयांची आणखी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. या अगोदर राष्ट्रीय महामार्ग तसेच धोम- बलकवडीच्या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकºयांनी जागा देऊन योगदान दिले आहे. आता या रस्त्यासाठी जमिनी दिल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे आणखी किती वेळा जागा शासनाला द्यायची, असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे.‘एस’ वळणाचा धोका टळणार...खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर धोकादायक असणाºया एस वळणाने आजपर्यंत अनेकांचे प्राण घेतलेले आहेत. तर अपघातात कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. यासाठी या वळणाचा धोका कमी करण्यात यावा, ही मागणी होती. पण अद्याप त्यावर उपाययोजना झाली नाही. नवीन प्रस्तावित बोगद्यानंतर होणाºया रस्त्याने एस वळण काढून टाकणे शक्य होणार आहे. त्यामुळे येथील धोका टळणार आहे.मार्ग काढावा लागणार...प्रस्तावित बोगद्यासाठी ज्या शेतकºयांच्या जमिनी जाणार आहेत. त्यांना त्यांची नुकसान भरपाई तातडीने देण्यासाठी भूसंपादन विभागाकडून तरतूद करण्यात आली आहे. मात्र जमिनीच्या बदल्यात जमिनीच मिळाल्या पाहिजेत, अशी शेतकºयांची भूमिका असल्याने भूसंपादन व हायवे प्राधिकरणाला यावर मार्ग काढावा लागणार आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर