शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा बोगदा आवश्यक; पण जमीनही हवीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:02 IST

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुसºया बोगद्यामुळे वाहतूक आणखी सुरळीत होणार असून, घाटातील वाहतुकीचा वेळही वाचणार आहे. मात्र, यामध्ये बाधित शेतकºयांचा प्राधान्यानेविचार करून जाणाºया जमिनीच्या बदल्यात नवीन ठिकाणी जमीन द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.महामार्गावरील वाहतूक अधिक सोयस्कर व्हावी, यासाठी खंबाटकी घाटात दुहेरी बोगदा करण्याचे हायवे ...

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर होऊ घातलेल्या खंबाटकी घाटातील दुसºया बोगद्यामुळे वाहतूक आणखी सुरळीत होणार असून, घाटातील वाहतुकीचा वेळही वाचणार आहे. मात्र, यामध्ये बाधित शेतकºयांचा प्राधान्यानेविचार करून जाणाºया जमिनीच्या बदल्यात नवीन ठिकाणी जमीन द्यावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.महामार्गावरील वाहतूक अधिक सोयस्कर व्हावी, यासाठी खंबाटकी घाटात दुहेरी बोगदा करण्याचे हायवे प्राधिकरणाने ठरविले आहे. या नवीन बोगद्यासाठी खंडाळा, वाण्याचीवाडी आणि वेळे या तिन्ही गावांतील शेतकºयांच्या जमिनी जात आहेत. विकासात्मक कामे झाली पाहिजेत; पण ती शेतकºयांचे नुकसान करून नको, जे काम करणार आहात ते शेतकºयांना विश्वासात घेऊन केले जावे,’ अशा प्रतिक्रिया येथील शेतकºयांनी व्यक्त केल्या आहेत.वास्तविक या नवीन बोगद्यानंतर होणारा रस्ता हा जुन्या टोलनाक्यापर्यंत जाऊन महामार्गाला जोडला जाणार आहे. यासाठी येथील स्थानिक शेतकºयांच्या आणखी जमिनी जाणार असल्याने हा बोगदा शेतकºयांच्या मुळावरच बसणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यासाठी हा रस्ता फ्लाय ओव्हरने बनविल्यास जमिनी वाचू शकतात.नवीन होणारा बोगदा व त्यानंतर दोन किलोमीटर लांबीचा रस्ता. त्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अंदाजे दोनशे दहा फूट जागा सोडावी लागणार आहे. शेतकºयांच्या संमतीने ही जागा घेण्यात येणार असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना शेतकºयांच्या अपरोक्ष जमीन मोजणीचा घाट घातला जात आहे. मात्र, यासाठी खंडाळा आणि वाण्याचीवाडी येथील शेतकºयांची आणखी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. या अगोदर राष्ट्रीय महामार्ग तसेच धोम- बलकवडीच्या प्रकल्पासाठी स्थानिक शेतकºयांनी जागा देऊन योगदान दिले आहे. आता या रस्त्यासाठी जमिनी दिल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे आणखी किती वेळा जागा शासनाला द्यायची, असा प्रश्न शेतकºयांपुढे आहे.‘एस’ वळणाचा धोका टळणार...खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर धोकादायक असणाºया एस वळणाने आजपर्यंत अनेकांचे प्राण घेतलेले आहेत. तर अपघातात कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. यासाठी या वळणाचा धोका कमी करण्यात यावा, ही मागणी होती. पण अद्याप त्यावर उपाययोजना झाली नाही. नवीन प्रस्तावित बोगद्यानंतर होणाºया रस्त्याने एस वळण काढून टाकणे शक्य होणार आहे. त्यामुळे येथील धोका टळणार आहे.मार्ग काढावा लागणार...प्रस्तावित बोगद्यासाठी ज्या शेतकºयांच्या जमिनी जाणार आहेत. त्यांना त्यांची नुकसान भरपाई तातडीने देण्यासाठी भूसंपादन विभागाकडून तरतूद करण्यात आली आहे. मात्र जमिनीच्या बदल्यात जमिनीच मिळाल्या पाहिजेत, अशी शेतकºयांची भूमिका असल्याने भूसंपादन व हायवे प्राधिकरणाला यावर मार्ग काढावा लागणार आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर