शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

सातबारा संगणकात; शेतकरी बुचकळ्यात!

By admin | Updated: November 26, 2015 00:01 IST

महसूल विभागाचे काम ठप्प : लिखित सातबारा बंदीमुळे शेतकऱ्यांचे हाल

पांडुरंग भिलारे ल्ल वाईवाई तहसीलदारांनी महसूल विभागाच्या लेखी सातबारा उतारे न स्वीकारण्याचा आदेश सर्व मंडलाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशामुळे लेखी महसूल विभागातर्फे लेखी उतारे स्वीकारले जात नाहीत़ सर्व रेकॉर्ड आॅनलाईन करण्याचे कामकाज सुरू आहे़ यामुळे शेतकऱ्यांचे व खरेदीविक्रीचे व्यवहार करणाऱ्यांना मोठा मन:स्ताप होऊन व्यवहार ठप्प झाल्याने मोठ्या नुकसानीस सामोरे जावे जागत आहे़ तसेच या निर्णयामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून, याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे़ दरम्यान, तहसीलदारांच्या सहीनिशी काढण्यात आलेल्या पत्रामध्ये अशा प्रकारे तलाठ्यांना आदेश देण्यात आले आहेत़ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, पुणे यांच्याकडील संदर्भीय आदेशान्वये वाई तालुक्यात आॅनलाईन ई-अज्ञावलीची अंमलबजावणी दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून करण्याची आहे. यास्तव दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून हस्तलिखित साताबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवहीमधील हस्तलिखित कामकाज बंद करण्याचे आहे, तरी आपल्या मंडलातील सर्व सजांतील सर्व तलाठी यांच्याकडील हस्तलिखित सातबारा फेरफार व ७ अ नोंंद वही रितसर या कार्यालयात जमा करण्याच्या आहेत. तसेच हस्तलिखित सातबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवही याचे हस्तलिखित वितरण दि़ २३ आॅक्टोबर १५ पासून पूर्णपणे बंद करण्याचे असल्याने दि़ २२ आॅक्टोबर १५ रोजी सायंकाळी सर्व कामगार तलाठी यांच्याकडील वर नमूद केलेले सातबारा फेरफार नोंदवही व ८ अ नोंदवही या कार्यालयामध्ये बिनचूक जमा करण्याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारे आदेश काढण्यात आले आहेत़ मुळात सातबारा व ८ अ रेकॉर्डचे संगणकीकरण हे सदोष झाल्याने आॅनलाईन अनेक उतारे दिसत नाही़ बरेच रेकॉर्ड अपूर्ण आहे़ त्यामुळे तलाठ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ मात्र निर्णयामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट होताना दिसत आहे़ आणि आॅनलाईन सातबारा, ८ अ मधील त्रुटी आणखी किती दिवस दूर होतील, हे सांगता येत नाही़ वास्तविक पाहता आॅनलाईन रेकॉर्ड अद्ययावत करून तलाठ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे व नोंदणीविषयी स्पष्टता असावी, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले़शासनाचे मोठे आर्थिक नुकसान... वाई महसूल विभागात दररोज १५ ते २० व्यवहार होत असतात यापासून ७९ ते ८० हजारांचा महसूल स्टॅम्प ड्यूटीच्या माध्यमातून शासनाला मिळत असतो़ तो महसूल बुडत असल्याने शासनाचे मोठे नुकसान होत आहे़

आॅनलाईन रेकॉर्डमध्ये काही त्रुटी आहेत, येत्या आठ दिवसांत त्या दूर करून आॅनलाईन उतारे देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत़ तलाठ्यांना आॅनलाईनचे प्रशिक्षण चालू केले आहे़ - सदाशिव पडदुणे, तहसीलदार वाई आॅनलाईनची सुविधा न करताच लेखी उतारे बंद केल्याने शेतकऱ्यांना मोठा मन:स्ताप होत आहे़ तसेच कामांचा खोळंबा होत आहे तरी शासनाने यावर त्वरित तोडगा काढून यंत्रणा सुरळीत करावी़ - राघू बापू सणस, शेतकरीशेकडो व्यवहार झाले ठप्पवाई महसूल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जागांचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असतात. अनेकांनी साठेखत करून तर कोणी ‘टोकन’ देवून जागा खरेदीच्या व्यवहाराला सुरूवात केली आहे, पण सातबारा मिळत नसल्याने हे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.