शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शाळाच झाल्या पूरग्रस्तांसाठी आश्रयस्थान, महापुरात दिला निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:41 IST

सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कृष्णा व कोयना नदीला पूर आल्याने अनेक गावे आणि शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे पाण्याखाली गेल्याने संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढून शाळेत स्थलांतर केले. त्यांच्यासाठी पूर ओसरेपर्यंत शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय केली गेल्याने त्यांच्यासाठी शाळा जणू काही आश्रयस्थळे झाली होती. या ठिकाणी जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देशाळाच झाल्या पूरग्रस्तांसाठी आश्रयस्थान, महापुरात दिला निवारासंकटसमयी एकमेकांना दिलेल्या आधारामुळे घडले माणुसकीचे दर्शन

सातारा : जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कृष्णा व कोयना नदीला पूर आल्याने अनेक गावे आणि शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे पाण्याखाली गेल्याने संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढून शाळेत स्थलांतर केले. त्यांच्यासाठी पूर ओसरेपर्यंत शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय केली गेल्याने त्यांच्यासाठी शाळा जणू काही आश्रयस्थळे झाली होती. या ठिकाणी जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या होत्या.सातारा जिल्ह्यातील कृष्णा व कोयना नद्यांना आलेल्या महापुराने नदीकाठच्या गावांना विळखा घातला होता. बघता बघता शेती, जनावरांचे गोठे आणि त्यानंतर घरात पाणी शिरल्याने हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या साह्याने सुरक्षित स्थळी हलवले. अशावेळी कोणत्याही वस्तू न घेता मोकळ्या हाताने ते घराबाहेर पडले.

पुरात गावातील मंदिरे, घरे पाण्यात गेली होती. नातेवाइकांकडे जायचे तर अनेक रस्ते आणि त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने बहुसंख्य रस्त्यावरून वाहतूक बंद करण्यात आली होती. अशा गंभीर परिस्थितीत पूरग्रस्तांचे स्थलांतर करायचे तरी कोठे? असा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर होता. मात्र, ज्ञानदानाचे काम करणारी मंदिरे असलेल्या शाळा मात्र भक्कमपणे उभ्या होत्या.

ज्या शाळांमध्ये गमभन शिकवलं जातं, त्या शाळा पूरपरिस्थितीमध्ये पूरग्रस्तांचे घर बनल्या होत्या. या शाळांमध्ये या पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून दोन वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. पुरामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य विभागाची पथके कार्यान्वित करण्यात आली होती.या पुरात आयुष्यभर काबाडकष्ट करून उभारलेला संसार वाहून गेला होता. घर वाहून गेली, काहींची पडझड झाली, जनावरे मृत्युमुखी पडली. तर काहींची स्वप्नेही वाहून गेली होती. या शाळारुपी घरात पूर ओसरेपर्यंत गावातील सर्व जाती-धर्म, गरीब, श्रीमंत एकत्र रााहिले. अशा संकटप्रसंगी सर्वांची समान संकट आल्याने त्यांनी एकमेकांना आधार दिला. या संकटातून सावरण्यासाठी आत्मबल वाढविण्यासाठी गुजगोष्टी केल्या. तसेच आपल्या कच्चाबच्च्यांना घासातला घास भरवून माणुसकीचे दर्शन घडवले.पूरग्रस्तांना मदतीचा हातअनेकजण संकटात सापडल्याचे पाहून अनेकांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. आपापल्या परीने जास्त मदत करून पूरग्रस्तांचे संसार सावरण्यासाठी मदत केली. तसेच जीवनावश्यक वस्तू दिल्या. त्यामध्ये तांदूळ, डाळ, बिस्किटे, पाणी, कपडे आदी साहित्यांचा समावेश होता. 

आम्ही कधीच शाळेत गेलो नायं; पण या पुरानं शाळंत आणलं. घर अन् संसार पाण्यात गेल्यानं दु:खात होतो; पण गावतच्या आणि भावकीतल्या लोकांसोबत असल्यानं आम्हाला काही प्रमाणात आधार मिळाला. सारखी चिंता लागून राहिली व्हती; पण शाळेतील चित्र आणि बाकी सर्वांचा आधार बघून चित्त वळून जायचं-जननाथ कसबेपोतले, ता. कऱ्हाड 

 

 

 

टॅग्स :Satara Floodसातारा पूरSatara areaसातारा परिसरSchoolशाळा