शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:37 IST

सातारा : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा झालेली नाही. त्यांना पुढील वर्गामध्ये ...

सातारा : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा झालेली नाही. त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेशित करण्यात आले आहे. त्याबाबत अधिक तर पालक, शिक्षणतज्ज्ञांच्या मते, उशिरा का होईना, पण परीक्षा होणे आवश्यक होते. कोरोना असताना शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या घटक चाचण्या, सहामाही परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीद्वारे मूल्यांकन करून त्यांना उत्तीर्ण करीत पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. जूनपासून ऑनलाइन, तर डिसेंबरपासून इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण सुरू झाले. यंदा वार्षिक परीक्षा होतील असे विद्यार्थी, पालकांना वाटत होते. मात्र, त्यातच मार्चपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने पहिल्यांदा इयत्ता पहिली ते आठवी आणि त्यानंतर इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्यादरम्यान कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत एनएमएमएस शिष्यवृत्तीची परीक्षा ऑफलाइन स्वरूपात झाली. त्यापध्दतीने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा घेणे शक्य होते. विनापरीक्षा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे त्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने अयोग्य असल्याचे मत पालक, शिक्षणतज्ज्ञांतून व्यक्त होत आहे.

परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?

कोरोनाबाबतची सद्य:स्थिती पाहता, त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. कोरोनामुळे विविध क्षेत्रांमध्ये बदल झाले आहेत. ते लक्षात घेऊन शिक्षण, मूल्यमापन पध्दतीमध्ये आपण बदल करणे आवश्यक आहे.

- शोएब कच्छी, सातारा

परीक्षा टाळणे हा पर्याय बरोबर नाही. ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेता आली असती. भविष्याचा विचार करता, परीक्षा, मूल्यमापन पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. अंतर्गत सातत्यपूर्ण आणि समग्र पध्दतीचा परीक्षा, मूल्यमापनामध्ये समावेश करावा.

- रोहन गुजर, एसईएमएस, सातारा

विद्यार्थ्यांना अभ्यास किती समजला याचे मूल्यमापन करण्याचे साधन हे परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा रद्दचा निर्णय योग्य वाटत नाही. उशिरा का होईना, पण, परीक्षा होणे आवश्यक होते.

- राजेंद्र चोरगे, गुरुकुल स्कूल, सातारा

पालक काय म्हणतात?

परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करणे योग्य वाटत नाही. निवडणुका, शिष्यवृत्तीच्या परीक्षा होतात. मग, ऑफलाइन नाही निदान ऑनलाइन, तरी विद्यार्थ्यांची परीक्षा घेता आली असती. सलग दोन वर्षे परीक्षा पुढे गेल्याने त्याचा विद्यार्थ्यांना एकप्रकारे फटका बसणार आहे.

-तेजश्री कणसे-जाधव, सदरबझार, सातारा

आपल्या गेल्यावर्षीच्या कोरोनाचा अनुभव होता. दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली होती. त्यानुसार शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पुढे अडचण आली, तर परीक्षा घेण्यासह मूल्यांकन करण्याच्या दुसऱ्या पध्दतीचा विचार शासनाने करायला हवा होता. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणापैकी त्याला कितपत आकलन झाले आहे. ते जाणून घेण्यासाठी त्यांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. शासनाने मूल्यांकन, चाचणी घेण्याची पध्दत बदलली पाहिजे.

-विजय मोरे, मंगळवार तळे, सातारा

चौकट

ही ढकलगाडी काय कामाची

परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे हे किती योग्य आहे? सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार नाही. त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला जात आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यात काही हरकत नव्हती. जे विद्यार्थी वर्षभर गैरहजर होते. हे विद्याथी यांचे नुकसान आहे. पहिली ते पाचवी हा शिक्षणाचा पाया आहे. तोच कच्चा राहिला तर मुलं पुढं काय आणि कसं शिकणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे, असे हिंदवी पब्लिक स्कूलचे अमित कुलकर्णी यांनी सांगितले.