शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पहिल्याच दिवशी १५ लाख लिटर पाण्याची बचत-: मल्हारपेठ परिसरात आज पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:28 IST

कास तलावाची पाणी पातळी खालावल्यामुळे साताºयात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी

ठळक मुद्देनागरिकांकडून प्रतिसाद

सातारा : कास तलावाची पाणी पातळी खालावल्यामुळे साताºयात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी १५ लाख लिटर पाण्याची बचत झाली आहे. पाणी न सोडल्यामुळे शहरात कुठेही समस्या उद्भवली नसून, सातारकरांमधून पाणी बचतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कास धरणामध्ये ३ फुटांचा उपयुक्त तर ५ फुटांचा मृत पाणीसाठा आहे. यातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. कास योजनेवरील भागास दररोज १ इंच पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.राजवाडा, बुधवार नाका आणि व्यंकटपुरा पेठेत असणाºया या तीन टाक्यांमधून शुक्रवारी पाणीपुरवठा सोडण्यात आला नाही.

या तिन्ही टाकीमध्ये १५ लाख लिटर पाणीसाठा असतो. हा पाणीसाठा न सोडल्यामुळे पहिल्याच दिवशी १५ लाख लीटर पाण्याची बचत झाली. संत कंबीर सोसायटी, पोळवस्ती, पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार, पद्ममावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर परिसर, मंगळवार पेठ, धस कॉलनी, दस्तगीर कॉलनी या परिसरामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही.

या परिसरात राहणाºया नागरिकांना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पूर्वकल्पना दिल्यामुळे नागरिकांनी घरात एक दिवसाचा पाणीसाठा करून ठेवला होता. त्यामुळे पाण्याची काटकसर करून नागरिकांनी पाणी वापरले. परिणामी या परिसरातून एकही तक्रार नागरिकांकडूनच नव्हे तर एकाही नगरसेवकाने केली नसल्याचे समोर आले. पहिल्या दिवशी पाणी बचतीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी सांगितले. पाणी बचतीची आज यांची बारी...मल्हार पेठ, बडेकर वस्ती, नकाशपुरा, सावकार गॅरेज परिसर, शनिवार पेठ या परिसरामधील लोकांची पाणी बचतीची शनिवार दि. ११ रोजी बारी आहे. या भागामध्ये पाणी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी