शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या ठेवींवरून मुंबईत पेच

By admin | Updated: July 6, 2016 00:21 IST

जिजामाता बॅँकेचे विलीनीकरण : केंद्राकडे प्रस्ताव देण्याचा सहकार मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

सातारा : अवसायानात आलेल्या बँकांच्या विलीनीकरणाच्याबाबतीत ६५-३५ टक्क्यांचे धोरण पुन्हा सुरु करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अवसायानात आलेल्या बँकांच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक घेण्यात आली. साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेच्या विलिनीकरणासाठी ठाणे जनता सहकारी बँकेने तयारी दर्शविली आहे. या बैठकीला या दोन्ही बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अवसायानात आलेली बँक चालविण्यासाठी घेताना जी बँक चालवायला घेणार आहे, त्या बँकेने संबंधित बँकेच्या ठेवी परत करायच्या असतात. याचा संपूर्ण बोजा संबंधित चांगल्या बँकेवर पडतो. यापूर्वी ठेवींपैकी ३५ टक्के रक्कम ठेवी महामंडळामार्फत भरण्यात येत होती. उर्वरित ६५ टक्के रक्कम भरुन अवसायक बँकेला अवसायनात आलेल्या बँकेचा ताबा मिळत होता. मात्र, ही पध्दत बंद झाल्याने ठेवींचा १00 टक्के बोजा हा अवसायक बँकेवर येत असून बँकेच्या एनपीएवर त्याचा थेट परिणाम होताना पाहायला मिळत आहे. ही तांत्रिक अडचण सर्वच सहकारी बँकांच्या बाबतीत समोर येत असल्याने ‘जिजामाता’च्या विलिनीकरणाच्या अनुषंगाने हा प्रश्न सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत बँक प्रतिनिधींनी समोर आणला. त्यावर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित खात्याच्या सचिवांना तसा प्रस्ताव तयार करुन तो केंद्राकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द केला असल्याने सहकार आयुक्तांमार्फत या बँकेवर लवकरच अवसायकाची नेमणूक केली जाणार आहे. ठाणे जनता सहकारी बँकेने याबाबत तयारी दर्शविली असल्याने याची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीला जिजामाता बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा माडगूळकर, बँकेच्या सरव्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांच्यासह ठाणे जनता बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)परवाना रिझर्व्ह बँकेच्या ताब्यातजिजामाता महिला सहकारी बँकेच्या सातारा व कऱ्हाड अशा दोन शाखा होत्या. बँकेकडे या अनुषंगाने दोन परवाने होते, हे परवाने रिझर्व्ह बँकेने ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली.