शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

संमेलनाध्यक्ष बिनविरोध निवडीत सातारकरांचे योगदान : विनोद कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:31 IST

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही निवडणुकीद्वारे न होता बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सातारकर आग्रही होतो, त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती होऊ शकली,’ अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली.पत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ...

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही निवडणुकीद्वारे न होता बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सातारकर आग्रही होतो, त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती होऊ शकली,’ अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक झाली. तेव्हापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर निवड झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत पहिल्यांदा सातारा जिल्ह्याच्या वतीने संमेलनाध्यक्षाची निवड सन्मानाने व्हावी. निवडणुकीद्वारे होऊ नये, असा प्रस्ताव मांडला.

संमेलनाध्यक्ष फक्त एक हजार व्यक्तींकडून ठरवले जाते. ते समाजमान्य नाही. निवडणुकीमुळे अनेक मान्यवर लेखकांना संमेलनाध्यक्षाची संधी मिळालेली नव्हती. त्यात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि अशा अनेक साहित्यिकांची नावे सांगता येतील. विश्व साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यांचीही निवड बिनविरोध होते. सन्मानपूर्वक ते पद दिले जाते तर मग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड का नाही, अशी भूमिका मांडली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हेही या मताला अनुकूल होते. प्

रा. मिलिंद जोशी यांनी व्यापक भूमिका घेतली आणि ५७ वर्षे जी प्रथा सुरू होती ती बदलण्यासाठी हा ठराव मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केल्यानंतर ‘मसाप’च्या कार्यकारिणीने ती एकमताने मान्य केले. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत ‘मसाप’च्या या भूमिकेमुळे बिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब करणारी घटना दुरुस्ती झाली. विदर्भ साहित्य संघ पहिल्यापासूनच बिनविरोध निवडीसाठी आग्रही होता. मसाप, पुणे यांनीही तीच भूमिका घेतल्यामुळे त्यांना बळ मिळाले आणि ही घटना दुरुस्ती मंजूर झाली. अनेक नामवंत साहित्यक जे निवडणुकीच्या मैदानात येऊ इच्छित नाही त्यांना हे पद सन्मानाने देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याने घेतलेल्या पुढाकारामुळे हे घडले. अखिल भारतीय पातळीवर सातारा जिल्ह्याची यानिमित्ताने दखल घेतली गेली. यामध्ये जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, सोपान चव्हाण आणि सर्व साहित्य परिषदेच्या सभासदांचा पुढाकार होता.भविष्यात साताऱ्यात संमेलन होईल‘अखिल भारतीय साहित्य महामंडळ तीन वर्षांसाठी विदर्भाकडे आहे. हे शेवटचे वर्ष विदर्भाकडे महामंडळाची धुरा राहणार आहे. दोन वर्षे विदर्भाबाहेरच संमेलन झाल्याने शेवटचे संमेलन महामंडळ विदर्भात असताना व्हावे, अशी विदर्भवासीयांची भूमिका होती. त्यांच्या आग्रही भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मसाप, शाहूपुरी साताºयाने आपला आग्रह सोडला; परंतु भविष्यात येत्या दोन-तीन वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताºयात होईल,’ असा विश्वासही विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.