शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

संमेलनाध्यक्ष बिनविरोध निवडीत सातारकरांचे योगदान : विनोद कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:31 IST

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही निवडणुकीद्वारे न होता बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सातारकर आग्रही होतो, त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती होऊ शकली,’ अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली.पत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये ...

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड ही निवडणुकीद्वारे न होता बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सातारकर आग्रही होतो, त्यामुळेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती होऊ शकली,’ अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक झाली. तेव्हापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर निवड झाल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बैठकीत पहिल्यांदा सातारा जिल्ह्याच्या वतीने संमेलनाध्यक्षाची निवड सन्मानाने व्हावी. निवडणुकीद्वारे होऊ नये, असा प्रस्ताव मांडला.

संमेलनाध्यक्ष फक्त एक हजार व्यक्तींकडून ठरवले जाते. ते समाजमान्य नाही. निवडणुकीमुळे अनेक मान्यवर लेखकांना संमेलनाध्यक्षाची संधी मिळालेली नव्हती. त्यात मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि अशा अनेक साहित्यिकांची नावे सांगता येतील. विश्व साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यांचीही निवड बिनविरोध होते. सन्मानपूर्वक ते पद दिले जाते तर मग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड का नाही, अशी भूमिका मांडली होती. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी हेही या मताला अनुकूल होते. प्

रा. मिलिंद जोशी यांनी व्यापक भूमिका घेतली आणि ५७ वर्षे जी प्रथा सुरू होती ती बदलण्यासाठी हा ठराव मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी केल्यानंतर ‘मसाप’च्या कार्यकारिणीने ती एकमताने मान्य केले. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत ‘मसाप’च्या या भूमिकेमुळे बिनविरोध संमेलनाध्यक्ष निवडीवर शिक्कामोर्तब करणारी घटना दुरुस्ती झाली. विदर्भ साहित्य संघ पहिल्यापासूनच बिनविरोध निवडीसाठी आग्रही होता. मसाप, पुणे यांनीही तीच भूमिका घेतल्यामुळे त्यांना बळ मिळाले आणि ही घटना दुरुस्ती मंजूर झाली. अनेक नामवंत साहित्यक जे निवडणुकीच्या मैदानात येऊ इच्छित नाही त्यांना हे पद सन्मानाने देता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याने घेतलेल्या पुढाकारामुळे हे घडले. अखिल भारतीय पातळीवर सातारा जिल्ह्याची यानिमित्ताने दखल घेतली गेली. यामध्ये जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, सोपान चव्हाण आणि सर्व साहित्य परिषदेच्या सभासदांचा पुढाकार होता.भविष्यात साताऱ्यात संमेलन होईल‘अखिल भारतीय साहित्य महामंडळ तीन वर्षांसाठी विदर्भाकडे आहे. हे शेवटचे वर्ष विदर्भाकडे महामंडळाची धुरा राहणार आहे. दोन वर्षे विदर्भाबाहेरच संमेलन झाल्याने शेवटचे संमेलन महामंडळ विदर्भात असताना व्हावे, अशी विदर्भवासीयांची भूमिका होती. त्यांच्या आग्रही भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मसाप, शाहूपुरी साताºयाने आपला आग्रह सोडला; परंतु भविष्यात येत्या दोन-तीन वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताºयात होईल,’ असा विश्वासही विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.