शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

सातारी ज्येष्ठ नागरिक स्वत:ला ठेवताहेत गुंतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:09 IST

वृद्धत्व प्रत्येकालाच येणार आहे. ज्येष्ठांचा मान राखणं आपली संस्कृती आहे. ती नव्या पिढीने जपली, त्यांचा आदर केला तर ज्येष्ठांचं जगणंही सोपं जाईल. - प्रा. डॉ. शामला माने, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा.

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद संशोधनातून निष्पन्न । कौटुंबिक कलह कमी

जगदीश कोष्टी।सातारा : ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची खाण असल्यानं भावी पिढीला उपयोगच व्हायला हवा. पण बदलत्या जीवनपद्धतीमुळे हेच ज्येष्ठ नागरिक अडगळीचे वाटू लागले आहेत. त्यातून कौटुंबिक कलह वाढत असतात. समाजाला भेडसावणाऱ्या जिवंत समस्येवर छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. शामला माने यांनी संशोधन केले. अन् त्यातून असे लक्षात आले की साता-यातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक स्वत:ला गुंतून ठेवत असल्याने ते कुटुंबालाही धरून आहेत. या संशोधनात आलेले अनुभव ‘लोकमत’ वाचकांसाठी...

प्रश्न : ज्येष्ठ नागरिकांवर संशोधन करावे, असे आपणास का वाटले?उत्तर : लहानपणापासून ज्येष्ठांना जवळून पाहत आले आहे. त्याचवेळी समाजात अनेक ज्येष्ठ नागरिक कौटुंबिक, सामाजिक समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे उरलं-सुरलं आयुष्यही नीट जगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अभ्यास करण्याचा संकल्प केला.

प्रश्न : या विषयावर किती वर्षे संशोधन केले. स्वरूप कसे होते.उत्तर : सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा समाजशास्त्रीय अभ्यास हा विषय संशोधनासाठी घेतला. त्यासाठी २००५ पासून तयारी करत होते. साताºयातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकींना जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रश्नावली भरून घेतली.

प्रश्न : निष्कर्ष काय निघाला?उत्तर : हे संशोधन करताना असा निष्कर्ष निघाला की, साताºयातील ज्येष्ठ नागरिक सुशिक्षित अन् सधन आहेत. त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिक संघात जातात. विविध सामाजिक उपक्रम, व्याख्याने, सहलींमध्ये गुंतून ठेवतात. त्यांनी स्वत:ला कुटुंबामध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे कुटुंबात वादाचे फारसे प्रसंग येत नाहीत. काही ज्येष्ठ नागरिक मुलांपासून वेगळे राहत असले तरी ते त्यांच्या नजरेसमोर आहेत. सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष निघाला तो ज्यांच्याकडे पैसा, संपत्ती आहे, त्यांना कुटुंबातून फारसा त्रास होत नाही. तसेच ज्येष्ठांनीही सतत तरुण पिढीच्या राहणीमानाबाबत मतप्रदर्शन करू नये. ज्येष्ठ नागरिक आणि नव्या पिढीने एकमेकांना सामावून घेतले तर कलह टळण्यास मदत होणार आहे.

 

  • संपत्ती स्वत:कडेच ठेवून मृत्यूपत्र करावे

संशोधनातून असे लक्षात आले की, पैसा, संपत्ती ज्या ज्येष्ठांकडे आहे. त्यांना कुटुंबातून फारसा त्रास होत नाही. आजारपण, औषधे, दैनंदिन गरजा, नातवांचे लाड करण्यासाठी कोणाकडे हात पसरावे लागत नाहीत. अगदी झोपून असू तेव्हा सेवा कोणी नाही केली तरी आपण एखादी परिचारिका नेमू शकतो. संपत्तीचा प्रश्न येतो तेव्हा अंतिम निर्णय म्हणून मृत्यूपत्र तयार करून त्याचे नियोजन करावे.

  • वृद्धाश्रमात बाहेरचे ज्येष्ठ अधिक

सातारा शहर परिसरात पाच-सहा वृद्धाश्रम आहेत. या वृद्धांश्रमांचाही प्रा. डॉ. शामला माने यांनी अभ्यास केला. यामध्ये असे लक्षात आले की, या ठिकाणी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत बाहेर ज्येष्ठ नागरिकांची संख्याच जास्त आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालय