शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

ताजमहलाच्या सुरक्षेसाठी सातारी जवान!

By admin | Updated: August 9, 2015 23:43 IST

दहशतवाद्यांपासून रक्षण : औद्योगिक सुरक्षा दलाच्या माध्यमातून खडा पहारा

दत्ता यादव - सातारा हा शूरवीरांचा आणि सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्ह्यातील अनेक सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. हीच सैनिकी परंपरा कायम जपत सातारा जिल्ह्यातील सुपुत्र देशसेवेसाठी सदैव तत्पर असतात. सध्या दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या ताजमहलच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश आहे. त्यामुळे ताजमहलची सुरक्षा सातारा तटबंदीने मजबूत झाली आहे.देशातील प्रमुख वास्तू व प्रेक्षणीय स्थळांना दहशतवाद्यांपासून धोका आहे. त्यामुळे देशातील सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या असून, खबरदारीचे उपाय म्हणून प्रेक्षणीय स्थळांना कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जगातील सातव्या आश्यर्चामध्ये आग्रा येथील ताजमहलचा समावेश आहे. हे प्रेक्षणीय स्थळही दहशतवाद्यांच्या हिटलिटस्टवर असल्याने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची एक तुकडी सशस्त्र खडा पहारा देत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन जवानांचा समावेश असून, ताजमहलची सुरक्षा करण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचे त्यांनी सांगितले. एके ४७ हातात घेऊन ताजमहलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सातारा जिल्ह्यातील जायगाव, ता. खटाव येथील सागर देशमुख आणि पुसेसावळी, ता. खटाव येथील सागर ढाणे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघे आपल्या तुकडीसमवेत ताजमहलची सुरक्षा करत आहेत. आठ तासांच्या ड्यूट्या त्यांना देण्यात आल्या आहेत. अदलून-बदलून ड्यूटी झाल्यानंतर त्याच ठिकाणी ते वास्तव करत आहेत.सागर देशमुख हे अविवाहित असून, सहा महिन्यांनंतर ते गावी सुटीवर येतात. ताजमहल हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने अनेक देशांतून पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. त्यामध्ये महाराष्ट्रामधूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याचे सागर देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ताजमहलचे फोटो काढताना काही पर्यटक मराठीतून बोलतात. त्यावेळी आपसूकच आमचे पाय त्यांच्याकडे वळतात. आम्हीही मराठीतून बोलल्यामुळे त्यांना आपुलकी वाटते. एकमेकांची चौकशी आणि ओळख झाल्यानंतर काही पर्यटक आम्हाला सोबत फोटो काढण्याची विनंती करतात; परंतु सुरक्षिततेचा प्रोटोकॉल सांभाळावा लागतो. त्यामुळे फोटो काढण्यास त्यांना नकार द्यावा लागतो. मिल्ट्रीचा रुबाबदार ड्रेस, हातात एके ४७ रायफल पाहून आपल्या मराठी बांधवांच्या अभिमान वाटतो. असे पर्यटक त्यांना बोलून दाखवतात.ताजमहलसारख्या वास्तूचे संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या मराठी सैनिकाला मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये अनेक मराठी तरुण मोठ्या उत्साहाने दाखल होत असून, एक मराठी माणूस म्हणून मला याचा अभिमान वाटतो.- सागर देशमुख (‘सीआयएसएफ’चा जवान)