शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सातारा : पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या गावात धोम बलकवडीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 11:13 IST

डिसेंबर महिन्यातच जिथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. लोकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. अशा फलटण तालुक्यातील मिरढे गावातील पाझर तलाव सध्या धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. ऐन उन्हाळ्यात हे पाणी पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवरील दुष्काळाची तीव्रता नाहीशी झाली.

वाठार निंबाळकर : डिसेंबर महिन्यातच जिथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. लोकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. अशा फलटण तालुक्यातील मिरढे गावातील पाझर तलाव सध्या धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. ऐन उन्हाळ्यात हे पाणी पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवरील दुष्काळाची तीव्रता नाहीशी झाली.फलटण तालुक्याच्या पूर्वेला असणाऱ्या असणारे मिरडे हे गाव कायम दुष्काळी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मुबलक जमीन असूनही शेतीला पाणी नसल्याने गावातील अनेक ग्रामस्थ शेळ्या-मेंढ्या सांभाळून उदरनिर्वाह करतात.

मात्र, राज्य विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे धोम बलकवडी धरणाचे पाणी आज फलटण तालुक्यातील शेवटच्या टोकाच्या मिरढे गावात आले आहे. या पाण्याने गावातील पाझर तलाव पूर्ण भरला आहे.गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव काळे म्हणाले, आमच्या गावात आजपर्यंत दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणी टँकर लागत होता. मात्र, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे आज गावात पाणी आल्याने अनेक वर्षात पहिल्यांदाच टँकर सुरू नाही.सरपंच संगीता लोंढे म्हणल्या, अनेक वर्षे जो तलाव पावसाळ्यात ही भरला जात नाही, तो आज उन्हाळ्यात धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. गावातील सर्व वडीलधारी मंडळी ज्यांना आपल्या गावात कधी पाणी येईल, असे वाटत नव्हते. आज ते मात्र, प्रत्यक्षात गावात पाणी आलेलं पाहून आनंदी झाली आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी