शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सातारा : वर्येचं वळण धोक्याचं, अपघातांत वाढ : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:14 IST

सातारा-वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील वळण अपघातांना कारणीभूत ठरू लागलं आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे वळण नजरेस पडत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे प्रशासनाकडून रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

ठळक मुद्देवर्येचं वळण धोक्याचं, अपघातांत वाढ रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

सातारा : सातारा-वाई मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील वळण अपघातांना कारणीभूत ठरू लागलं आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी हे वळण नजरेस पडत नसल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. धोका टाळण्यासाठी या रस्त्याचे प्रशासनाकडून रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.सातारा-वाई मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या मार्गावर असलेल्या वर्ये पुलावरील धोकादायक वळण सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. आधीच पूल त्यात धोकादायक वळण असल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनांच्या वेगावरही नियंत्रण नसते.खंडाळ्यातील एस वळणावर आजपर्यंत शेकडो अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असून, अनेकजण जखमीही झाले आहेत. अशीच काहीशी परिस्थितीत वर्येतील वळणाची झाली आहे. या वळणावर रस्त्याच्या दुतर्फा झाडा-झुडपांचे प्रमाणही वाढले आहे. त्यात अरुंद रस्ता असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करावे, अत्यावश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

वर्ये पुलावरील धोकादायक वळण अपघातांना कारणीभूत ठरत आहे. आजपर्यंत या वळणावर अनेक अपघात घडले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या मार्गावरील वाहनांची संख्यापाहता, प्रशासनाने रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे बनले आहे.- श्रीरंग काटेकर 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात