शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सातारा : ज्यांच्याकडे पाणी मागितले त्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ : पूनम महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:18 PM

दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. गेली अनेक वर्षे ज्यांना पाणी मागितले आता त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याची ताकद आपल्या हातात आली आहे, असे आवाहन येथील दुष्काळी जनतेला भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.

ठळक मुद्देज्यांच्याकडे पाणी मागितले त्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ : पूनम महाजन म्हसवड येथील युवा संवाद यात्रेच्या सभेत विरोधकांवर हल्लाबोल

म्हसवड : दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. गेली अनेक वर्षे ज्यांना पाणी मागितले आता त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याची ताकद आपल्या हातात आली आहे, असे आवाहन येथील दुष्काळी जनतेला भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हसवड येथील बाजार पटांगणावर झालेल्या युवा संवाद यात्रेच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता युवा मोचार्चे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, महाराष्ट्र प्रभारी अतुल कुमारजी, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रदेश सहप्रभारी अलोक देगस, सहप्रभारी भावेशजी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष व निमंत्रक अनिल देसाई, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्वंभर बाबर, अण्णासाहेब टाकणे उपस्थित होते.महाजन म्हणाल्या, या विधानसभा मतदार संघातील लोकांनी नेहमीच हाताची व घड्याळाची दोस्ती केली आहे. तरीही कित्येक वर्षे येथील गावांना, शेतीला पाणी मिळू शकले नाही. चूल फुंकून-फुंकून बेजार झालेल्या येथील महिलांना गॅस मिळाला नाही. भाजपची सत्ता येताच देशातील साडेतीन कोटी गॅस सिलिंडर घराघरातील महिलांना मोफत दिला. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात केंद्रीय अर्थसंकत्पात प्रथमत: ऐतिहासिक अशी भरीव तरतूद केलेली आहे.सर्व धर्म समभाव म्हणता तर मग अजूनही तुमचे कार्यकर्ते जिथं गाव पेटतं तिथं रॉकेल ओतायला का जाताहेत? असा प्रतिप्रश्नही उपस्थित करून महाजन म्हणाल्या, आम्ही कर्जमाफी गरीब छोट्या शेतकऱ्यांची केली. ती मोठ्या धेंडांना मिळाली नाही म्हणून कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माण-खटावमधील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी नऊशे कोटींचा निधी मंजूर आहे.अनिल देसाई म्हणाले, भाजपने केंद्र व राज्यातून दिलेल्या निधीतून माण तालुक्याच्या पूर्व भागातील वरकुटे-मलवडी परिसरातील सोळा गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी नऊ कोटींचा निधी दिला. माणगंगा व येरळा नदी बारमाही वाहती करण्यासाठी आठशे कोटींचा निधी दिला आहे. माण तालुक्यात दोन राज्यमागार्ची कामे सुरू झाली आहेत.आमदार योगेश टिळेकर यांचेही भाषण झाले 

टॅग्स :Poonam Mahajanपूनम महाजनSatara areaसातारा परिसर