शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सातारा : ज्यांच्याकडे पाणी मागितले त्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ : पूनम महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 14:18 IST

दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. गेली अनेक वर्षे ज्यांना पाणी मागितले आता त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याची ताकद आपल्या हातात आली आहे, असे आवाहन येथील दुष्काळी जनतेला भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.

ठळक मुद्देज्यांच्याकडे पाणी मागितले त्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ : पूनम महाजन म्हसवड येथील युवा संवाद यात्रेच्या सभेत विरोधकांवर हल्लाबोल

म्हसवड : दुष्काळी तालुक्यातील पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने जास्तीत जास्त निधी दिला. गेली अनेक वर्षे ज्यांना पाणी मागितले आता त्यांच्या तोंडचे पाणी पळवण्याची ताकद आपल्या हातात आली आहे, असे आवाहन येथील दुष्काळी जनतेला भारतीय जनता युवा मोचार्चे राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी केले.भारतीय जनता पक्षाच्या वतीने म्हसवड येथील बाजार पटांगणावर झालेल्या युवा संवाद यात्रेच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता युवा मोचार्चे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, महाराष्ट्र प्रभारी अतुल कुमारजी, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रदेश सहप्रभारी अलोक देगस, सहप्रभारी भावेशजी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष व निमंत्रक अनिल देसाई, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, प्रा. विश्वंभर बाबर, अण्णासाहेब टाकणे उपस्थित होते.महाजन म्हणाल्या, या विधानसभा मतदार संघातील लोकांनी नेहमीच हाताची व घड्याळाची दोस्ती केली आहे. तरीही कित्येक वर्षे येथील गावांना, शेतीला पाणी मिळू शकले नाही. चूल फुंकून-फुंकून बेजार झालेल्या येथील महिलांना गॅस मिळाला नाही. भाजपची सत्ता येताच देशातील साडेतीन कोटी गॅस सिलिंडर घराघरातील महिलांना मोफत दिला. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात केंद्रीय अर्थसंकत्पात प्रथमत: ऐतिहासिक अशी भरीव तरतूद केलेली आहे.सर्व धर्म समभाव म्हणता तर मग अजूनही तुमचे कार्यकर्ते जिथं गाव पेटतं तिथं रॉकेल ओतायला का जाताहेत? असा प्रतिप्रश्नही उपस्थित करून महाजन म्हणाल्या, आम्ही कर्जमाफी गरीब छोट्या शेतकऱ्यांची केली. ती मोठ्या धेंडांना मिळाली नाही म्हणून कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माण-खटावमधील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी नऊशे कोटींचा निधी मंजूर आहे.अनिल देसाई म्हणाले, भाजपने केंद्र व राज्यातून दिलेल्या निधीतून माण तालुक्याच्या पूर्व भागातील वरकुटे-मलवडी परिसरातील सोळा गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यासाठी नऊ कोटींचा निधी दिला. माणगंगा व येरळा नदी बारमाही वाहती करण्यासाठी आठशे कोटींचा निधी दिला आहे. माण तालुक्यात दोन राज्यमागार्ची कामे सुरू झाली आहेत.आमदार योगेश टिळेकर यांचेही भाषण झाले 

टॅग्स :Poonam Mahajanपूनम महाजनSatara areaसातारा परिसर