शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

सातारा : तीन महिन्यांत नऊ वाहने जळून खाक, जुनी भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते.

ठळक मुद्दे नव्यांना मिळतोय एक तृतीयांश विमातीन महिन्यांत नऊ वाहने जळून खाकजुनी वाहने भंगारात

सातारा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते. त्यामुळे अनेकजण जळालेल्या गाड्यांचा सांगाडा अक्षरश: भंगारात कवडीमोल भावाने विकत असल्याचे समोर आले असून, सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत तब्बल ९ गाड्या जळून खाक झाल्या आहेत.उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर महामार्गावर वाहने पेटण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. वाहनातील वायरिंगचे शॉर्टसर्किट झाल्यानंतर त्याचे ऊर्जेमध्ये रुपांतर होऊन आग भडकत असल्याचे काही वाहन चालकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या आगीमध्ये कोणत्याही वाहनाचा केवळ सांगाडाच उरतो. त्यामुळे ही वाहने भंगारातच विकावी लागतात. जुन्या वाहनांना विमा भरला जात नाही. त्यामुळे भरपाई मिळणे कठीणच होते.

पाच ते सहा वर्षांचे वाहन असेल आणि ते वाहन आगीत भस्मसात झाले तर एक तृतीयांंश रक्कम संबंधित मालकाला भरपाई म्हणून मिळत असते. परंतु जुन्या वाहनांना विम्यातून काहीच भरपाई मिळत नाही. त्यामुळे झालेले नुकसान संबंधित वाहन मालकालाच सोसावे लागते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

उन्हाळ्याची तीव्रता अद्याप सुरू झाली नसली तरी गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात ९ वाहने जळून खाक झाली आहेत. यातील कार आणि दोन ट्रक ही तीन वाहने अगदी नवी होती. या तिन्ही वाहनांना विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, उर्वरित ६ दुचाकी वाहनांना विमा नसल्यामुळे त्या मालकांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRto officeआरटीओ ऑफीस