शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सातारा : तीन महिन्यांत नऊ वाहने जळून खाक, जुनी भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:00 IST

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते.

ठळक मुद्दे नव्यांना मिळतोय एक तृतीयांश विमातीन महिन्यांत नऊ वाहने जळून खाकजुनी वाहने भंगारात

सातारा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते. त्यामुळे अनेकजण जळालेल्या गाड्यांचा सांगाडा अक्षरश: भंगारात कवडीमोल भावाने विकत असल्याचे समोर आले असून, सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत तब्बल ९ गाड्या जळून खाक झाल्या आहेत.उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर महामार्गावर वाहने पेटण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. वाहनातील वायरिंगचे शॉर्टसर्किट झाल्यानंतर त्याचे ऊर्जेमध्ये रुपांतर होऊन आग भडकत असल्याचे काही वाहन चालकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या आगीमध्ये कोणत्याही वाहनाचा केवळ सांगाडाच उरतो. त्यामुळे ही वाहने भंगारातच विकावी लागतात. जुन्या वाहनांना विमा भरला जात नाही. त्यामुळे भरपाई मिळणे कठीणच होते.

पाच ते सहा वर्षांचे वाहन असेल आणि ते वाहन आगीत भस्मसात झाले तर एक तृतीयांंश रक्कम संबंधित मालकाला भरपाई म्हणून मिळत असते. परंतु जुन्या वाहनांना विम्यातून काहीच भरपाई मिळत नाही. त्यामुळे झालेले नुकसान संबंधित वाहन मालकालाच सोसावे लागते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

उन्हाळ्याची तीव्रता अद्याप सुरू झाली नसली तरी गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात ९ वाहने जळून खाक झाली आहेत. यातील कार आणि दोन ट्रक ही तीन वाहने अगदी नवी होती. या तिन्ही वाहनांना विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, उर्वरित ६ दुचाकी वाहनांना विमा नसल्यामुळे त्या मालकांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRto officeआरटीओ ऑफीस