शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

साताऱ्यात उष्णतेचा फटका, उकाड्याने लोक हैराण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:03 IST

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून शनिवारी तर कमाल तापमान 40.3 अंश नोंदले गेले. तर मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत

सातारा : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून शनिवारी तर कमाल तापमान 40.3 अंश नोंदले गेले. तर मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागात तर तापमानाने 41 अंशाचा टप्पा पार केला असल्याने अंगाची लाही लाही होत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून ऊन वाढू लागले. सुरुवातीच्या काळात कमाल तापमान 35 ते 36 अंशाच्या दरम्यान स्थिर होते. पण, 15 मार्चपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली. तीन दिवसांपूर्वी कमाल तापमान 39 अंशावर होते. शनिवारी तर साताºयातील कमाल तापमान 40.3 अंश नोंदले गेले. मार्च महिन्यातच तापामानाने 40 अंशाचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे आगामी काळात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. 

तापमान वाढल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास तर नागरिक घरात थांबणे पसंद करतात. तसेच काहीजण झाडाच्या सावलीत विश्रांती घेतात. शहरातील बागांच्या ठिकाणी नागरिक बसू लागले आहे. साताऱ्यात कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेले असले तरी ग्रामीण भागात ते 41 अंशापर्यंत पोहोचले आहे. 

जिल्ह्यातील पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात उन्हाच्या झळा तीव्र आहेत. दुपारच्या सुमारास शेतकरी, मेंढपाळ वर्ग झाडाच्या सावलीत बसलेला दिसून येत आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान