शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

यशात सातारा तालुक्याचा मोठा वाटा

By admin | Updated: October 23, 2014 00:08 IST

खटावमध्ये काँग्रेसमय : कोरेगाव दुसऱ्या स्थानावर तर खटावला तिसरा क्रमांक

कोरेगाव : ‘मी बाहेरचा नाही, तर माझ्या जुन्या जावळी मतदारसंघातील १८ गावे ही कोरेगाव मतदारसंघात आल्याने मी स्थानिकच आहे. या गावांचा माझा जुना ऋणानुबंध आहे, असे खुलेपणाने सांगत काँग्रेसला आव्हान देणाऱ्या आमदार शशिकांत शिंदे यांना या गावांनी सलग चौथ्यांदा म्हणजेच २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भरभरून मते दिली आहेत. मतदारसंघामध्ये सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यांचा समावेश होतो, या तालुक्यांपैकी सातारा तालुक्याने पुन्हा एकदा बाजी मारत आपला प्रथम क्रमांक राखला. निवडणूक ऐन रंगात आल्यावर काँग्रेसने वातावरणनिर्मितीसाठी कोरेगावात स्टार प्रचारक असलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत चव्हाण यांनी माजी मंत्री शशिकांत शिंंदे यांचे थेट नाव न घेता, बाहेरच्यांचा पाहुणचार पुरा झाला, त्यांना आता जाऊ द्या, असे म्हणत टीका केली होती. ज्या ठिकाणी काँग्रेसची सभा झाली, त्याच बाजार मैदानावर दुसऱ्या दिवशीच शशिकांत शिंंदे यांनी सभा घेत माजी मुख्यमंत्र्यांना प्रत्त्युतर दिले होते. मी तर जिल्ह्यातला भूमिपूत्र असून, ल्हासुर्णे येथे राहतो आणि जनतेची सेवा करतो. माझ्या जुन्या जावळी मतदारसंघातील १८ गावे कोरेगाव मतदारसंघात समाविष्ठ झाली आहेत, त्यामुळे मी पाहुणा कसा, याचे उत्तर द्यावे, असे आव्हान देत मीच बाजी मारणार असल्याचे सांगितले होते.’ (प्रतिनिधी)काँग्रेसमय खटाव खटाव तालुक्याने राष्ट्रवादीला यावेळी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. या तालुक्यातील काही गावांनी खुलेपणाने काँग्रेसच्या हाताच्या पंजाला साथ दिल्याचे मतांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या तालुक्यातील बुध, डिस्कळ, खटाव, पुसेगाव आणि खटाव गणांतील एकूण ३८ हजार ९६० मतदारांपैकी २१ हजार ११७ मतदारांनी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. काँग्रेसच्या वाट्याला ९ हजार २९७ मते मिळाली आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आहे.तालुक्यात घोडदौडशशिकांत शिंंदे यांनी कोरेगावातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवताना तिन्ही तालुक्यांवर चांगले लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांना सातारा तालुक्याची जबाबदारी सोपविली होती, ती पूर्ण झाली असून, या तालुक्याने वाढते मताधिक्य देऊन आपले वर्चस्व कायम राखले आहे. सातारा तालुक्यातील खेड, शिवथर, लिंंब, देगाव, निगडी तर्फ सातारा, वर्णे आणि कोडोली गणातील एकूण ६६ हजार ५७१ मतदारांपैकी ३६ हजार १५४ मतदारांनी शिंंदेंना साथ दिली.नेत्रदीपक कामगिरी नाहीकोरेगावात राष्ट्रवादीकडे स्थानिक स्वराज्य संस्था असताना देखील नेत्रदीपक कामगिरी करता आलेली नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही. तालुक्यातील वाठार स्टेशन, अंबवडे संमत वाघोली, एकंबे, धामणेर, ल्हासुर्णे, कोरेगाव, सातारारोड, किन्हई, कुमठे आणि चिमणगाव पंचायत समिती गणातील एकूण ७२ हजार २५४ मतदारांपैकी ३७ हजार ३८१ मतदारांनी शशिकांत शिंंदे यांना मतदान केले आहे, तर २३ हजार १४९ मते काँग्रेसच्या अ‍ॅड. विजयराव कणसे यांना मिळाली आहेत.