शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

सातारा : जीवाभावाचा सर्जा-राजा ट्रॅक्टरपुढं दुर्लक्षित, गरीब शेतकऱ्यांकडेच बैलजोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:33 IST

खटाव तालुक्यातील शेतकरी आधुनिक यंत्र, तंत्रज्ञानाचा वापर करु लागले आहेत. त्यामुळे पुर्वीच्या काळात शेतकऱ्यांची शान असणारे व कुटुंबात मानाचे स्थान असणाऱ्या जीवाभावाच्या सर्जा-राजाचे अस्तित्व धोक्यात आले.

ठळक मुद्देजीवाभावाचा सर्जा-राजा ट्रॅक्टरपुढं दुर्लक्षितगरीब शेतकऱ्यांकडेच बैलजोडी खटाव तालुक्यात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर

खटाव : खटाव तालुक्यातील शेतकरी आधुनिक यंत्र, तंत्रज्ञानाचा वापर करु लागले आहेत. त्यामुळे पुर्वीच्या काळात शेतकऱ्यांची शान असणारे व कुटुंबात मानाचे स्थान असणाऱ्या जीवाभावाच्या सर्जा-राजाचे अस्तित्व धोक्यात आले.सध्याचे युग हे धकाधकीचे आहे. झटपट व घाईगडबडीच्या जमान्यात शेतकरीही काही कमी नाही व मागेही नाहीत. झटपट शेती करताना महनत कमी तसेच लवकर निकाल अशा पध्दतीने शेती करण्यासाठी शेतकरी यांत्रीक साधनांचा वापर करत आहेत.

पारंपरिक पध्दतीत बैल जोड्यांच्या साह्याने केली जाणारी शेती पध्दतीत बदल झाला. बैल जोड्यांच्या मदतीने केली जायची ती सर्व कामे आता ट्रक्टरच्या सहाय्याने कमी वेळेत होऊ लागली आहेत.अधिक लगबगीने बहुतांश शेतकऱ्यांचा ओढा या अवजारांकडे जास्त असताना दिसुन येत आहे. ज्या गोठ्यात पुर्वी बैलजाडी उभी असायची त्याच जागेवर आता ट्रक्टर उभे आहेत. नांगरटी, पेरणी, मळणीपर्यंतची सर्व कामे ट्रक्टर करु लागला.पूर्वीपासून शेतात कोणत्याही पिकाची मळणी शेणाने सारवलेल्या खळ्यात करताना ही मळणी महिनाभर चालायची. यासाठी बैलजोडीची आवश्यकता असते. मनुष्यबळही तितकेच लागत असे. बदलत्या काळानुसार शेतीच्या संकल्पनाही बदलल्या.

आता याच जागावर आधुनिक यंत्रांनी आपला कब्जा केला आहे. मळणी यंत्राणे ही जागा घेतल्याने शेतकऱ्यांनी या खळ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता शिवारात सर्जाराजाच्या नावाने ऐकु येणारी हाक कमी होउन मळणी यंत्राच्या आवाजाने ती जागा घेतली आहे. शेतकऱ्यांची सुगी आता एका दिवसात घरी येऊ लागली आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी